शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले?, भीमराव आंबेडकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:55 IST

बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे

मिरज : देशात सध्या मंदिर व मशिदींचा वाद निर्माण करुन दंगली घडविल्या जात आहेत. हा वाद उकरणाऱ्यांनी सम्राट अशोक यांच्या काळातील देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले, याचे उत्तर द्यावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले.मालगाव (ता. मिरज) येथे भारतीय बौद्ध महासभेच्या सांगली, मिरज व मालगाव शाखेच्यावतीने पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व बौद्ध धम्म परिषद पार पडली. यावेळी भीमराव आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, २०२५ पर्यंत देशभरातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्म स्वीकारणार असून त्यादृष्टीने भारतीय बौद्ध महासभा देशातील २२ राज्यात कार्यरत आहे. लवकरच ५० हजार समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पानिपत येथे होणार आहे. २०२५ पर्यंत १ लाख सैनिक तयार करण्याचे लक्ष दलाने ठेवले आहे. बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सचिव एस. के. भंडारे, एस. एस. वानखडे, प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, पी. एम. ढोबळे, मोहन सावंत, पूज्य भदंत बी सारिपुत्तजी व त्यांचा भिक्खू संघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद भंडारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर शेसवरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगली