शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले?, भीमराव आंबेडकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:55 IST

बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे

मिरज : देशात सध्या मंदिर व मशिदींचा वाद निर्माण करुन दंगली घडविल्या जात आहेत. हा वाद उकरणाऱ्यांनी सम्राट अशोक यांच्या काळातील देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले, याचे उत्तर द्यावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले.मालगाव (ता. मिरज) येथे भारतीय बौद्ध महासभेच्या सांगली, मिरज व मालगाव शाखेच्यावतीने पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व बौद्ध धम्म परिषद पार पडली. यावेळी भीमराव आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, २०२५ पर्यंत देशभरातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्म स्वीकारणार असून त्यादृष्टीने भारतीय बौद्ध महासभा देशातील २२ राज्यात कार्यरत आहे. लवकरच ५० हजार समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पानिपत येथे होणार आहे. २०२५ पर्यंत १ लाख सैनिक तयार करण्याचे लक्ष दलाने ठेवले आहे. बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सचिव एस. के. भंडारे, एस. एस. वानखडे, प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, पी. एम. ढोबळे, मोहन सावंत, पूज्य भदंत बी सारिपुत्तजी व त्यांचा भिक्खू संघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद भंडारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर शेसवरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगली