शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले?, भीमराव आंबेडकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:55 IST

बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे

मिरज : देशात सध्या मंदिर व मशिदींचा वाद निर्माण करुन दंगली घडविल्या जात आहेत. हा वाद उकरणाऱ्यांनी सम्राट अशोक यांच्या काळातील देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले, याचे उत्तर द्यावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले.मालगाव (ता. मिरज) येथे भारतीय बौद्ध महासभेच्या सांगली, मिरज व मालगाव शाखेच्यावतीने पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व बौद्ध धम्म परिषद पार पडली. यावेळी भीमराव आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, २०२५ पर्यंत देशभरातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्म स्वीकारणार असून त्यादृष्टीने भारतीय बौद्ध महासभा देशातील २२ राज्यात कार्यरत आहे. लवकरच ५० हजार समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पानिपत येथे होणार आहे. २०२५ पर्यंत १ लाख सैनिक तयार करण्याचे लक्ष दलाने ठेवले आहे. बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सचिव एस. के. भंडारे, एस. एस. वानखडे, प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, पी. एम. ढोबळे, मोहन सावंत, पूज्य भदंत बी सारिपुत्तजी व त्यांचा भिक्खू संघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद भंडारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर शेसवरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगली