शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

टेंभू पाणी योजना कधी पूर्ण होणार?

By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST

भाजप शासनाकडून निधीची अपेक्षा : जिल्ह्यातील नेत्यांचे शासनाकडे बोट

रजाअली पीरजादे :शाळगाव आशिया खंडातील सर्वात मोठी टेंभू पाणी योजना युती शासनाच्या क ाळात पूर्ण व्हावी, अशी दुष्काळी जनतेची अपेक्षा आहे.  दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावे, दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम् व्हावा म्हणून युतीच्या काळात त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याहस्ते १९ व्या योजनेचा प्रारंभ संपतराव देशमुख यांच्या प्रयत्नाने करण्यात आला होता. सुरूवातीला या योजनेचा खर्च जवळपास १४१६ कोटी रूपये होता आणि त्यावेळी कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला तालुक्यातील १७३ गावे ओलिताखाली येणार होती. एकू ण पाच टप्पात ही योजना पूर्ण करावयाची होती आणि खरोखरच हे शिवधनुष्य उचलून त्यावेळी युती शासनाने मोठ्या प्रमाणात कामे सुरु केली. बघता बघता ८० टक्केच्या वर या योजनेची कामे झाली. योजना सुरु झाली त्यावेळी फक्त कृष्णा पाणी वाटप लवादाप्रमाणे २००० पर्यंत हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी उचलावयाचे ठरले होते. त्यावेळी अनुशेषाचा मुद्दा किंवा प्रादेशिक वादाचा फार मोठा प्रश्न कुणीच उपस्थित केला नाही. परंतु दुष्काळी जनतेच्या दुर्दैवाने युती शासनाची सत्ता गेली आणि महाराष्ट्रात कॉँग्रेसप्रणित आघाडीची सत्ता आली. आघाडीत या योजनेबाबत वारंवार श्रेयवाद उफाळून आला. आमच्या हातूनच किंवा आम्हीच पाणी आणले हे दाखविण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. सांगली जिल्ह्यातील तीन दिग्गज नेते मंत्रिमंडळात असताना आणि पाच-पाच लाल दिव्याच्या गाड्या फिरत असताना देखील, केवळ राज्यकीय स्वार्थापोटी दुष्काळी जनतेला नेतेमंडळींनी वाऱ्यावर सोडले. जी कामे केली गेली, ती लोकांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थासाठी झाली, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. यासाठी दुष्काळी फोरमची स्थापना झाली. अनेक दिग्गज नेते या फोरममध्ये होते. परंतु या योजनेने अखेरचा टप्पा गाठला नाही. या योजनेचा वापर प्रत्येक निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी केला गेला. निवडणूक आली की टेंभूचा टेंभा प्रत्येक नेता मिरवताना दिसत होता. आज ही योजना जवळपास २५०० कोटींच्या घरात जाऊन बसली आहे. योजना आणि दुष्काळी जनता आहे तेथेच आहे. परंतु नेतेमंडळींच्या खुर्च्या मात्र बदलल्या आहेत. आता तिजोरी ठणठणीत असल्याचा कांगावा सुरू झाला आहे. अनुशेषाचा मुद्दा आणि प्रादेशिक वाद सुरु झाला आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र विरूध्द विदर्भ, मराठवाडा असे चित्र रंगवले जाऊ लागले आहे. आज नवीन सरकार येऊन बराच कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप या योजनेबाबत केवळ आश्वासनाशिवाय लोकांच्या पदरी काहीही पडलेले नाही. येरे माझ्या मागल्या... अशीच आज परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेसंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली आहे. वस्तुत: निवडणुकीच्या काळात हा मुद्दा ऐरणीवर होता. सांगली जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तासगाव येथे झाली, त्यावेळी जनतेकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांसह सर्वच नेत्यांनी ही योजना युती शासनाने सुरू केली, आम्हीच पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. वस्तुत: या आश्वासनाच्या जिवावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी भरभरून भारतीय जनता पक्षाला मते दिली आणि सांगली जिल्ह्यातील कॉँग्रेसला बघता बघता खिंडार पडले. आज या योजनेबाबत सत्तेत सहभागी झालेले विशेष करून शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे कुणीच काही ठोस बोलण्यास तयार नाहीत, तर विरोधी बाकावर आरूढ झालेले कॉँग्रेसचे नेते सत्ताधारी पक्षाकडे बोट दाखवू लागले आहेत. तसेच सत्तेत सहभागी झालेले नेते कोणतेही पद न मिळाल्याने निराश होऊन बसले आहेत. काय करावे आणि काय करू नये, अशी द्विधा मनस्थिती त्यांची झाली आहे. कुं पणावरील नेतेमंडळी मात्र तळ्यात मळ्यात करीत कुंपणावर बसून आहेत. अखेरचा टप्पा गाठला नाहीसांगली जिल्ह्यातील तीन दिग्गज नेते मंत्रिमंडळात असताना आणि पाच-पाच लाल दिव्याच्या गाड्या फिरत असताना देखील, केवळ राज्यकीय स्वार्थापोटी दुष्काळी जनतेला नेतेमंडळींनी वाऱ्यावर सोडले. जी कामे केली गेली, ती लोकांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थासाठी झाली, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. यासाठी दुष्काळी फोरमची स्थापना झाली. अनेक दिग्गज नेते या फोरममध्ये होते. परंतु या योजनेने अखेरचा टप्पा गाठला नाही.