शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:29 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

ठळक मुद्देकडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेला मान्सूनचा परतीचा पाऊस आणि त्यानंतरच्या अवकाळीमुळे शेतकºयांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी, अजूनही क्षेत्रात वाढच होत असल्याने पंचनामे पूर्ण होऊन भरपाईची कार्यवाही होणार तरी कधी, असा सवाल शेतक-यांना पडला आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

प्रशासनाच्यावतीने ७ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पातळीवरून त्या आशयाच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, बाधित क्षेत्रामध्ये वाढच होत असल्याने कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांना पंचनामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तासगाव तालुक्यातील २५ हजार ९७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असून ९ हजार ७ हेक्टरवरील पंचनामे अद्यापही होणार आहेत. आटपाडीत २४२९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर अद्यापही काही क्षेत्रातील पंचनामे पूर्ण नाहीत. खानापूर तालुक्यातील ५ हजार ५५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असले तरी, ३ हजार ४६९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. यासह कडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारfloodपूर