शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार कधी?, संजय कोलेंचा सवाल

By अशोक डोंबाळे | Updated: April 5, 2023 19:13 IST

गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखान्यास ३५०० रुपयांपेक्षा जास्त दर द्यायला जमत असेल तर महाराष्ट्रातील भ्रष्ट कारखानदारांना का जमत नाही?

सांगली : गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखाना तोडणी व वाहतूक वगळता ३५०० रुपयांपेक्षा जास्त दर देत आहे. गणदेवी कारखाना व्यवस्थापनाला जमत असेल तर महाराष्ट्रातील भ्रष्ट कारखानदारांना का जमत नाही?, असा सवाल शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी सांगलीत केला. तसेच कारखानदारांशी लागेबंद असणाऱ्या संघटनेच्या पुढाऱ्यांनी एकरकमी एफआरपीचे तुनतून बंद करुन शेतकऱ्यांना जादा दर कसा मिळेल, असा विचार करावा, असा टोलाही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना लगवला.संजय कोले म्हणाले, दरवर्षी प्रमाणे गुजरातमधील सहकारी साखर कारखान्यांनी २०२२-२३ हंगामासाठी उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे. ऊस गळीत चालू असतानाच, मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्याने गुजरातमध्ये ऊसदर जाहीर केला जातो. गेली सोळा वर्षे गुजरातचे कारखाने ऊस दरात अव्वल राहिले आहेत. त्यांनी ऊस दराबाबत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास फिरकू दिले नाही. असे ऊसदर पाहता महाराष्ट्रातील कारखानदार भ्रष्टाचार करतात, संगनमताने शेतकऱ्यांना लुटतात व सरकार त्यांना पाठीशी घालते. हे सिद्ध होते. चालू गळीत हंगामात गणदेवी येथील सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ३८ हजार टन ऊस गाळप करुन ११.४७ टक्के उताऱ्याने ९ लाख ५७ हजार क्विंटल साखर उत्पादन केले. ऊस दरातून प्रति टन ७०० रुपये तोडणी व वाहतूक खर्च वजा करून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ साठी ३ हजार ४७५ रुपये तर फेब्रुवारी ३ हजार ५७५, मार्च ३ हजार ६७५ व एप्रिलसाठी ३ हजार ७७५ रुपये उच्चांकी ऊस दर देण्याचे जाहीर केले आहे. हा दर तोडणी व वाहतूक खर्च धरून प्रति टन ४ हजार १७५ ते ४ हजार ४७५ रुपये इतका होतो. गुजरात राज्यातील बहुतांशी साखर कारखाने दर चांगला देत असताना महाराष्ट्रातील साखर कारखाने काही संघटनांच्या नेत्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

साखर उताऱ्यातून ही फसवणूकदेशातील सर्वाधिक साखर उतारा असणाऱ्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात १२.८० टक्के पेक्षा जास्त रिकव्हरी असणारे कारखाने तीन हजार रुपये दर देताना कुरकूर करत आहेत. सध्या तर सर्वच कारखान्यांनी साखर उताराही चोरु लागले आहेत. यातूनही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असेही कोले म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने