शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

By अशोक डोंबाळे | Updated: April 12, 2024 18:24 IST

संतप्त शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल महिन्यातच ७७ गावे, ५६६ वाड्यांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही उमेदवार आणि नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार? असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.जिल्ह्यात ७३४ गावे असून, लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ८३ छोट्या-मोठ्या प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. सद्य:स्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ७७ गावे आणि ५६६ वाड्यांवर एप्रिलमध्येच ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार?, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच लागली आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमोल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो-तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे.

चाराटंचाईने पुशधनाची उपासमारीमान्सून आणि परतीचा मान्सून पाऊस न झाल्यामुळे खरीप आणि रब्बी पेरणीच दुष्काळी तालुक्यात झाली नाही. परिणामी, पशुधनासाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालक कडब्याच्या एका पेंढीला १५ ते १९ रुपये मोजत आहे. दिवसाला एका पशुधनास किमान पाच ते सहा पेंढ्यांची गरज आहे. दिवसाचा खर्च पशुधनाचा १०० रुपयांवर चालल्यामुळे शेतकरी कवडीमोल किमतीला पशुधन विक्री करू लागले आहेत. ओला चारा नसल्यामुळे दुभत्या पशुधनाचे हाल होत आहेत.

खासगी विहिरी, बोअर अधिग्रहणतालुका - संख्याजत - ३४क.महांकाळ - १खानापूर - ४आटपाडी - २

दोन लाखांवर लोकसंख्येला टंचाईची झळजिल्ह्यातील ८३ गावे आणि ५६६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची झळ पोहोचली आहे. ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय जत तालुक्यातील शिंगणापूर, वज्रवाड, कोणबगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी, खानापूर तालुक्यातील कुर्ली-घाडगेवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द या गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली असून, भविष्यात टँकर लावावे लागणार आहेत.

प्रशासन म्हणतेय, ३० दिवस पुरेल चारा..

  • जत तालुक्यातील लहान, मोठे, शेळी, मेंढ्यांना ३० दिवस पुरेल एवढा चारा आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन तीन किलो, तर मोठ्यांसाठी सहा किलो चारा लागतो.
  • प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही दोन महिने पुरेल एवढा चारा आहे.
  • असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागांत चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
  • डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ