शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

By अशोक डोंबाळे | Updated: April 12, 2024 18:24 IST

संतप्त शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल महिन्यातच ७७ गावे, ५६६ वाड्यांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही उमेदवार आणि नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार? असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.जिल्ह्यात ७३४ गावे असून, लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ८३ छोट्या-मोठ्या प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. सद्य:स्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ७७ गावे आणि ५६६ वाड्यांवर एप्रिलमध्येच ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार?, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच लागली आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमोल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो-तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे.

चाराटंचाईने पुशधनाची उपासमारीमान्सून आणि परतीचा मान्सून पाऊस न झाल्यामुळे खरीप आणि रब्बी पेरणीच दुष्काळी तालुक्यात झाली नाही. परिणामी, पशुधनासाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालक कडब्याच्या एका पेंढीला १५ ते १९ रुपये मोजत आहे. दिवसाला एका पशुधनास किमान पाच ते सहा पेंढ्यांची गरज आहे. दिवसाचा खर्च पशुधनाचा १०० रुपयांवर चालल्यामुळे शेतकरी कवडीमोल किमतीला पशुधन विक्री करू लागले आहेत. ओला चारा नसल्यामुळे दुभत्या पशुधनाचे हाल होत आहेत.

खासगी विहिरी, बोअर अधिग्रहणतालुका - संख्याजत - ३४क.महांकाळ - १खानापूर - ४आटपाडी - २

दोन लाखांवर लोकसंख्येला टंचाईची झळजिल्ह्यातील ८३ गावे आणि ५६६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची झळ पोहोचली आहे. ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय जत तालुक्यातील शिंगणापूर, वज्रवाड, कोणबगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी, खानापूर तालुक्यातील कुर्ली-घाडगेवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द या गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली असून, भविष्यात टँकर लावावे लागणार आहेत.

प्रशासन म्हणतेय, ३० दिवस पुरेल चारा..

  • जत तालुक्यातील लहान, मोठे, शेळी, मेंढ्यांना ३० दिवस पुरेल एवढा चारा आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन तीन किलो, तर मोठ्यांसाठी सहा किलो चारा लागतो.
  • प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही दोन महिने पुरेल एवढा चारा आहे.
  • असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागांत चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
  • डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ