शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

By अशोक डोंबाळे | Updated: April 12, 2024 18:24 IST

संतप्त शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल महिन्यातच ७७ गावे, ५६६ वाड्यांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही उमेदवार आणि नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार? असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.जिल्ह्यात ७३४ गावे असून, लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ८३ छोट्या-मोठ्या प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. सद्य:स्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ७७ गावे आणि ५६६ वाड्यांवर एप्रिलमध्येच ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार?, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच लागली आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमोल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो-तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे.

चाराटंचाईने पुशधनाची उपासमारीमान्सून आणि परतीचा मान्सून पाऊस न झाल्यामुळे खरीप आणि रब्बी पेरणीच दुष्काळी तालुक्यात झाली नाही. परिणामी, पशुधनासाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालक कडब्याच्या एका पेंढीला १५ ते १९ रुपये मोजत आहे. दिवसाला एका पशुधनास किमान पाच ते सहा पेंढ्यांची गरज आहे. दिवसाचा खर्च पशुधनाचा १०० रुपयांवर चालल्यामुळे शेतकरी कवडीमोल किमतीला पशुधन विक्री करू लागले आहेत. ओला चारा नसल्यामुळे दुभत्या पशुधनाचे हाल होत आहेत.

खासगी विहिरी, बोअर अधिग्रहणतालुका - संख्याजत - ३४क.महांकाळ - १खानापूर - ४आटपाडी - २

दोन लाखांवर लोकसंख्येला टंचाईची झळजिल्ह्यातील ८३ गावे आणि ५६६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची झळ पोहोचली आहे. ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय जत तालुक्यातील शिंगणापूर, वज्रवाड, कोणबगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी, खानापूर तालुक्यातील कुर्ली-घाडगेवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द या गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली असून, भविष्यात टँकर लावावे लागणार आहेत.

प्रशासन म्हणतेय, ३० दिवस पुरेल चारा..

  • जत तालुक्यातील लहान, मोठे, शेळी, मेंढ्यांना ३० दिवस पुरेल एवढा चारा आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन तीन किलो, तर मोठ्यांसाठी सहा किलो चारा लागतो.
  • प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही दोन महिने पुरेल एवढा चारा आहे.
  • असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागांत चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
  • डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ