शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विजापूर-गुहागरवरील खड्डे भरणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:29 IST

पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरणामुळे रखडले आहे.

ठळक मुद्देविजापूर-गुहागरवरील खड्डे भरणार तरी कधी?तालुका किमान दहा वर्षे पिछाडीवर गेल्याची भावना

आशुतोष कस्तुरे पलूस : पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे.तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरणामुळे रखडले आहे.

शासन याबाबत ठोस भूमिका घेत नाही. रस्त्यावरून शेतकरी आणि संबंधित विभाग यांच्यामध्ये न्यायालयात खटला चालू आहे. खटल्याचा निकाल लागेपर्यंत सामान्यांना मात्र येथे मरणयातना भोगाव्या लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे दिसत आहे.खड्डे भरण्यासाठी सामाजिक संस्थांनी आंदोलने केली. परंतु महामार्ग प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन जीवित हानीची वाट पाहत आहे काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत.काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता ए. जी. आडमुठे यांना विचारले असता, त्यांनी ११ तारखेला खड्डे भरण्यात येतील, त्यासाठीची पूर्ण तयारी झाली आहे असे सांगितले होते. परंतु बुधवारी त्याबाबत विचारले असता, लवकरच सुरु करु, असे पुन्हा उत्तर मिळत आहे.तालुक्यातील तुपारी, घोगाव, कुंडल, पलूस, बांबवडे ही मोठी गावे या महामार्गावर येतात. महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरांवर जवळपास धुळीचा थर जमला आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचा आजारही जडण्याची भीती वाटत आहे. या महामार्गामुळे येथील नागरिकांच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसानीमुळे तालुका किमान दहा वर्षे पिछाडीवर गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली