शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा कधी?

By admin | Updated: December 26, 2015 00:04 IST

जलशुद्धीकरणाचे काम रखडले : निधी नसल्याचा परिणाम; उन्हाळ्यात शहरावर तीव्र पाणी टंचाईचे सावट

शीतल पाटील-- सांगली -शहरातील सर्व राजकीय पक्ष, त्यांची नेतेमंडळी, एवढेच काय, महापालिकेच्या सत्तासिंहासनावर बसणारे पदाधिकारी असा प्रत्येकजण सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा करणार, अशी आरोळी ठोकत असतो. पण आजअखेर सांगलीकरांच्या नशिबी अशुद्ध पाणीच आले आहे. शुद्ध पाण्यासाठी ५६ व ७० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे काम हाती घेतले आहे. पण निधीअभावी या केंद्रांचे काम कधी सुरू होते, तर जास्त काळ बंदच असते. सध्याच्या फिल्टरमध्ये गाळ भरलेला आहे. या अशुद्ध पाण्याचे ना महापालिकेला काही देणे-घेणे आहे, ना लोकप्रतिनिधींना!महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सारेच राजकीय पक्ष सांगलीकरांना शुद्ध पाणी देणार, अशी घोषणा करतात. पण प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे रखडलेले काम! २००८ मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या विकास महाआघाडीने वारणा उद्भव पाणी योजनेचे मूळ स्वरुप बदलून सांगलीकरांच्या माथी कृष्णेचेच दूषित पाणी मारले. कृष्णा नदीतील पाणीही शुद्ध करून नागरिकांना देता येते, असे सांगत माळबंगला येथे ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले. अगदी सांडपाणीसुद्धा या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होईल, असे सांगितले जात होते. आता तीन ते चार वर्षे होऊन गेली, पण या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. याच्या ठेकेदाराचे बिल अडकल्याने त्याने मध्यंतरी कामच बंद ठेवले होते. हिराबाग वॉटर वर्क्स येथे ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे कामही रडतखडत सुरू आहे. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांसाठी तीन ते चार कोटीचा निधी आवश्यक आहे. राज्य शासनाकडून वित्त आयोगाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. घरकुल, ड्रेनेज यासारख्या स्वत:चा इंटरेस्ट असलेल्या योजनांकडे निधी वळविला. पण नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी पाणी योजनेवर जादा खर्च करण्याचा विसरच पालिकेला पडला आहे. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कॅरीफॅक्युलेटरच्या दुरुस्तीची गरज आहे. यामध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तेथील गाळ काढलेला नाही. त्यामुळे तो गाळ थेट फिल्टरमध्ये जातो. फिल्टरची बॅकवॉश प्रक्रियाही बंद आहे. वॉश केलेले पाणी दुसऱ्याच्या घरात जाते, म्हणून महापालिकेने कित्येक वर्षे फिल्टरच वॉश केलेला नाही. पाणी पुरवठ्याकडील ड्रेन वॉश पाईपला खासगी लोकांच्या ड्रेनेजचे पाईप जोडले आहेत. असा सारा सावळागोंधळ पाणीपुरवठा विभागात आहे. ड्रेन वॉश पाईपमधील सांडपाणी बंद करून फिल्टर वॉश केल्यास सांगलीकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यासाठी सहा लाख रुपयांचा खर्च आहे. पण तेही खर्च करण्यात पदाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हात आखडता घेत आहेत. कोयना धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. नोव्हेंबर महिन्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी झाली होती. हीच स्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यात सांगलीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने कोणतेही नियोजन महापालिकेने आजअखेर केलेले नाही. त्यामुळे भविष्यात नगरसेवकांच्या घरावर नागरिकांचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटू नये, अशी स्थिती आहे. ‘बांधकाम’चा अभियंता : पाणी पुरवठ्याकडे!बांधकाम विभागाचा अनुभव असलेले नगरअभियंता आर. पी. जाधव यांच्याकडे पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचा प्रभारी पदभार दिला आहे. त्यांना पाणीपुरवठा व ड्रेनेजबाबत तांत्रिक बाबीची कितपत माहिती असेल, याविषयी साशंकता आहे. जीवन प्राधिकरणकडील एका अधिकाऱ्याची महापालिकेकडे बदली झाली आहे. पण त्यांना स्वतंत्र पदभार दिला नाही. पाणीपुरवठा व ड्रेनेजचा पदभार सोडण्यास जाधव तयार नाहीत. आयुक्त अजिज कारचेही त्यांच्यापुढे हतबल झाले आहेत. आता पालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे आहे. वाहतुकीबरोबरच प्रशासकीय कामाला शिस्त लावण्यात गायकवाड यशस्वी ठरतील का? हा खरा प्रश्न आहे.दहा टक्के पाणी गळतीशहरातील उपनगरांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. काही भागात मुबलक पाणी, तर काही भाग कोरडा अशी स्थिती आहे. त्यावर नियोजनाची गरज आहे. त्यात कृष्णा नदीवरील जॅकवेल ते हिराबाग व माळबंगलापर्यंतच्या अशुद्ध दाबनलिकेवर एअरव्हॉल्व्हला गळती आहे. त्यातून दहा टक्के पाणी वाया जात आहे. गळती काढल्यास दहा टक्के पाणी जादा मिळू शकते. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.