शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा कधी?

By admin | Updated: December 26, 2015 00:04 IST

जलशुद्धीकरणाचे काम रखडले : निधी नसल्याचा परिणाम; उन्हाळ्यात शहरावर तीव्र पाणी टंचाईचे सावट

शीतल पाटील-- सांगली -शहरातील सर्व राजकीय पक्ष, त्यांची नेतेमंडळी, एवढेच काय, महापालिकेच्या सत्तासिंहासनावर बसणारे पदाधिकारी असा प्रत्येकजण सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा करणार, अशी आरोळी ठोकत असतो. पण आजअखेर सांगलीकरांच्या नशिबी अशुद्ध पाणीच आले आहे. शुद्ध पाण्यासाठी ५६ व ७० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे काम हाती घेतले आहे. पण निधीअभावी या केंद्रांचे काम कधी सुरू होते, तर जास्त काळ बंदच असते. सध्याच्या फिल्टरमध्ये गाळ भरलेला आहे. या अशुद्ध पाण्याचे ना महापालिकेला काही देणे-घेणे आहे, ना लोकप्रतिनिधींना!महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सारेच राजकीय पक्ष सांगलीकरांना शुद्ध पाणी देणार, अशी घोषणा करतात. पण प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे रखडलेले काम! २००८ मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या विकास महाआघाडीने वारणा उद्भव पाणी योजनेचे मूळ स्वरुप बदलून सांगलीकरांच्या माथी कृष्णेचेच दूषित पाणी मारले. कृष्णा नदीतील पाणीही शुद्ध करून नागरिकांना देता येते, असे सांगत माळबंगला येथे ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले. अगदी सांडपाणीसुद्धा या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होईल, असे सांगितले जात होते. आता तीन ते चार वर्षे होऊन गेली, पण या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. याच्या ठेकेदाराचे बिल अडकल्याने त्याने मध्यंतरी कामच बंद ठेवले होते. हिराबाग वॉटर वर्क्स येथे ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे कामही रडतखडत सुरू आहे. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांसाठी तीन ते चार कोटीचा निधी आवश्यक आहे. राज्य शासनाकडून वित्त आयोगाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. घरकुल, ड्रेनेज यासारख्या स्वत:चा इंटरेस्ट असलेल्या योजनांकडे निधी वळविला. पण नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी पाणी योजनेवर जादा खर्च करण्याचा विसरच पालिकेला पडला आहे. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कॅरीफॅक्युलेटरच्या दुरुस्तीची गरज आहे. यामध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तेथील गाळ काढलेला नाही. त्यामुळे तो गाळ थेट फिल्टरमध्ये जातो. फिल्टरची बॅकवॉश प्रक्रियाही बंद आहे. वॉश केलेले पाणी दुसऱ्याच्या घरात जाते, म्हणून महापालिकेने कित्येक वर्षे फिल्टरच वॉश केलेला नाही. पाणी पुरवठ्याकडील ड्रेन वॉश पाईपला खासगी लोकांच्या ड्रेनेजचे पाईप जोडले आहेत. असा सारा सावळागोंधळ पाणीपुरवठा विभागात आहे. ड्रेन वॉश पाईपमधील सांडपाणी बंद करून फिल्टर वॉश केल्यास सांगलीकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यासाठी सहा लाख रुपयांचा खर्च आहे. पण तेही खर्च करण्यात पदाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हात आखडता घेत आहेत. कोयना धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. नोव्हेंबर महिन्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी झाली होती. हीच स्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यात सांगलीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने कोणतेही नियोजन महापालिकेने आजअखेर केलेले नाही. त्यामुळे भविष्यात नगरसेवकांच्या घरावर नागरिकांचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटू नये, अशी स्थिती आहे. ‘बांधकाम’चा अभियंता : पाणी पुरवठ्याकडे!बांधकाम विभागाचा अनुभव असलेले नगरअभियंता आर. पी. जाधव यांच्याकडे पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचा प्रभारी पदभार दिला आहे. त्यांना पाणीपुरवठा व ड्रेनेजबाबत तांत्रिक बाबीची कितपत माहिती असेल, याविषयी साशंकता आहे. जीवन प्राधिकरणकडील एका अधिकाऱ्याची महापालिकेकडे बदली झाली आहे. पण त्यांना स्वतंत्र पदभार दिला नाही. पाणीपुरवठा व ड्रेनेजचा पदभार सोडण्यास जाधव तयार नाहीत. आयुक्त अजिज कारचेही त्यांच्यापुढे हतबल झाले आहेत. आता पालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे आहे. वाहतुकीबरोबरच प्रशासकीय कामाला शिस्त लावण्यात गायकवाड यशस्वी ठरतील का? हा खरा प्रश्न आहे.दहा टक्के पाणी गळतीशहरातील उपनगरांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. काही भागात मुबलक पाणी, तर काही भाग कोरडा अशी स्थिती आहे. त्यावर नियोजनाची गरज आहे. त्यात कृष्णा नदीवरील जॅकवेल ते हिराबाग व माळबंगलापर्यंतच्या अशुद्ध दाबनलिकेवर एअरव्हॉल्व्हला गळती आहे. त्यातून दहा टक्के पाणी वाया जात आहे. गळती काढल्यास दहा टक्के पाणी जादा मिळू शकते. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.