शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ४२६ जागांसाठी निवडणुका कधी? 

By अशोक डोंबाळे | Updated: January 25, 2025 18:08 IST

एप्रिलअखेर निवडणुकांच्या हालचाली : राजकीय समीकरणे बदलल्याने इच्छुकांची कसोटी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४२६ जागांसाठी निवडणुका कधी होणार, असा प्रश्न इच्छुकांनी उपस्थित केला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची आशाने राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तीन वर्षात दोन पक्ष फुटून चार पक्ष झाले, अपक्ष वाढल्यामुळे निवडणुका झाल्या, तर त्या तेवढ्या सोप्या राहणार नाहीत. नेते व कार्यकर्त्यांचाही कस लागणार असल्याने आतापासूनच जोर लावावा लागणार आहे.जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, दहा पंचायत समिती, आठ नगरपालिकांवर प्रशासक कारभार पाहत आहेत. या सगळ्याच संस्थांमध्ये कारभार पाहणाऱ्या ४२६ सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांपूर्वीच संपुष्टात आला. आता निवडणुका घेतल्या तर ४२६ जागांसाठी चांगलीच रणधुमाळी रंगणार आहे. कारण तीन वर्षांत बरेच पाणी डोक्यावरून गेले आहे. राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत.

सत्तेची समीकरणे बदलणार ..तीन वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहिली, तर इस्लामपूर, कडेगाव, तासगाव नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व होते. या नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष होते. शिराळा, आष्टा, विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस, तर जत, पलूस नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होत्या. थेट नागरिकांमधून हे नगराध्यक्ष निवडले होते. असे असले तरी सदस्यांमध्ये पुन्हा वेगळे चित्र होते. नगरसेवकांमध्ये इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचा (त्यावेळचा एकत्रित पक्ष) वरचष्मा होता. तसेच महापालिका महाआघाडी तर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात होती.

निवडणुकीच्या हालचालींना वेग..नवीन राजकीय समीकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागणी झाली आहे. दोनाचे चार पक्ष झाले आहेत. स्थानिक पातळीवर आता कोणत्या पक्षाचे प्राबल्य राहील, हे सांगणेही कठीण झाले आहे. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत भरणार आहे. इच्छुकांच्या रेट्यामुळे महायुतीच्या नेत्यांनीही एप्रिलपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

नगराध्यक्ष थेट की सदस्यांतून?

  • नगरपालिकांच्या निवडणुकीबाबत उत्सुकता कायम आहे. तीन वर्षांपूर्वी थेट नगराध्यक्ष निवडले गेले. त्यामुळे थेट नगरपालिकेवर वर्चस्व मिळविता आले. 
  • नगरपालिकेत एका पक्षाच्या नगरसेवकांचे बहुमत आणि पालिकेवर नगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा अशी स्थिती होती. त्यामुळे विकासकामांत अडथळे निर्माण झाले होते.
  • दोन ते तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला होता. यावेळेस किती सदस्यांचा प्रभाग केला जातो? याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • महापालिकेत मात्र चार सदस्यांचा एक प्रभाग होता.
टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024