शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी ३१ वर्षांत काय साधले?

By admin | Updated: November 18, 2016 23:43 IST

सदाभाऊ खोत : आता धार्मिक स्थळांना भेटी द्यायची तयारी करा ! इस्लामपुरात प्रचार सभा

इस्लामपूर : शहरवासीयांनी सत्ताधाऱ्यांना ३१ वर्षे एकहाती सत्ता दिली, तरीही विकासाच्या नावाने बोंबाबोंबच आहे. अजून आम्हाला सेवा करायची संधी द्या, अशी विनंती सत्ताधारी करत आहेत. मग तुम्हाला ३१ वर्षे गुरे राखायला सोडले होते काय? सत्ताधाऱ्यांनी आता सेवेसाठी पंढरपूर, शिर्डी, काशी अशा धार्मिक स्थळी जावे. त्यांच्या सेवेतून अपुरे राहिलेले शहराचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. इस्लामपूर येथे विकास आघाडीच्या प्रचारार्थ प्रभाग क्ऱ ६, ७, ८ व १२ मध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील, आघाडीचे विक्रम पाटील, जि. प़ सदस्य सम्राट महाडिक, राहुल महाडिक, मुकुंद कांबळे, दि़ बा़ पाटील, मुनीर इबुशे, भास्कर कदम, कपिल ओसवाल, नजीर वलांडकर, सतीश महाडिक उपस्थित होते. निशिकांत पाटील म्हणाले, शहरातील दहशतीचे राजकारण यापुढे चालू दिले जाणार नाही़ मुस्लिम व दलित समाजाची धार्मिक कार्यक्रमापुरतीच आठवण येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनता स्वीकारणार नाही़ हिंदू-मुस्लिम ऐक्य असणारं हे शहर असून ३१ वर्षांच्या एकहाती राजवटीला सुरुंग लावायची वेळ आली आहे़ परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य प्रत्येक नागरिकाला लाभणार आहे. जि़ प़ सदस्य सम्राट महाडिक म्हणाले, निशिकांत भोसले हे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार विकास आघाडीला लाभले, हाच पहिला विजय झाला आहे. दादांची दूरदृष्टी, सुसंस्कृत विचारच शहराचा विकास करु शकतात. यासाठी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. यावेळी उमेदवार सौ़ आशा पवार, सत्यवान रासकर, सौ़ रूक्साना इबुशे, चेतन शिंदे, सौ़ अन्नपूर्णा फल्ले, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, सौ. रूपाली साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिक आदी उपस्थित होते. (वार्ताहर) मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटले सदाभाऊ खोत म्हणाले, अलीकडच्या दोन वर्षात राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यामुळे निधी आला नाही, असा आरोप सत्ताधारी करीत असले तरी, ३१ वर्षांच्या सत्ताकाळात काय दिवे लावले ? पालिकेच्या सत्तेच्या खुर्चीला मुंगळा चिकटावा, तसे कित्येक वर्षे चिकटून बसलात. तुमच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे.