शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खासदारांच्या मौनात दडलंय काय? तासगावची पार्श्वभूमी : वरिष्ठ नेत्यांवर नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:10 IST

तासगाव : तासगावातील राजकीय हाणामारीच्या घटनेने शहरातील भाजपच्या बिनीच्या शिलेदारांना तासगावातून पसार व्हावे लागले, तर काहींना तुरुंगात बसावे लागले

दत्ता पाटील ।तासगाव : तासगावातील राजकीय हाणामारीच्या घटनेने शहरातील भाजपच्या बिनीच्या शिलेदारांना तासगावातून पसार व्हावे लागले, तर काहींना तुरुंगात बसावे लागले राष्ट्रवादीने निमित्त साधून खासदारांवर हल्लाबोल केला. एकीकडून राजकीय टीकास्त्र, दुसरीकडून पोलिसी कारवाईचा ससेमिरा, यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. वरिष्ठ पातळीवरून मदत न मिळाल्याने बड्या मंत्र्यांंविरोधात नाराजीच सुरु आहे. हे होत अ सताना खासदार संजयकाका पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे खासदारांच्या मौनात दडलंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तासगाव तालुक्यात भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत नगरपालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जोरदार हाणामारी झाली. वास्तविक या घटनेची सुरुवात झाली, तेव्हा कोणतीही राजकीय किनार नव्हती. एका चौकात काही तरुण टोळके करुन बसतात, अशी तक्रार आल्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी, टोळके करुन बसू नका, असे सांगण्यास गेले होते. मात्र ही घटना पुढे वाढत गेली. पुढे पोलिसांनाच मारहाण होईपर्यंत हे प्रकरण वाढेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र अनपेक्षितपणे पोलिसांवर हल्ला झाला आणि भाजपविरुध्द राष्टÑवादीच्या मारहाण प्रकरणाला कलाटणी मिळाली.भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह अन्य दोन कार्यकर्ते तुरुंगात गेले. नगरसेवक अनिल कुत्ते, सचिन गुजर, जाफर मुजावर यांच्यासह अनेक बिनीचे पदाधिकारी तासगावबाहेर गेले आहेत. पोलिसी कारवाईचा ससेमिरा अद्यापही त्यांच्या मागे आहे. अटकेची टांगती तलवार या पदाधिकाऱ्यांवर कायम आहे.

नेतृत्व करणारे प्रमुख पदाधिकारीच शहराबाहेर गेल्यामुळे, शहरातील सामान्य कार्यकर्ता सैरभैर झाला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या पोलिसी कारवाईमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कारवाई टाळण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश मिळताना दिसून येत नाही.

कारवाई टाळण्यासाठी पोलीस प्रमुखांच्या बदलीची मागणी ऐरणीवर आली. मात्र गृहखातेच मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाला धार देता आली नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत भाजपच्या कार्यकर्त्यांची घुसमट सुरु असल्याचे चित्र आहे. शासनपातळीवर अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याने, शहरातील काकाप्रेमी कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर वाढत आहे.

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची राजकीय संधी साधत, राष्टÑवादीच्या राज्यातील नेत्यांनी खासदार संजयकाकांवर निशाणा साधला. किंंबहुना गृहखात्यावर टीकेची झोड उठवून मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. शहरातील भाजपच्या पहिल्या फळीतील पदाधिकाºयांंंवर या घटनेमुळे शहर सोडून जाण्याची नामुष्की आली आहे. पालिकेपासून राज्यापर्यंत सर्व सत्तास्थाने भाजपच्या हातात असूनदेखील पक्षीय पातळीवरुन मदतीसाठी अद्याप कोणीच पुढाकार घेतला नाही. याउलट भाजपच्या एका बड्या मंत्र्यामुळेच अडचणीत भर पडल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात सलत आहे. हे सर्व होत असताना खासदार संजयकाका पाटील यांनी अद्याप कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. खासदारांच्या मौनात काय दडले आहे? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.कार्यकर्त्यांवर गुन्हेनिवडणुकीच्या निमित्ताने हाणामारी झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही घटना टोकाला गेली, नव्हे तर नेत्यांच्याही हाताबाहेर गेली. पोलिसांकडून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता दोन्ही पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली