शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महापालिका क्षेत्रात उद्यापासून आठवडाभर जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सोमवारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ...

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सोमवारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवार, ५ ते मंगळवार ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

जिल्ह्यासह महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज १३०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील काही नगरपालिका व तालुक्यांच्या ठिकाणी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातही जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी काही संघटना व नगरसेवकांनी केली होती. याबाबत सोमवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते. या बैठकीत सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका क्षेत्रात दररोज दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या स्थिर असली तरी घट होणे आवश्यक आहे. शहरातील रुग्णालयात आणि होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. उदरनिर्वाह म्हणून भाजी, फळेविक्रेत्यांना परवानगी दिली होती, पण त्यांनी गैरफायदा घेतला. प्रशासनाच्या अंगावर येण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे आता बुधवार, ५ ते मंगळवार ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी महापौरांनी चर्चा केली. आमदार, खासदार, इतर पक्ष व सामाजिक संघटनांशी चर्चा सुरू आहे. सर्वांनीच जनता कर्फ्यूचे स्वागत केले आहे, असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

चौकट

काय बंद, काय सुरू...

या सात दिवसांच्या काळात औषध दुकाने, रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांची दुकाने सुरू राहतील. दूध व्यावसायिकांना सकाळी अकरापर्यंतच परवानगी असेल. पूर्वी किराणा दुकाने व भाजी विक्रेत्यांना सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसाय करता येत होता. पण आता दुकाने, रस्त्यावरील विक्री बंद राहील. त्यांना घरपोच सेवेची मुभा राहील. मात्र, त्यांनाही अकरापर्यंतच परवानगी असेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

चौकट

कॉल आल्यानंतर लसीकरणासाठी बाहेर पडा

महापालिका क्षेत्रात १८ व ४५ वर्षांवरील नागरिकांचे स्वतंत्र लसीकरण सुरू आहे. मात्र, लस कमी प्रमाणात येत आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून कॉल करून लसीकरणासाठी बोलावले जाणार आहे. त्यामुळे कॉल आल्यानंतरच लसीकरणासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले.