शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

चांदोलीतून सांगलीकरांना पाणी देण्यासाठी बैठक घेऊ, शरद पवार यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:15 IST

कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुंबईत बैठक

सांगली : सांगलीकरांच्यादृष्टीने चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांसाेबत मुंबईत रविवारी बैठक झाली. यावेळी शरद पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार आदी उपस्थित होते.

मुंबईतील बैठकीत सेवानिवृत्त अभियंता दिवाण यांनी चांदोली धरणातून थेट पाइपलाइनद्वारे सांगली शहराला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी आराखडे तयार होऊनसुद्धा त्यावरती लक्ष दिले जात नाही. सांगलीतील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न हा चिंतेचा विषय बनत आहे. महापालिकेने महासभेत ठराव मंजूर करूनही चांदोली धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव निधी नसल्याने प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले.शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात स्वयंसेवी संस्थांचे खूप महत्त्व आहे. म्हणून स्वयंसेवी संस्था कार्यरत राहणे अत्यंत गरजेचे आहे. या संस्थांचा अभ्यास राज्य शासनाला नक्कीच उपयोगी असतो. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पुराच्या प्रश्नावर राज्य शासनाबरोबर बैठक घेऊन ठोस तोडगा काढला जाईल. चांदोली धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी सांगलीकरांसाठी आणण्याचा फार महत्त्वाचा विषय आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून शासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.

नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जल आयोगासोबत बैठकखासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पूर प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय जल आयोगासोबत नोव्हेंबर महिन्यामध्ये बैठक घेण्यात येईल. या बैठकीस जलसंपदाचे अधिकारी, महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील सात महसूल विभागातील स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्यातही बैठक घेणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

विना खर्चाचे पुरावर उपायप्रभाकर केंगर म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे. या पुरावर विना खर्चाचे उपाय असूनही ते शासन राबवत नाही. तसेच महापूर हा नियंत्रित करता येतो, यासंबंधीचा अहवाल त्यांनी बैठकीत सादर केला.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवारWaterपाणी