शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळच्या विस्तारित याेजनेसाठी चार महिन्यांमध्ये मंजुरी मिळवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST

ओळ : उमदी (ता. जत) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा ॲड. चन्नाप्पा हाेर्तीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

ओळ : उमदी (ता. जत) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा ॲड. चन्नाप्पा हाेर्तीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी म्हळाप्पा पुजारी, सुरेशराव शिंदे उपस्थित हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमदी : वारणा प्रकल्पातून जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना सहा टीएमसी पाणी देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी चार महिन्यांत मंजुरी मिळवून अडीच वर्षांत काम पूर्ण करू, अशी ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी दिली.

वारणेतून सहा टीएमसी जादा पाणी जत तालुक्यास देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर प्रथमच जयंत पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्त ६५ गावांच्या वतीने उमदी (ता. जत) येथे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील उर्वरित गावांना पाणी देण्यासाठी बराच अभ्यास करावा लागला. लवादाप्रमाणे म्हैसाळ योजनेतून सध्याच्या योजनेनुसार तेवढेच पाणी देता येत होते. वारणा प्रकल्पातून पाण्याची मागणी कमी होती; त्यामुळे या योजनेतून जत तालुक्याला पाणी देण्याचे ठरले. अधिकाराचा वापर करून तसे पत्र कृष्णा खोरेला दिले आहे. राजारामबापूंनी उमदीला पाणी मिळण्यासाठी उमदी ते सांगली पदयात्रा काढली होती. ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही योजना हाती घेतली आहे. याची पहिली पायरी पूर्ण झाली आहे. डिझाईन करायला घेतले आहे. तिसऱ्या टप्प्यातून पाणी उचलले जाणार आहे. ३६ किलाेमीटर उताराने पाणी येऊन दोन जागी उचलले जाईल. त्यानंतर जत तालुक्यातही मिरवाड व मल्लाळ येथे पाणी उचलावे लागेल. त्यानंतर उताराने उर्वरित ६५ गावांना पाणी देता येणार आहे. यामुळे संपूर्ण जत तालुका सिंचनाखाली येणार आहे.

ॲड. चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले, जत तालुक्याला पाण्यासंदर्भात जेवणाच्या शेवटच्या पंगतीला तरी जेवण मिळाले, हे आम्ही भाग्य समजतो. नवीन विस्तारित योजनेला राजारामबापू पाटील यांचे नाव द्यावे.

याप्रसंगी एम. के. उर्फ म्हळाप्पा पुजारी, सुरेशराव शिंदे, उत्तम चव्हाण, रमेश पाटील यांची भाषणे झाली.

220821\img-20210822-wa0021.jpg

मंत्री जयंत पाटील यांचा६५ गावांच्यावतीने सत्कार करण्यात आला.