शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

पाणीदर येणार तीन रुपयांवर

By admin | Updated: September 19, 2015 23:58 IST

महापौरांची माहिती : व्यावसायिक पाणीपट्टीत वाढीचा विचार

सांगली : महापालिकेच्या खासगीकरणावरून सध्या विरोधकांसह स्वकीयांनीही कॉंग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशातच महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी पाणीदर कमी करण्याची घोषणा केली. घरगुती पाणीदर प्रति हजार लिटर ८ रुपयांवरून ३ रुपयांवर आणण्यात येईल, मात्र व्यावसायिक पाणीपट्टी तसेच चुकवेगिरी करणाऱ्यांची पाणीपट्टी वाढविणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पाणी खासगीकरणासाठी सत्ताधारी काँग्रेस सरसावली असतानाच, काँग्रेसचाच एक घटक असलेल्या मदनभाऊ युवा मंचने खासगीकरणालाच विरोध दर्शविला आहे. या धोरणातील त्रुटींवरच त्यांनी बोट ठेवले आहे. युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या पाणीदराची कागदपत्रे गोळा करून आयुक्तांकडे सादर केली होती. राज्यात कोणत्याही महापालिकेचा दर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेएवढा नाही. याठिकाणचा दर सर्वाधिक असल्यामुळे मीटर सुरू करून पाणी आकारणी चालू झाली, तर लोकांना प्रतिमाह ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टी येऊ शकते. त्यामुळे या दराने पाणीपट्टी परवडणारी नाही, असे मत मांडले होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा महसूल वाढला पाहिजे. पाणीगळती रोखून जादा पाणी वापर करणाऱ्यांवर अंकुश ठेवावाच लागेल. मात्र, या गोष्टी करताना प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होता कामा नये. मीटरप्रमाणे पाणी आकारणीस कोणाचाही विरोध नाही. मात्र त्यापूर्वी अन्य महापालिकांच्या पाणीदराचा विचार करून आपला पाणीदर कमी करावा, अशी मागणी मंचच्यावतीने करण्यात आली होती. महापौर कांबळे यांनी या गोष्टीची दखल घेत पाणीदर कमी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले. ते म्हणाले की, पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण होत असल्याचा आरोपच चुकीचा आहे. वास्तविक प्रायोगिक तत्त्वावर या गोष्टी आम्ही करीत आहोत. एकाच अपार्टमेंटमध्ये अनेक फ्लॅटधारक असतानाही किमान सरासरी पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. त्याशिवाय हॉटेल व अन्य बड्या व्यावसायिकांनाही दोन महिन्याला ३२० रुपयेच पाणीपट्टी आकारली जात आहे. या गोष्टी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. महसुलातील ही कोट्यवधी रुपयांची गळती थांबविण्याचा विचार आहे. त्यामुळे मीटरप्रमाणे पाणी आकारणी हा एक चांगला व व्यावहारिकदृष्ट्या योग्य पर्याय आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत. त्यादृष्टीने प्रतिहजार लिटर पाणीदर ५ रुपयांनी कमी करून तो ३ रुपयांवर आणण्याचा विचार झालेला आहे. त्यादृष्टीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)