शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनांना थकीत पाणीपट्टीचे ग्रहण

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक : टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची ६६ कोटी पाणीपट्टी, तर ४४ कोटीचे विद्युत बिल थकीत

अशोक डोंबाळे -- सांगली -जिल्ह्यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची ६६ कोटींची पाणीपट्टी आणि ४४ कोटीचे वीज बिल थकित आहे. शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थकित वीजबिल वसुलीचे मोठे आव्हान आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत बिल भरल्याशिवाय सिंचन योजनांचे पंप सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे दुष्काळी भागासाठी पुराचे पाणी उचलायचे म्हटले तरीही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे.टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळाला आहे. टेंभू योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यातील २२ हजार ८१३ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले आहे. टेंभू योजनेने दुष्काळामध्येही येथील पिके जगविली आहेत. या लाभक्षेत्राला पाणी देण्यासाठी २२ कोटी ५१ लाख रुपयांचा वीज खर्च आला आहे. यापैकी टंचाई योजनेतून ३३.५० टक्क्याची वीज सवलत मिळाली असून, ते ४ कोटी ७ लाख रुपये माफ झाले आहेत. उर्वरित ६ कोटी ३ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत. सध्या १२ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असून, ते शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतूनच भरावे लागणार आहे. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडे १२ कोटी ७७ लाख ८६ हजारांची पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टीमध्ये काही त्रुटी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पाणी मिळत नसतानाही तेथे पाणीपट्टी आकारली असून, ती कमी करण्याची गरज आहे. हा गोंधळ वगळता ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे, त्यांनी पाणीपट्टी भरल्यास सध्याचा थकीत वीज बिल भरण्याचा प्रश्न सुटणार आहे.टेंभू योजनेसारखीच ताकारी योजनेची परिस्थिती आहे. ताकारी योजनेचे १५ कोटी ७१ लाख वीज बिल थकीत असून, टंचाई सवलतीतून ४ कोटी ३९ लाख रुपये माफ झाले आहेत. शेतकऱ्यांकडून वसूल झालेल्या पाणीपट्टीतून ५ कोटी ३७ लाख रुपये भरले आहेत. सध्या ५ कोटी ९५ लाख रुपये भरायचे आहेत. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुली झाल्यास महावितरणची थकबाकी भरण्याचा प्रश्न लगेच सुटण्यासारखा आहे.ताकारी योजना कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत तीस कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. जुन्या थकबाकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. उर्वरित पाणीपट्टी शेतकऱ्यांवर निश्चित करूनच ती वसूल करावी लागणार आहे.म्हैसाळ योजनेचे सर्वाधिक ३४ कोटी ७३ लाखांचे वीज बिल थकीत आहे. यापैकी टंचाई योजनेतून सहा कोटी चार लाखांचे वीज बिल महावितरणने माफ केले आहे. शेतकऱ्यांकडून सहा कोटी ३३ लाखांची पाणीपट्टी वसूल करून वीज बिल आतापर्यंत भरले आहे. सध्या २२ कोटी ३६ लाखांचे वीज बिल थकीत आहे. या थकबाकीमध्ये चालूच्या एक कोटीच्या बिलाची भर पडली आहे. महावितरण कंपनीने वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुराचे पाणी दुष्काळग्रस्तांना द्यायचेच म्हटले, तर तिन्ही योजनांचे चालूचे चार कोटी रूपये तातडीने भरावे लागणार आहेत. त्यानंतरच सिंचन योजना सुरू करून दुष्काळग्रस्तांना पाणी देणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्येही पाणीपट्टी भरण्याविषयी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जागृती करण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरली, तर रिकामे तलाव सिंचन योजनेच्या पाण्यातून भरणे शक्य होणार आहे.मध्यम प्रकल्प : केवळ ३५ टक्के पाणीसाठापावसाळ्यात मुबलक पाण्याचा साठा असणारे महत्त्वाचे पाच मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये पावसाळ्यातच केवळ ३५ टक्के पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या दि. १४ जुलै २०१६ रोजीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. यामध्ये सिध्देवाडी (ता. तासगाव), जत तालुक्यातील दोड्डनाला, संख या तीन मध्यम प्रकल्पात शून्य पाणीसाठा आहे. बसाप्पावाडी तलावामध्ये १२ टक्के, तर शिराळा तालुक्यातील मोरणा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.