शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

सिंचन योजनांना थकीत पाणीपट्टीचे ग्रहण

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक : टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची ६६ कोटी पाणीपट्टी, तर ४४ कोटीचे विद्युत बिल थकीत

अशोक डोंबाळे -- सांगली -जिल्ह्यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची ६६ कोटींची पाणीपट्टी आणि ४४ कोटीचे वीज बिल थकित आहे. शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थकित वीजबिल वसुलीचे मोठे आव्हान आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत बिल भरल्याशिवाय सिंचन योजनांचे पंप सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे दुष्काळी भागासाठी पुराचे पाणी उचलायचे म्हटले तरीही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे.टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळाला आहे. टेंभू योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यातील २२ हजार ८१३ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले आहे. टेंभू योजनेने दुष्काळामध्येही येथील पिके जगविली आहेत. या लाभक्षेत्राला पाणी देण्यासाठी २२ कोटी ५१ लाख रुपयांचा वीज खर्च आला आहे. यापैकी टंचाई योजनेतून ३३.५० टक्क्याची वीज सवलत मिळाली असून, ते ४ कोटी ७ लाख रुपये माफ झाले आहेत. उर्वरित ६ कोटी ३ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत. सध्या १२ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असून, ते शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतूनच भरावे लागणार आहे. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडे १२ कोटी ७७ लाख ८६ हजारांची पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टीमध्ये काही त्रुटी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पाणी मिळत नसतानाही तेथे पाणीपट्टी आकारली असून, ती कमी करण्याची गरज आहे. हा गोंधळ वगळता ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे, त्यांनी पाणीपट्टी भरल्यास सध्याचा थकीत वीज बिल भरण्याचा प्रश्न सुटणार आहे.टेंभू योजनेसारखीच ताकारी योजनेची परिस्थिती आहे. ताकारी योजनेचे १५ कोटी ७१ लाख वीज बिल थकीत असून, टंचाई सवलतीतून ४ कोटी ३९ लाख रुपये माफ झाले आहेत. शेतकऱ्यांकडून वसूल झालेल्या पाणीपट्टीतून ५ कोटी ३७ लाख रुपये भरले आहेत. सध्या ५ कोटी ९५ लाख रुपये भरायचे आहेत. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुली झाल्यास महावितरणची थकबाकी भरण्याचा प्रश्न लगेच सुटण्यासारखा आहे.ताकारी योजना कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत तीस कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. जुन्या थकबाकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. उर्वरित पाणीपट्टी शेतकऱ्यांवर निश्चित करूनच ती वसूल करावी लागणार आहे.म्हैसाळ योजनेचे सर्वाधिक ३४ कोटी ७३ लाखांचे वीज बिल थकीत आहे. यापैकी टंचाई योजनेतून सहा कोटी चार लाखांचे वीज बिल महावितरणने माफ केले आहे. शेतकऱ्यांकडून सहा कोटी ३३ लाखांची पाणीपट्टी वसूल करून वीज बिल आतापर्यंत भरले आहे. सध्या २२ कोटी ३६ लाखांचे वीज बिल थकीत आहे. या थकबाकीमध्ये चालूच्या एक कोटीच्या बिलाची भर पडली आहे. महावितरण कंपनीने वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुराचे पाणी दुष्काळग्रस्तांना द्यायचेच म्हटले, तर तिन्ही योजनांचे चालूचे चार कोटी रूपये तातडीने भरावे लागणार आहेत. त्यानंतरच सिंचन योजना सुरू करून दुष्काळग्रस्तांना पाणी देणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्येही पाणीपट्टी भरण्याविषयी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जागृती करण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरली, तर रिकामे तलाव सिंचन योजनेच्या पाण्यातून भरणे शक्य होणार आहे.मध्यम प्रकल्प : केवळ ३५ टक्के पाणीसाठापावसाळ्यात मुबलक पाण्याचा साठा असणारे महत्त्वाचे पाच मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये पावसाळ्यातच केवळ ३५ टक्के पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या दि. १४ जुलै २०१६ रोजीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. यामध्ये सिध्देवाडी (ता. तासगाव), जत तालुक्यातील दोड्डनाला, संख या तीन मध्यम प्रकल्पात शून्य पाणीसाठा आहे. बसाप्पावाडी तलावामध्ये १२ टक्के, तर शिराळा तालुक्यातील मोरणा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.