शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
6
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
7
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
8
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
9
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
10
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
12
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
13
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
14
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
15
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
16
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
17
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
18
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
19
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
20
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा

टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:46 IST

आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.

ठळक मुद्देटेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलालराजकीय कारकीर्दीत प्रथमच डबल आमदार

अविनाश बाड आटपाडी : आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच डबल आमदार झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. बाबर यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येतील आणि सक्षम आव्हान उभे करतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली आणि मतदारसंघातील राजकीय समीकरण एकदम उलटे झाले. खासदार संजयकाका पाटील यांनी देशमुख बंधूंशी केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरली.

देशमुख गटाचे कार्यकर्ते आधी खूप संताप व्यक्त करीत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह नेत्यांची पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर निवडणुकीचे चित्र पालटले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनाही मेळावा घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यांनीही ठामपणे पाठिंबा जाहीर करून युतीधर्म पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, कॉँग्रेसचे जयदीप भोसले, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.विशेष म्हणजे नेत्यांनी कुठेच आतून-बाहेरून शंकास्पद काहीही केले नाही. अर्थात ज्या कार्यकर्त्यांना अगदी तुरुंगवारी झाली, अशा थोड्या अतिनाराज मंडळींनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची कपबशी हाती घेतली. पण हा अपवाद वगळता खानापूर तालुक्याचे मतदान जादा असूनही आटपाडी तालुक्याने बाबर यांना १७ हजार ७५० एवढे मताधिक्य दिले. त्यामुळे शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आटपाडीकरांचाच मोठा वाटा आहे.

दुसरीकडे सदाशिवराव पाटील आटपाडी तालुक्यातील उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी शक्यता व्यक्त होत असताना, त्यांनी अंधारात उडी मारली. निवडणुकीआधी काही दिवसच त्यांनी तालुक्यात संपर्क केला. त्यामुळे हंगामी राजकारणी अशी त्यांच्यावर टीका झाली. या धोरणात त्यांनी बदल करण्याची गरज आहे.

टॅग्स :khanapur-acखानापूरSangliसांगलीAnil Baburअनिल बाबर