शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:46 IST

आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.

ठळक मुद्देटेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलालराजकीय कारकीर्दीत प्रथमच डबल आमदार

अविनाश बाड आटपाडी : आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच डबल आमदार झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. बाबर यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येतील आणि सक्षम आव्हान उभे करतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली आणि मतदारसंघातील राजकीय समीकरण एकदम उलटे झाले. खासदार संजयकाका पाटील यांनी देशमुख बंधूंशी केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरली.

देशमुख गटाचे कार्यकर्ते आधी खूप संताप व्यक्त करीत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह नेत्यांची पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर निवडणुकीचे चित्र पालटले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनाही मेळावा घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यांनीही ठामपणे पाठिंबा जाहीर करून युतीधर्म पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, कॉँग्रेसचे जयदीप भोसले, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.विशेष म्हणजे नेत्यांनी कुठेच आतून-बाहेरून शंकास्पद काहीही केले नाही. अर्थात ज्या कार्यकर्त्यांना अगदी तुरुंगवारी झाली, अशा थोड्या अतिनाराज मंडळींनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची कपबशी हाती घेतली. पण हा अपवाद वगळता खानापूर तालुक्याचे मतदान जादा असूनही आटपाडी तालुक्याने बाबर यांना १७ हजार ७५० एवढे मताधिक्य दिले. त्यामुळे शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आटपाडीकरांचाच मोठा वाटा आहे.

दुसरीकडे सदाशिवराव पाटील आटपाडी तालुक्यातील उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी शक्यता व्यक्त होत असताना, त्यांनी अंधारात उडी मारली. निवडणुकीआधी काही दिवसच त्यांनी तालुक्यात संपर्क केला. त्यामुळे हंगामी राजकारणी अशी त्यांच्यावर टीका झाली. या धोरणात त्यांनी बदल करण्याची गरज आहे.

टॅग्स :khanapur-acखानापूरSangliसांगलीAnil Baburअनिल बाबर