शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:46 IST

आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.

ठळक मुद्देटेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलालराजकीय कारकीर्दीत प्रथमच डबल आमदार

अविनाश बाड आटपाडी : आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच डबल आमदार झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. बाबर यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येतील आणि सक्षम आव्हान उभे करतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली आणि मतदारसंघातील राजकीय समीकरण एकदम उलटे झाले. खासदार संजयकाका पाटील यांनी देशमुख बंधूंशी केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरली.

देशमुख गटाचे कार्यकर्ते आधी खूप संताप व्यक्त करीत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह नेत्यांची पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर निवडणुकीचे चित्र पालटले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनाही मेळावा घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यांनीही ठामपणे पाठिंबा जाहीर करून युतीधर्म पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, कॉँग्रेसचे जयदीप भोसले, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.विशेष म्हणजे नेत्यांनी कुठेच आतून-बाहेरून शंकास्पद काहीही केले नाही. अर्थात ज्या कार्यकर्त्यांना अगदी तुरुंगवारी झाली, अशा थोड्या अतिनाराज मंडळींनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची कपबशी हाती घेतली. पण हा अपवाद वगळता खानापूर तालुक्याचे मतदान जादा असूनही आटपाडी तालुक्याने बाबर यांना १७ हजार ७५० एवढे मताधिक्य दिले. त्यामुळे शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आटपाडीकरांचाच मोठा वाटा आहे.

दुसरीकडे सदाशिवराव पाटील आटपाडी तालुक्यातील उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी शक्यता व्यक्त होत असताना, त्यांनी अंधारात उडी मारली. निवडणुकीआधी काही दिवसच त्यांनी तालुक्यात संपर्क केला. त्यामुळे हंगामी राजकारणी अशी त्यांच्यावर टीका झाली. या धोरणात त्यांनी बदल करण्याची गरज आहे.

टॅग्स :khanapur-acखानापूरSangliसांगलीAnil Baburअनिल बाबर