शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागात ‘खळळ्-खट्याक’

By admin | Updated: February 23, 2015 23:56 IST

दूषित पाणीपुरवठ्याबाबत संताप : कार्यालयाच्या काचा फोडून मोडतोड

सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केली. त्यांच्या ‘खळ्ळ्-खट्याक’ आंदोलनामुळे पाणीपुरवठा विभागात पळापळ सुरू झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्याने आंदोलनकर्ते निवेदन देऊन परतले. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता पंचवीस कार्यकर्त्यांसह ते हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात दाखल झाले. दूषित पाणीपुरवठ्याबद्दल महापालिकेचा निषेध करीत त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी लाथा घालून काचा फोडल्या. फर्निचरचीही मोडतोड केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याठिकाणी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना अडविले. निवेदन देऊन शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्यामुळे याठिकाणच्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील साडेपाच लाख लोकांना महापालिका पाणीपुरवठा करते. ६५ हजार ग्राहकांकडून दरवर्षी वीस ते बावीस कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही माळबंगला व हिराबाग येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये सध्या ढिसाळ कारभार सुरू आहे. त्यामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नाही. महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रोने १३ जणांचा बळी गेल्यानंतरही नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरूच आहे. जलशुद्धीकरण केंद्रातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात स्वाती शिंदे, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, निखिल जगताप, प्रियानंद कांबळे, रामभाऊ सूर्यवंशी, बाजीराव गस्ते, गजानन कांबळे, रोहित घुबडे-पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)विश्रामबागमध्ये अशुद्ध पाणीपुरवठाविश्रामबाग येथील दत्तनगर, महालक्ष्मी चौक, सावरकर कॉलनी, नागराज कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील नागरिकांनी आज, सोमवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पाण्याला दुर्गंधीही येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केल्यानंतर व्यवस्थित उत्तर दिले जात नाही. नागरिकांच्यादृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी गढूळ पाण्याच्या बाटल्याही आयुक्तांना दाखविल्या. आयुक्तांनी याबाबत तपासणीचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. निवेदन देतेवेळी सुनील पट्टणशेट्टी, कौस्तुभ कुलकर्णी, अनिकेत मिक्कल, सतीश जगदाळे, सूरज शरणाथे, राजू बंडगर आदी उपस्थित होते.