शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पाणीपुरवठा विभागात ‘खळळ्-खट्याक’

By admin | Updated: February 23, 2015 23:56 IST

दूषित पाणीपुरवठ्याबाबत संताप : कार्यालयाच्या काचा फोडून मोडतोड

सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केली. त्यांच्या ‘खळ्ळ्-खट्याक’ आंदोलनामुळे पाणीपुरवठा विभागात पळापळ सुरू झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्याने आंदोलनकर्ते निवेदन देऊन परतले. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता पंचवीस कार्यकर्त्यांसह ते हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात दाखल झाले. दूषित पाणीपुरवठ्याबद्दल महापालिकेचा निषेध करीत त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी लाथा घालून काचा फोडल्या. फर्निचरचीही मोडतोड केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याठिकाणी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना अडविले. निवेदन देऊन शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्यामुळे याठिकाणच्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील साडेपाच लाख लोकांना महापालिका पाणीपुरवठा करते. ६५ हजार ग्राहकांकडून दरवर्षी वीस ते बावीस कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही माळबंगला व हिराबाग येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये सध्या ढिसाळ कारभार सुरू आहे. त्यामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नाही. महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रोने १३ जणांचा बळी गेल्यानंतरही नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरूच आहे. जलशुद्धीकरण केंद्रातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात स्वाती शिंदे, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, निखिल जगताप, प्रियानंद कांबळे, रामभाऊ सूर्यवंशी, बाजीराव गस्ते, गजानन कांबळे, रोहित घुबडे-पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)विश्रामबागमध्ये अशुद्ध पाणीपुरवठाविश्रामबाग येथील दत्तनगर, महालक्ष्मी चौक, सावरकर कॉलनी, नागराज कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील नागरिकांनी आज, सोमवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पाण्याला दुर्गंधीही येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केल्यानंतर व्यवस्थित उत्तर दिले जात नाही. नागरिकांच्यादृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी गढूळ पाण्याच्या बाटल्याही आयुक्तांना दाखविल्या. आयुक्तांनी याबाबत तपासणीचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. निवेदन देतेवेळी सुनील पट्टणशेट्टी, कौस्तुभ कुलकर्णी, अनिकेत मिक्कल, सतीश जगदाळे, सूरज शरणाथे, राजू बंडगर आदी उपस्थित होते.