शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई; दोन दिवसांतून पाणी तेही गढूळ 

By अशोक डोंबाळे | Updated: February 26, 2024 15:43 IST

नागरिकांची खासगी जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी गर्दी

सांगली : कृष्णा नदीतच अपुरा पाणीसाठा असल्यामुळे सांगली शहराला अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सांगलीतील घन:शामनगर, विकासनगर, चिंतामणीनगर परिसराला तर गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा एक दिवसाआड एक दिवस पाणी येत आहे. दोन दिवसांतून मिळणारे पाणीही पुरेशा दाबाने होत नसल्यामुळे नागरिकांच्या घरावरील पाण्याच्या टाक्या रिकाम्याच राहिल्या आहेत. नागरिकांना गेल्या २० वर्षांत प्रथमच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.मार्च, एप्रिल महिन्यापूर्वीच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच सांगली शहराच्या उपनगरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सांगली शहरापासून जवळच असलेल्या घन:शामनगर, विकासनगर, वसंतदादा कारखाना परिसर, पंचशीलनगर, राजनगर, संजयनगर, चिंतामणीनगर, कलानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; पण तोही दूषित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. घरातील पाण्याच्या टाक्याही रिकाम्या झाल्यामुळे विकतचे पाणी नागरिकांना घ्यावे लागत आहे. पिण्यासाठी तर खासगी जलशुद्धीकरण केंद्रावरून नागरिक पाणी विकतचे घेत आहेत. तरीही या परिसरातील लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नागरिकांवर विकतचे पाणी पिण्याची वेळघन:शामनगर, चिंतामणीनगर, राजनगर, विकासनगर, पंचशीलनगर, वसंतदादा कारखाना परिसरात दोन दिवसांतून पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा गढूळ होत असल्यामुळे नागरिकांना खासगी जलशुद्धीकरण केंद्रावरुन पिण्यासाठी पाणी विकतचे आणावे लागत आहे. खासगी जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पाणीपुरवठा विभागाचा सावळा गोंधळघन:शामनगर, चिंतामणीनगर, राजनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पाणी टंचाईबद्दल विचारणा केली. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई असल्यामुळे एक दिवसाआड एक दिवस पाणीपुरवठा होत आहे. पाणी अशुद्ध पुरवठ्याबद्दल आम्हालाही काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.

खासदार, आमदारांचेही दुर्लक्षशहरातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असताना खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पाणी टंचाईवर काहीच उपाययोजना केल्या नाहीत, असाही नागरिकांमधून आरोप होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार की नाही, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी