शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती

By संतोष भिसे | Updated: June 25, 2023 19:59 IST

कोयनेत ३० दिवसांचाच साठा, पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही

सांगली: कृष्णा नदीतील उपसाबंदी उठवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा महिनाभरच पुरणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सर्व दबाव झुगारुन उपसाबंदीवर ठाम रहावे असे आवाहन कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केले आहे.

समितीतर्फे विजयकुमार दिवाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उपसा सुरुच राहिल्यास संकट उद्भवेल. पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही. दरम्यान, धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरलेला असताना जलसंपदा विभाग मात्र उपसाबंदीविषयी धरसोड करत आहे. २३ ते २६ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश जारी केला होता. तो मागे घेताना रविवारपासून (दि. २५) उपशाला परवानगी देण्यात आली. सर्व योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी सांगली व साताऱ्याच्या महावितरणला कळविण्यात आले.

यावर समितीने आक्षेप घेतला आहे. दिवाण यांनी सांगितले की, कोयनेत सध्या ५.५६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दररोज २१०० क्युसेक क्षमतेने उपशामुळे महिन्याभरात सुमारे ६३००० क्युसेक पाणी धरणातून नदीत येईल. म्हणजे ५.५० टीएमसी पाण्याचा उपसा होईल. आगामी ३० दिवस कसेबसे पाणी पुरेल. त्यानंतर मात्र धरणात खडखडाट निर्माण होणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस लांबला, किंवा कमी प्रमाणात झाला, तर सांगली, साताऱ्यात हाहाकार उडेल.

आठवडाभर उपसाबंदी लागू करासमितीने म्हटले आहे की, सर्व उपसा सिंचन योजना आठवडाभर बंद ठेवाव्यात. त्यानंतर पाऊस व धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उपसाबंदीबाबत पुढील निर्णय घ्यावा. जलसंपदा विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता निर्णय घ्यावेत. नियोजन करावे. सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाला अद्याप सुरुवात झालेला नाही याचा गांभीर्याने विचार करावा.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरण