शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती

By संतोष भिसे | Updated: June 25, 2023 19:59 IST

कोयनेत ३० दिवसांचाच साठा, पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही

सांगली: कृष्णा नदीतील उपसाबंदी उठवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा महिनाभरच पुरणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सर्व दबाव झुगारुन उपसाबंदीवर ठाम रहावे असे आवाहन कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केले आहे.

समितीतर्फे विजयकुमार दिवाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उपसा सुरुच राहिल्यास संकट उद्भवेल. पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही. दरम्यान, धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरलेला असताना जलसंपदा विभाग मात्र उपसाबंदीविषयी धरसोड करत आहे. २३ ते २६ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश जारी केला होता. तो मागे घेताना रविवारपासून (दि. २५) उपशाला परवानगी देण्यात आली. सर्व योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी सांगली व साताऱ्याच्या महावितरणला कळविण्यात आले.

यावर समितीने आक्षेप घेतला आहे. दिवाण यांनी सांगितले की, कोयनेत सध्या ५.५६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दररोज २१०० क्युसेक क्षमतेने उपशामुळे महिन्याभरात सुमारे ६३००० क्युसेक पाणी धरणातून नदीत येईल. म्हणजे ५.५० टीएमसी पाण्याचा उपसा होईल. आगामी ३० दिवस कसेबसे पाणी पुरेल. त्यानंतर मात्र धरणात खडखडाट निर्माण होणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस लांबला, किंवा कमी प्रमाणात झाला, तर सांगली, साताऱ्यात हाहाकार उडेल.

आठवडाभर उपसाबंदी लागू करासमितीने म्हटले आहे की, सर्व उपसा सिंचन योजना आठवडाभर बंद ठेवाव्यात. त्यानंतर पाऊस व धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उपसाबंदीबाबत पुढील निर्णय घ्यावा. जलसंपदा विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता निर्णय घ्यावेत. नियोजन करावे. सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाला अद्याप सुरुवात झालेला नाही याचा गांभीर्याने विचार करावा.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरण