शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

करमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:30 IST

Shirla Dam Water Sangli :  शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.

ठळक मुद्देकरमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार

विकास शहाशिराळा  :  तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.तालुक्यातील पावलेवाडी नं १ , पावलेवाडी नं २ , बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं १ , शिरशी नं १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी , पानुम्बरे तर्फ शिराळा नं २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १००%, चव्हाण वाडी नं.१ ,गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं २ , वाकुर्डे खुर्द या मध्ये (३०%), शिरसटवाडी , गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं २ या मध्ये (३५%) ,पाडळी , लादेवाडी या मध्ये (४०%) येळापूर ( चव्हानवाडी) , तडवळे ( वाडदरा) ( कुंदनाला) , निगडी (महारदरा), धामवडे ,वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द या मध्ये (४५%) मेणी ( संकुपीनाला) , अटूगडेवाडी (मेणी) , शिरशी ( कासारकी) करमाळा नं १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं १ पाडळीवाडी यामध्ये (५०%) भाटशिरगाव या मध्ये (५५%) खिरवडे , बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६०%) बादेवाडी ( वाकुर्डे बुद्रुक)या मध्ये ( ७०%) , भैरववाडी ,तडवळे नं१ या मध्ये (२०%) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर इंधन विहिरी ५३० असून यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितले प्रमाणे कार्यकारी अभियंता डी डी शिंदे , वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस देवकर , लालासाहेब मोरे , एस डी देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

 

एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.१ मार्च पासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे.

-एस.डी देसाई,शाखा अभियंता , शिराळामोरणा प्रकल्प

 

  • करमजाई तलाव ९९ % ,
  • अंत्री बुद्रुक तलाव १३%
  • शिवणी तलाव १५%
  • टाकवे तलाव २४%
  • रेठरे धरण तलाव १%
  • कार्वे तलाव २०%
  • मोरणा मध्यम प्रकल्प २५% 
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीshirala-acशिराळा