शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

करमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:30 IST

Shirla Dam Water Sangli :  शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.

ठळक मुद्देकरमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार

विकास शहाशिराळा  :  तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.तालुक्यातील पावलेवाडी नं १ , पावलेवाडी नं २ , बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं १ , शिरशी नं १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी , पानुम्बरे तर्फ शिराळा नं २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १००%, चव्हाण वाडी नं.१ ,गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं २ , वाकुर्डे खुर्द या मध्ये (३०%), शिरसटवाडी , गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं २ या मध्ये (३५%) ,पाडळी , लादेवाडी या मध्ये (४०%) येळापूर ( चव्हानवाडी) , तडवळे ( वाडदरा) ( कुंदनाला) , निगडी (महारदरा), धामवडे ,वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द या मध्ये (४५%) मेणी ( संकुपीनाला) , अटूगडेवाडी (मेणी) , शिरशी ( कासारकी) करमाळा नं १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं १ पाडळीवाडी यामध्ये (५०%) भाटशिरगाव या मध्ये (५५%) खिरवडे , बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६०%) बादेवाडी ( वाकुर्डे बुद्रुक)या मध्ये ( ७०%) , भैरववाडी ,तडवळे नं१ या मध्ये (२०%) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर इंधन विहिरी ५३० असून यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितले प्रमाणे कार्यकारी अभियंता डी डी शिंदे , वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस देवकर , लालासाहेब मोरे , एस डी देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

 

एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.१ मार्च पासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे.

-एस.डी देसाई,शाखा अभियंता , शिराळामोरणा प्रकल्प

 

  • करमजाई तलाव ९९ % ,
  • अंत्री बुद्रुक तलाव १३%
  • शिवणी तलाव १५%
  • टाकवे तलाव २४%
  • रेठरे धरण तलाव १%
  • कार्वे तलाव २०%
  • मोरणा मध्यम प्रकल्प २५% 
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीshirala-acशिराळा