शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

सांगली जिल्ह्यातील साडेसहाशे ठिकाणचे पाणी दूषित

By admin | Updated: June 1, 2014 01:14 IST

ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड : ग्रामपंचायतींवर होणार कारवाई

सांगली : जिल्ह्यातील १ एप्रिल २०१३ ते ३० एप्रिल २०१४ या कालावधित ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील चार हजार ९१४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले होते. यापैकी ७८ गावांमधील ६५३ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले असून, त्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. दूषित पाण्याबाबत महिन्यात उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दूषित पाण्याबाबत प्रत्येक गावामध्ये जागृती केली जात आहे. तसेच गावांना दूषित पाणी पुरवठा होत आहे का? याचा शोध घेण्यासाठी पाणी स्त्रोताचे नमुने घेतले जात आहेत. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने वर्षभरात चार हजार ९१४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये ७८ गावांमधील ६५३ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे या सर्व ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील आटपाडी, दिघंची, खरसुंडी, करगणी, गोमेवाडीसह १७ गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना सध्या पिवळे कार्ड दिले असून, सुधारणा न झाल्यास त्यांना रेड कार्ड देण्यात येणार आहे. वाळवा तालुक्यातील शिगाव, कोरेगाव, शिरटे, जत तालुक्यात उटगी, मेंढीगिरी, कोळगिरी, कडेगाव तालुक्यातील सोहली, कडेगाव, रायबाग, आमरापूर, वांगी आदी १४ गावे, मिरज तालुक्यातील लिंगनूर, कवलापूर, सांबारवाडी, काकडवाडी, शिराळा तालुक्यातील कणदूर, सोनवडे, तासगाव तालुक्यातील कुमठे, उपळावे, सावळज आदी दहा गावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, आरेवाडी, नागज, बोरगावमध्ये दूषित पाणी आढळले आहे. येथील ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले असून, त्यांना दूषित पाण्याबाबत उपयायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६२६ ठिकाणचे पाण्याचे नमुने चांगले आढळले असून तेथील गावांना हिरवे कार्ड दिले आहे. जिल्ह्यातील १८ गावांमधील पाण्याचे नमुने तीव्र जोखमीचे आढळून आले आहेत. येथील ग्रामपंचायतींनी दूषित पाण्याबाबत दक्षता न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)