शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तासगाव पूर्वमध्ये पाण्याचे राजकारण पेटले

By admin | Updated: November 20, 2015 00:20 IST

विसापूर-पुणदी योजनेचे राजकारण : पाणी सोडण्यावरून पूर्व भागात संघर्षाची चिन्हे

प्रवीण पाटील -सावळज--तासगाव पूर्व भागासाठी असलेल्या बहुचर्चित विसापूर-पुणदी या उपसा जलसिंचन योजनेला आतापर्यंत जेवढे पाणी आले, त्याच्या किती तरी पटीने जास्त या योजनेचे राजकारण करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या प्रयत्नाने ही योजना झाली. मात्र योजनेच्या भूमिपूजनापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांजर्डे येथे पाणी परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला व पूर्व भागासाठी पाणी योजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आाला. त्यावेळी खा. संजयकाका पाटीलही राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे तालुक्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वाभिमानीच्या महेश खराडेंनी घेतली. त्यास शेतकऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. स्वाभिमानीच्या पाणी परिषदेनंतर आठच दिवसात राष्ट्रवादीने त्याच ठिकाणी जाहीर सभा घेऊन विसापूर-पुणदी योजनेचा व्यासपीठावरच नारळ फोडण्यात आला. अतिशय जलदगतीने या योजनेचे काम करुन आर. आर. पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचे उद्घाटन घेऊन, पूर्व भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढल्याचे जाहीर केले. या योजनेमधून सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीन वेळा भरण्याची तरतूद केल्याचे सांगण्यात आले व विधानसभा निवडणुकीला या योजनेचा पुरेपूर फायदा करुन घेण्यात आला.राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेल्यानंतर प्रारंभी विसापूर-पुणदी योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या खा. संजयकाकांनी नंतर ही योजना सुरु करुन या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परवाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बिरणवाडीमधून अग्रणी नदीमध्ये या योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले. यावरुन खासदार व आमदारांनी स्वतंत्ररित्या आमच्याच प्रयत्नाने हे पाणी सोडल्याचे सांगितले. यावरून आमदार व खासदारांमध्ये या पाण्यावरून चांगलाच श्रेयवाद रंगला.आतापर्यंत स्वाभिमानी, राष्ट्रवादी व भाजपने या योजनेचे राजकीय भांडवल करून त्याचा राजकारणासाठी पुरेपूर फायदा करुन घेतला. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कधी होणार? हा प्रश्नच आहे. सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीनदा भरण्याची तरतूद असूनही, ३०२ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या तलावामध्ये गेल्या एका वर्षात १० दशलक्ष घनफूटही या योजनेचे पाणी आले नाही, हे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. फक्त निवडणुकांच्या तोंडावर पाणी येते. त्यामुळे ते निवडणुकांसाठी आहे की शेतीसाठी? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खासदार-आमदारांनी श्रेयवाद थांबवून शेतकऱ्यांना पाणी देण्याची गरज आहे.पाण्यासाठी संघर्ष नको, समन्वय हवाविसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सावळज व वायफळे येथील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सिद्धेवाडी तलावामधील पेड प्रादेशिक व सावळजला पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. शिवाय या तलावात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या उर्वरित शेतीला तरी पाणी मिळावे, ही वायफळे येथील नेत्यांची अपेक्षा आहे. तसेच सावळजलाही शेती पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्याची तीव्र गरज आहे. त्यामुळे वायफळे व सावळज येथील नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संघर्ष न करता एकत्रितपणे समन्वयाने हा प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. खासदार, आमदारांनी श्रेयवाद थांबविण्याची गरजखासदार व आमदारांनी या योजनेचा श्रेयवाद थांबवावा व एकत्रितपणे टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना सातत्याने कशी सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, पूर्व भागातील आठ गावांच्या योजनेतील समावेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज असल्याची भावना पूर्व भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.