शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

तासगाव पूर्वमध्ये पाण्याचे राजकारण पेटले

By admin | Updated: November 20, 2015 00:20 IST

विसापूर-पुणदी योजनेचे राजकारण : पाणी सोडण्यावरून पूर्व भागात संघर्षाची चिन्हे

प्रवीण पाटील -सावळज--तासगाव पूर्व भागासाठी असलेल्या बहुचर्चित विसापूर-पुणदी या उपसा जलसिंचन योजनेला आतापर्यंत जेवढे पाणी आले, त्याच्या किती तरी पटीने जास्त या योजनेचे राजकारण करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या प्रयत्नाने ही योजना झाली. मात्र योजनेच्या भूमिपूजनापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांजर्डे येथे पाणी परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला व पूर्व भागासाठी पाणी योजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आाला. त्यावेळी खा. संजयकाका पाटीलही राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे तालुक्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वाभिमानीच्या महेश खराडेंनी घेतली. त्यास शेतकऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. स्वाभिमानीच्या पाणी परिषदेनंतर आठच दिवसात राष्ट्रवादीने त्याच ठिकाणी जाहीर सभा घेऊन विसापूर-पुणदी योजनेचा व्यासपीठावरच नारळ फोडण्यात आला. अतिशय जलदगतीने या योजनेचे काम करुन आर. आर. पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचे उद्घाटन घेऊन, पूर्व भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढल्याचे जाहीर केले. या योजनेमधून सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीन वेळा भरण्याची तरतूद केल्याचे सांगण्यात आले व विधानसभा निवडणुकीला या योजनेचा पुरेपूर फायदा करुन घेण्यात आला.राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेल्यानंतर प्रारंभी विसापूर-पुणदी योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या खा. संजयकाकांनी नंतर ही योजना सुरु करुन या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परवाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बिरणवाडीमधून अग्रणी नदीमध्ये या योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले. यावरुन खासदार व आमदारांनी स्वतंत्ररित्या आमच्याच प्रयत्नाने हे पाणी सोडल्याचे सांगितले. यावरून आमदार व खासदारांमध्ये या पाण्यावरून चांगलाच श्रेयवाद रंगला.आतापर्यंत स्वाभिमानी, राष्ट्रवादी व भाजपने या योजनेचे राजकीय भांडवल करून त्याचा राजकारणासाठी पुरेपूर फायदा करुन घेतला. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कधी होणार? हा प्रश्नच आहे. सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीनदा भरण्याची तरतूद असूनही, ३०२ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या तलावामध्ये गेल्या एका वर्षात १० दशलक्ष घनफूटही या योजनेचे पाणी आले नाही, हे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. फक्त निवडणुकांच्या तोंडावर पाणी येते. त्यामुळे ते निवडणुकांसाठी आहे की शेतीसाठी? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खासदार-आमदारांनी श्रेयवाद थांबवून शेतकऱ्यांना पाणी देण्याची गरज आहे.पाण्यासाठी संघर्ष नको, समन्वय हवाविसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सावळज व वायफळे येथील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सिद्धेवाडी तलावामधील पेड प्रादेशिक व सावळजला पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. शिवाय या तलावात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या उर्वरित शेतीला तरी पाणी मिळावे, ही वायफळे येथील नेत्यांची अपेक्षा आहे. तसेच सावळजलाही शेती पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्याची तीव्र गरज आहे. त्यामुळे वायफळे व सावळज येथील नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संघर्ष न करता एकत्रितपणे समन्वयाने हा प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. खासदार, आमदारांनी श्रेयवाद थांबविण्याची गरजखासदार व आमदारांनी या योजनेचा श्रेयवाद थांबवावा व एकत्रितपणे टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना सातत्याने कशी सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, पूर्व भागातील आठ गावांच्या योजनेतील समावेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज असल्याची भावना पूर्व भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.