शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

म्हैसाळ योजनेचे पाणी कुंभारी परिसरात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील कोसारी, कुंभारी परिसरात पोहोचले आहे. तो सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांत पुरवण्याचे नियोजन ...

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील कोसारी, कुंभारी परिसरात पोहोचले आहे. तो सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांत पुरवण्याचे नियोजन असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले.

कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची संकल्पना आहे, त्यातून गतवर्षीपासून पावसाळ्यात म्हैसाळ प्रकल्पाचे पंप सुरू करण्यात येत आहेत. यावर्षीही १६ ऑगस्टला पहिल्या टप्प्यातून उपसा सुरू झाला. शनिवारी (दि. २१) पाचव्या टप्प्याचे पंप सुरू झाले. सध्या मुख्य कालवे दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णेचे पाणी जतसह सांगोला, मंगळवेढा तालुक्यांनाही दिले जाणार आहे. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले की, या तालुक्यांतील तलाव ५० ते ७० टक्क्यांपर्यंत भरून घेण्याचे नियोजन आहे. पाऊस झालेला नसल्याने तलावांत २० टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा आहे. त्यात कृष्णेचे पाणी सोडले जाईल. परतीच्या पावसाने ते पूर्ण भरतील अशी अपेक्षा आहे. काही महत्त्वाच्या नाल्यांमध्येही पाणी सोडले जाईल.

सध्या शेतीसाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे शेतापर्यंत जाणाऱ्या छोट्या वितरिकांमध्ये पाणी सोडले जाणार नाही. फक्त तलावांना प्राधान्य दिले जाईल. नदीतील पाणीसाठा आणि परतीचा पाऊस याचा अंदाज घेऊन आवर्तनाचा कालावधी ठरविला जाणार आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभू व म्हैसाळ योजना सुरू करण्याचे आदेश एकाचवेळी दिले होते.