शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

आठवड्याभरात पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 23:30 IST

महापालिकेत आज बैठक : दोन दिवसांत पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : सांगली व कुपवाड शहरांवर पाणी कपातीचे संकट असून, पाणीपुरवठा विभागाने दहा टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे दिला आहे. याबाबत शुक्रवारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. येत्या आठवडाभरात पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो, तर मिरज शहराला कृष्णा नदीबरोबरच वारणा नदीचे पाणी मिळते. त्यामुळे सांगलीला कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यावरच कायमस्वरुपी अवलंबून रहावे लागते. दरवर्षी या काळात कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, पाणी टंचाईची वेळ महापालिकेवर कधी आली नव्हती. पण यंदा मात्र परिस्थिती बिकट आहे. जून महिन्यापासूनच पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली. त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला असून, जिल्ह्यात दुष्काळाचे सावट तीव्र होत आहे. त्यातच आता शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. सध्या कोयना धरणात ८०. ३१ टीएमसी पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्याचा परिणाम थेट शहरावर होणार आहे. त्यात पावसाची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. महापालिकेकडून दररोज ९० एमएलडी (दशलक्ष घनमीटर) पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील ७० एमएलडी पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचविले जात असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दुष्काळी स्थिती, पावसाचे कमी झालेले प्रमाण पाहता महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तसा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. आयुक्त कारचे यांनीही पाणीपुरवठ्यासंदर्भातील माहिती संकलित केली आहे. सुरुवातीला अधिकाऱ्यांशी नंतर पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)चर्चा करूनच निर्णय : अजिज कारचेपावसाचे प्रमाण कमी झाले असून, धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व ती माहिती संकलित केली आहे. उद्या शुक्रवारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती अवगत करून कपातीचा निर्णय जाहीर करू, असे आयुक्त कारचे यांनी सांगितले.