शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

वाहन घसरल्याशिवाय विटा-खानापूर महामार्गावर पुढे जातच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:03 IST

करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत.

ठळक मुद्देवाहनचालकांची कसरत : पावसामुळे रस्त्यावर चिखल; प्रवाशांचा जीव टांगणीला

विटा : करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून, खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ कर्नाटकच्या प्रवासी बसचा अपघात नुकताच टळला.

केंद्र शासनाने गुहागर ते विजापूर या राष्टय महामार्ग निर्मितीला सुरुवात केली आहे. रेणावीपासून पुढे भिवघाटपर्यंत या महामार्गाचे काम गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. जुना राज्यमार्ग खोदून रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यावर तामखडीजवळ लाल मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारी कर्नाटक राज्याची खानापूरकडे जाणारी बस या चिखलामुळे घसरत नाल्याकडील बाजूला गेली.

मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने या बसचा अपघात टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बसबरोबरच खासगी चारचाकी वाहने व दुचाकीस्वारांनाही या महामार्र्गाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीही रेवणगावजवळ चिखलामुळे वाहने घसरू लागल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, हैदराबादकडे जाणाऱ्या बसेसची वाहतूक लेंगरे, भूडमार्गे वळविण्यात आली होती.

शनिवारीही पावसाने दलदल झाल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. विटा ते खानापूर या नवीन राष्टÑीय महामार्गाचे अर्धवट काम सोडून ठेकेदार गायब झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने त्याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सध्या तरी पावसामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वारेमाप चिखल झाल्याने प्रत्येक वाहन घसरत आहे. वाहनधारक व प्रवाशांना या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.विटा ते खानापूरदरम्यान सुरू असलेल्या नवीन राष्टÑीय महामार्गावर पावसामुळे दलदल झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटक राज्याच्या प्रवासी बसला होणारा अपघात चालकाच्या प्रसंगावधानाने टळला.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा