शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

वाहन घसरल्याशिवाय विटा-खानापूर महामार्गावर पुढे जातच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:03 IST

करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत.

ठळक मुद्देवाहनचालकांची कसरत : पावसामुळे रस्त्यावर चिखल; प्रवाशांचा जीव टांगणीला

विटा : करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून, खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ कर्नाटकच्या प्रवासी बसचा अपघात नुकताच टळला.

केंद्र शासनाने गुहागर ते विजापूर या राष्टय महामार्ग निर्मितीला सुरुवात केली आहे. रेणावीपासून पुढे भिवघाटपर्यंत या महामार्गाचे काम गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. जुना राज्यमार्ग खोदून रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यावर तामखडीजवळ लाल मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारी कर्नाटक राज्याची खानापूरकडे जाणारी बस या चिखलामुळे घसरत नाल्याकडील बाजूला गेली.

मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने या बसचा अपघात टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बसबरोबरच खासगी चारचाकी वाहने व दुचाकीस्वारांनाही या महामार्र्गाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीही रेवणगावजवळ चिखलामुळे वाहने घसरू लागल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, हैदराबादकडे जाणाऱ्या बसेसची वाहतूक लेंगरे, भूडमार्गे वळविण्यात आली होती.

शनिवारीही पावसाने दलदल झाल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. विटा ते खानापूर या नवीन राष्टÑीय महामार्गाचे अर्धवट काम सोडून ठेकेदार गायब झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने त्याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सध्या तरी पावसामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वारेमाप चिखल झाल्याने प्रत्येक वाहन घसरत आहे. वाहनधारक व प्रवाशांना या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.विटा ते खानापूरदरम्यान सुरू असलेल्या नवीन राष्टÑीय महामार्गावर पावसामुळे दलदल झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटक राज्याच्या प्रवासी बसला होणारा अपघात चालकाच्या प्रसंगावधानाने टळला.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा