शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By संतोष भिसे | Updated: June 12, 2023 19:13 IST

सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेच्या बिळूर (ता. जत) कालव्याचे अर्धवट रखडलेले काम त्वरित सुरु करावे यासाठी बिळूरसह आठ गावांतील ग्रामस्थांनी सोमवारपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरु केले. निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.बिळूर व पंचक्रोशीतील गुगवाड, वज्रवाड, खिलारवाडी, एकुंडी, जिरग्याळ, शेळकेवाडी, शिंगणापूर, मिरवाड या गावांना हा कालवा वरदान ठरणार आहे. कालव्याचे काम अर्धवट झाले असून पूर्ण व्हावे यासाठी ग्रामस्थ दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार ही गावे  'अतिशोषित' वर्गवारीत येतात. त्यामुळे तेथे विहीर खोदण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. त्यामुळे सिंचन योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. कालव्याचे अर्धवट काम अवघ्या काही तासांत पूर्ण होऊ शकते, पण प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. काम तातडीने पूर्ण करुन ओढे, नाल्यांत पाणी सोडावे.आंदोलनात बसगोंडा नाईक, मलगोंडा हेळकर, मलगोंडा कोट्टलगी, प्रकाश बिरादार, चिदानंद चौगुले, बाबाण्णा नाईक, श्रीमंत गुडोडगी, शिवपूत्र नाईक, प्रकाश हेळकर, श्रीशैल कुल्लोळी, रायगोंडा पाटील आदी सहभागी झाले आहेत.

अवघे २०० फुटांचे खोदकाम रखडलेआंदोलकांनी सांगितले की, डफळापूर हद्दीत कालव्याचे अवघे १०० ते २०० फूट मध्ये काम शिल्लक आहे, त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकत नाही. डोळ्यांसमोर पाणी असतानाही मिळत नसल्याने वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन व योजनेच्या व्यवस्थापनाला यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आहेत, पण सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी