शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

आष्ट्यात विलासराव शिंदे यांच्या विचाराचे राजकारण - : पक्षीय राजकारणास छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:48 IST

शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली पालिकेच्या माध्यमातून फक्त आष्ट्याचा विकास होईल. पक्षीय निर्णय घेण्याचा अधिकार झुंजारराव शिंदे यांनाच राहील, असे खात्रीशीर समजते.

ठळक मुद्देझुंजारराव शिंदे यांच्याकडे विकास आघाडीची धुरा!

अशोक पाटील ।इस्लामपूर : माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शहर विकास आघाडीचे अध्यक्ष झुंजारराव शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. शहरातील राजकारण विलासराव शिंदे यांच्या विचारांचे राहील. यामध्ये कोणताही पक्ष येणार नाही. शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली पालिकेच्या माध्यमातून फक्त आष्ट्याचा विकास होईल. पक्षीय निर्णय घेण्याचा अधिकार झुंजारराव शिंदे यांनाच राहील, असे खात्रीशीर समजते.

आष्टा पालिकेत विलासराव शिंदे गटाचे नगराध्यक्ष यांच्यासह १२ नगरसेवक आहेत, तर आमदार जयंत पाटील गटाचे ९ नगरसेवक आहेत. हे सर्व नगरसेवक १९९६ पासून विलासराव शिंदे यांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली पालिकेवर सत्ता अबाधित ठेवून आहेत. आमदार जयंत पाटील यांचे मार्गदर्शन आणि विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास साधला आहे. आघाडीचे अध्यक्षपद झुंजारराव शिंदे यांनी समर्थपणे पेलले आहे.

गत जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी जि. प. मतदार संघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली गद्दारी विलासराव शिंदे यांच्या मनाला चटका लावणारी ठरली. पण ही सल त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बोलून दाखवली नाही. परिणामी त्यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून शिंदे गटाचे कार्यकर्ते द्विधावस्थेत आहेत. त्यातच विलासराव शिंदे यांच्या निधनाने शहर विकास आघाडीत बिघाडी होईल, अशा अफवा विरोधकांनी उठवल्या. मात्र तसे झाले नाही.

विलासराव शिंदे यांचा विचार घेऊन शहर विकास आघाडीचे अध्यक्ष झुंजारराव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, नुकतेच भाजपमध्ये गेलेले वैभव शिंदे, विशाल शिंदे आणि आमदार जयंत पाटील गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या २ बैठका झाल्या. या बैठकीत आष्टा पालिकेत विलासराव शिंदे आणि आमदार जयंत पाटील यांचे दोन गट असले तरी, पालिकेची निवडणूक या दोन्ही गटांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली आहे. वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने आष्टा शहरातील समीकरणे बदलतील, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात होते. यावर पर्याय म्हणून झुंजारराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शुक्रवारी प्रतिमेचे अनावरणविलासराव शिंदे यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांचा एक गट सध्याही कार्यरत आहे. या गटाची बैठक ४ आॅगस्ट रोजी आष्टा येथे बोलाविण्यात आली आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीत विलासराव शिंदे यांच्या प्रतिमेचे अनावरण २६ जुलै रोजी जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे.आष्ट्यातील बलाबल...विलासराव शिंदे गट ३५ टक्केजयंत पाटील गट ३0 टक्केस्वा. शेतकरी संघटना १५ टक्केवैभव शिंदे (भाजप) १0 टक्केइतर पक्ष, संघटना १0 टक्के

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली