शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता

By अविनाश कोळी | Updated: October 4, 2024 10:52 IST

सातारा, कोल्हापूरपेक्षा सांगलीचा आवाज मोठा

अविनाश कोळी

सांगली : राज्याच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या १२ अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास एका संस्थेने केला असून जिल्हानिहाय आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला आहे. यात काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी सर्वाधिक प्रश्न मांडले असून भाजप आमदारांनी सर्वात कमी प्रश्न मांडले आहेत.मुंबईतील संपर्क संस्थेने अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यात अधिवेशनातील आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. विषयनिहाय प्रश्नांचा अभ्यासही यात मांडला आहे. सांगली जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य व शेतीसंदर्भातील प्रश्न सर्वाधिक मांडले. याशिवाय सांगली, कोल्हापूर व सातारा या तिन्ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न सांगली जिल्ह्यातील आमदारांनी मांडल्याचेही दिसून येते.

कोणत्या आमदारांनी किती प्रश्न मांडले

आमदार पक्ष             प्रश्नसंख्याअनिल बाबर शिवसेना             ६७

जयंत पाटील राष्ट्रवादी (श. प.)             २०४मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी (श. प.) २२

सुमन पाटील राष्ट्रवादी (श. प.) १२६सुरेश खाडे भाजप             १

विक्रमसिंह सावंत काँग्रेस २१४विश्वजीत कदम काँग्रेस १४१

सुधीर गाडगीळ भाजप             ० 

जिल्हानिहाय प्रश्नांची टक्केवारी

सांगली ९.०९

कोल्हापूर ७.८९सातारा ६.०१

जिल्ह्यातील आमदारांनी कोणते प्रश्न मांडले

विषय प्रश्नबालक १७

महिला, मुली १९शालेय शिक्षण ३८

आरोग्य ४८अंगणवाडी ९

पोषण            १आदिवासी १३

पाणी            २९पर्यावरण १३

शेती             १६सिंचन             ९

रेशन             ६वीज            १४

मनुष्यबळ २६प्रश्न विचारण्यात काँग्रेस अव्वल

पक्षनिहाय अभ्यास केला तर काँग्रेसच्या दोन आमदारांनी मिळून एकूण ३५५, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी मिळून ३५२, शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी ६७ तर भाजपच्या दोन आमदारांनी मिळून एक प्रश्न विचारला आहे.

राज्यातील प्रश्न अधिक

जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी ८९ टक्के प्रश्न हे राज्याचे होते. जिल्ह्यातील समस्यांविषयी एकूण ५९ प्रश्न विचारले गेले. म्हणजेच जिल्ह्यातील केवळ ११ टक्के प्रश्न उपस्थित केले गेले. 

जिल्ह्यातील या प्रश्नांवर टाकला प्रकाशझोतअवकाळी, अतिवृष्टी व गारपीटने झालेले शेतीचे नुकसान

बोगस फायनान्स कंपन्यांकडून फसवणूक,सांगली, मिरजेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर

जत तालुक्यातील वंचित ६४ गावांच्या पाण्याचा प्रश्नअलमट्टीमुळे सांगलीला महापुराचा फटका

दत्त इंडिया साखर कारखान्याकडून नदीचे प्रदूषणबागेवडी (ता. जत) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचार

कोयना धरणातून सांगली जिल्ह्याचे हक्काचे २७.५० टीएमसी पाणी मिळावे

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभा