शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता

By अविनाश कोळी | Updated: October 4, 2024 10:52 IST

सातारा, कोल्हापूरपेक्षा सांगलीचा आवाज मोठा

अविनाश कोळी

सांगली : राज्याच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या १२ अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास एका संस्थेने केला असून जिल्हानिहाय आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला आहे. यात काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी सर्वाधिक प्रश्न मांडले असून भाजप आमदारांनी सर्वात कमी प्रश्न मांडले आहेत.मुंबईतील संपर्क संस्थेने अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यात अधिवेशनातील आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. विषयनिहाय प्रश्नांचा अभ्यासही यात मांडला आहे. सांगली जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य व शेतीसंदर्भातील प्रश्न सर्वाधिक मांडले. याशिवाय सांगली, कोल्हापूर व सातारा या तिन्ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न सांगली जिल्ह्यातील आमदारांनी मांडल्याचेही दिसून येते.

कोणत्या आमदारांनी किती प्रश्न मांडले

आमदार पक्ष             प्रश्नसंख्याअनिल बाबर शिवसेना             ६७

जयंत पाटील राष्ट्रवादी (श. प.)             २०४मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी (श. प.) २२

सुमन पाटील राष्ट्रवादी (श. प.) १२६सुरेश खाडे भाजप             १

विक्रमसिंह सावंत काँग्रेस २१४विश्वजीत कदम काँग्रेस १४१

सुधीर गाडगीळ भाजप             ० 

जिल्हानिहाय प्रश्नांची टक्केवारी

सांगली ९.०९

कोल्हापूर ७.८९सातारा ६.०१

जिल्ह्यातील आमदारांनी कोणते प्रश्न मांडले

विषय प्रश्नबालक १७

महिला, मुली १९शालेय शिक्षण ३८

आरोग्य ४८अंगणवाडी ९

पोषण            १आदिवासी १३

पाणी            २९पर्यावरण १३

शेती             १६सिंचन             ९

रेशन             ६वीज            १४

मनुष्यबळ २६प्रश्न विचारण्यात काँग्रेस अव्वल

पक्षनिहाय अभ्यास केला तर काँग्रेसच्या दोन आमदारांनी मिळून एकूण ३५५, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी मिळून ३५२, शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी ६७ तर भाजपच्या दोन आमदारांनी मिळून एक प्रश्न विचारला आहे.

राज्यातील प्रश्न अधिक

जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी ८९ टक्के प्रश्न हे राज्याचे होते. जिल्ह्यातील समस्यांविषयी एकूण ५९ प्रश्न विचारले गेले. म्हणजेच जिल्ह्यातील केवळ ११ टक्के प्रश्न उपस्थित केले गेले. 

जिल्ह्यातील या प्रश्नांवर टाकला प्रकाशझोतअवकाळी, अतिवृष्टी व गारपीटने झालेले शेतीचे नुकसान

बोगस फायनान्स कंपन्यांकडून फसवणूक,सांगली, मिरजेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर

जत तालुक्यातील वंचित ६४ गावांच्या पाण्याचा प्रश्नअलमट्टीमुळे सांगलीला महापुराचा फटका

दत्त इंडिया साखर कारखान्याकडून नदीचे प्रदूषणबागेवडी (ता. जत) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचार

कोयना धरणातून सांगली जिल्ह्याचे हक्काचे २७.५० टीएमसी पाणी मिळावे

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभा