शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विजय ताड खून प्रकरण: पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत अखेर शरण  

By घनशाम नवाथे | Updated: May 29, 2024 20:24 IST

Sangli News: जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

- घनशाम नवाथे सांगली  - जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. खून प्रकरणात आता जत पोलिस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असे सांगण्यात आले.

अधिक माहिती अशी, १७ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मृत विजय ताड हे मोटार (एमएच १० सीएन ०००२) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला. जत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

ताड यांच्या खुनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (वय २४ रा. के एम हायस्कुलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. आर. आर. कॉलेजजवळ जत) या चौघांना अटक केली. पोलिस तपासात चौघांकडून गुन्हयात वापरलेली तीन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅग्झीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताड यांचा खून मुख्य सुत्रधार उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन तसेच नियोजन करुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता. त्याची माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगून २५ हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते. खुनातील संशयित पाच आरोपींना मोका देखील लावण्यात आला होता. उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. तसेच त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

बुधवारी उमेश सावंत हा जिल्हा न्यायालयात शरण आला. न्यायाधीशांनी त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली. आता जत पोलिस खून प्रकरणात न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा ताबा घेतली. त्यानंतर खुनाचा तपास करतील.

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून विजय ताड याचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आता उमेश सावंतच्या अटकेनंतर तपासात खरे कारण उघड होईल. त्यामुळे जत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी