शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मुंबईचे वऱ्हाड विटा पोलिसांच्या दारात!

By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST

पोलीस उपअधीक्षकांची मध्यस्थी : लेखी जबाबानंतर विवाह समारंभच रद्द

विटा : नवरा मुलगा विट्याचा, तर नवरी मुलगी मुंबईची. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून रेशीमगाठी बांधण्यासाठी दोन्ही कुटुंबांची जवळीक... साखरपुडा झाल्यानंतर नियोजित वर-वधूची मोबाईलवरून आणखी जवळीक... दोन्ही कुटुंबांच्या वाढत्या आशा-अपेक्षा... विवाहाला २४ तासांचा अवधी... विवाहासाठी आज (सोमवारी) मुंबईचे वऱ्हाड विट्यात दाखल झाले... पण त्या वऱ्हाडाला लग्नमंडपात नव्हे तर विटा पोलिसांच्या दारात जावे लागले!सातारा येथे नोकरी करणाऱ्या विटा येथील एका युवकाचा विवाह मुंबईस्थित तरुणीशी उद्या, मंगळवारी येथील एका मंगल कार्यालयात होणार होता. दोघेही उच्चशिक्षित. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून त्या दोन कुटुंबांची ओळख झाली. साखरपुडाही झाला. विवाहासाठी दि. १० फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यासाठी विट्यातील मंगल कार्यालयाचे बुकिंग करण्यात आले. परंतु, साखरपुडा झाल्यानंतर पाच ते सहा दिवसातच दोन्ही कुटुंबांच्या आशा-अपेक्षा वाढत गेल्या. शिवाय बाहुल्यावर चढण्याआधीच नियोजित वर-वधूतही वादाची दरी वाढत गेली, तरीही उद्या विटा येथे विवाह असल्याने नियोजित वधूकडील मूळ वऱ्हाडी मंडळी मुंबईहून आज विट्यात दाखल झाली. त्यावेळी दोन कुटुंबात पुन्हा वाद पेटला. शेवटी मुंबईची वऱ्हाडी मंडळी थेट विटा पोलिसांच्या दारात हजर झाली. त्यावेळी नियोजित वराकडील वऱ्हाडी मंडळींनाही पोलीस ठाण्यात बोलावणे धाडण्यात आले. वराकडील मंडळी सायंकाळी सह वाजता पोलिसांच्या दारात आली.डॉ. अभिजित पाटील यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले. वराच्या नातेवाईकांनी हा विवाह होणार नाही, असा पवित्रा घेतला, परंतु नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण दिल्याने व साखरपुडा झाल्याने चारचौघांत वेगळी चर्चा होणार, या भीतीने वधूच्या नातेवाईकांनी मिळते-जुळते घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय वराच्या नातेवाईकांनी फेटाळून लावला. शेवटी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी वधू व तिच्या नातेवाईकांना पुढील धोका समजावून सांगून हा विषय येथेच थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे नियोजित वर-वधूच्या नातेवाईकांनी यापुढे दोन्ही कुटुंबांत कोणताही संबंध राहणार नसल्याचे सांगून तसा लेखी जबाब पोलिसांत दिला! (वार्ताहर)शहरात चर्चानियोजित विवाहच रद्द करून मुंबईची वऱ्हाडी मंडळी विटा पोलीस ठाण्यातून रात्री उशिरा मुंबईकडे मार्गस्थ झाली. उद्या होणारा नियोजित विवाह असा अचानक रद्द झाल्याने व या विवाहासाठी आलेले मुंबईचे वऱ्हाड थेट विटा पोलिसांच्या दारात गेल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू होती.