शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे वऱ्हाड विटा पोलिसांच्या दारात!

By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST

पोलीस उपअधीक्षकांची मध्यस्थी : लेखी जबाबानंतर विवाह समारंभच रद्द

विटा : नवरा मुलगा विट्याचा, तर नवरी मुलगी मुंबईची. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून रेशीमगाठी बांधण्यासाठी दोन्ही कुटुंबांची जवळीक... साखरपुडा झाल्यानंतर नियोजित वर-वधूची मोबाईलवरून आणखी जवळीक... दोन्ही कुटुंबांच्या वाढत्या आशा-अपेक्षा... विवाहाला २४ तासांचा अवधी... विवाहासाठी आज (सोमवारी) मुंबईचे वऱ्हाड विट्यात दाखल झाले... पण त्या वऱ्हाडाला लग्नमंडपात नव्हे तर विटा पोलिसांच्या दारात जावे लागले!सातारा येथे नोकरी करणाऱ्या विटा येथील एका युवकाचा विवाह मुंबईस्थित तरुणीशी उद्या, मंगळवारी येथील एका मंगल कार्यालयात होणार होता. दोघेही उच्चशिक्षित. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून त्या दोन कुटुंबांची ओळख झाली. साखरपुडाही झाला. विवाहासाठी दि. १० फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यासाठी विट्यातील मंगल कार्यालयाचे बुकिंग करण्यात आले. परंतु, साखरपुडा झाल्यानंतर पाच ते सहा दिवसातच दोन्ही कुटुंबांच्या आशा-अपेक्षा वाढत गेल्या. शिवाय बाहुल्यावर चढण्याआधीच नियोजित वर-वधूतही वादाची दरी वाढत गेली, तरीही उद्या विटा येथे विवाह असल्याने नियोजित वधूकडील मूळ वऱ्हाडी मंडळी मुंबईहून आज विट्यात दाखल झाली. त्यावेळी दोन कुटुंबात पुन्हा वाद पेटला. शेवटी मुंबईची वऱ्हाडी मंडळी थेट विटा पोलिसांच्या दारात हजर झाली. त्यावेळी नियोजित वराकडील वऱ्हाडी मंडळींनाही पोलीस ठाण्यात बोलावणे धाडण्यात आले. वराकडील मंडळी सायंकाळी सह वाजता पोलिसांच्या दारात आली.डॉ. अभिजित पाटील यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले. वराच्या नातेवाईकांनी हा विवाह होणार नाही, असा पवित्रा घेतला, परंतु नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण दिल्याने व साखरपुडा झाल्याने चारचौघांत वेगळी चर्चा होणार, या भीतीने वधूच्या नातेवाईकांनी मिळते-जुळते घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय वराच्या नातेवाईकांनी फेटाळून लावला. शेवटी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी वधू व तिच्या नातेवाईकांना पुढील धोका समजावून सांगून हा विषय येथेच थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे नियोजित वर-वधूच्या नातेवाईकांनी यापुढे दोन्ही कुटुंबांत कोणताही संबंध राहणार नसल्याचे सांगून तसा लेखी जबाब पोलिसांत दिला! (वार्ताहर)शहरात चर्चानियोजित विवाहच रद्द करून मुंबईची वऱ्हाडी मंडळी विटा पोलीस ठाण्यातून रात्री उशिरा मुंबईकडे मार्गस्थ झाली. उद्या होणारा नियोजित विवाह असा अचानक रद्द झाल्याने व या विवाहासाठी आलेले मुंबईचे वऱ्हाड थेट विटा पोलिसांच्या दारात गेल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू होती.