शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूरकरांनी बांधली वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी विद्यापीठाने खानापूर येथील येऊन जागेची पाहणीही ...

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी विद्यापीठाने खानापूर येथील येऊन जागेची पाहणीही केली होती; परंतु सध्या हे उपकेंद्र अन्य तालुक्यात हलविण्यासाठी काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप सुरू केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला झाले पाहिजे यासाठी आता अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर रविवारी खानापूर घाटमाथ्यावरील अगस्ती मंदिरात खानापूर, आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांची बैठक झाली.

या बैठकीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला का झाले पाहिजे व त्याचे फायदे काय, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याची दिशा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांनी बैठकीत विशद केली. त्यानंतर खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी खानापूर व आटपाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसभा व मासिक मीटिंगचे ठराव एकत्र घेऊन शासनाला व शिवाजी विद्यापीठाला देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच येणाऱ्या या आठ दिवसांत प्रत्येक गाव व बैठकांचे नियोजन करण्याचा निर्णय ही घेण्यात आला.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आटपाडीचे कार्यकर्ते अंकुश मुढे, सुयश कदम, सुनील हसबे, वसंतराव यादव, दौलत भगत, विकास देसाई, शक्ती धेंडे, अमित धेंडे, साहिल पवार, पंकज पांडकर, सचिन जाधव, दाजी पवार, जगन्नाथ मुळीक, विश्राम सूर्यवंशी, विजय भगत, नानासो शिंदे, शाहरुख पठाण, प्रशांत गायकवाड, अभिजित शेटे यांच्यासह विद्यार्थी, पदवीधर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. गणेश धेंडे यांनी आभार मानले.

फोटो : २४ विटा १

ओळ : खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या मागणीसाठी खानापूर व आटपाडी तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऐनवाडी येथील अगस्ती मंदिरात बैठक झाली.