शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत, आटपाडीतील गावे कोरडीच -: पाणी कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:09 IST

गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील ओढे, तलाव, विहिरी अद्याप रिकाम्या

अविनाश बाड ।आटपाडी : सध्या आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासीयांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सोडून तालुक्यातील सर्व ओढे, बंधारे, तलाव भरावेत, अशी लोकांची मागणी आहे.

तालुक्यात दि. १८ सप्टेंबर रोजी टेंभूचे पाणी आले. दि. २२ रोजी आटपाडी तलावात पाणी आले. तीनच दिवसात ३०८.९७ द.ल.घ.फूट एवढा पाणीसाठा होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले. तेव्हापासून आजअखेर आटपाडीच्या शुक्र ओढ्यातून सांगोला तालुक्यात पाणी सुरू आहे. आटपाडीपासून लोणारवाडी, बलवडी, नाझरे, वाटंबरे ते कडलासच्या पुढे ५० कि.मी.पर्यंत माणगंगा नदीतून बंधारे भरत पाणी सोडले जात आहे. वाईट म्हणजे, आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदी कोरडी आहे. आटपाडी तालुक्यातील गवळेवाडी, आवळाई, विठलापूर, कौठुळी या गावांना ओढ्यातून पाणी सोडून वर्ष झाले. या गावांना त्यानंतर टेंभूचे पाणी सोडले नाही.

त्यामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. तिथे खरिपाची पेरणीही झाली नाही. तसेच रब्बी हंगामाची पेरणी पावसाअभावी होणार नाही. दिघंची परिसर कोरडा आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी येऊनही केवळ नियोजन नसल्याने तालुकावासीयांना दुष्काळावर मात करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.सांगोल्याला ४००, तर आटपाडीला १०0तालुक्यात आधी पाणीपट्टीचे पैसे भरूनही टेंभूचे पाणी सोडले जात नाही, असा अनेकदा अनुभव घेतलेल्या आटपाडीकरांच्या जखमेवर हे पाणी सध्या मीठ चोळण्याचे काम करत आहे. सांगोला तालुक्यात सध्या ३०० क्युसेक वेगाने आटपाडी तलावातून आणि घाणंद-हिवतड कालव्यातून जुनोनी, कोळे या सांगोला तालुक्यातील गावांना १०० क्युसेक असे एकूण ४०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे, तर आटपाडी तालुक्यात निंबवडे तलावात फक्त १०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हा अन्याय संतापजनक आहे.कोरडे पडत चाललेले तलावतलाव क्षमता पाणीसाठा(द. ल. घ. फू.)कचरे वस्ती ११०.४१ ३६बनपुरी ४७.४९ ५निंबवडे २३५.१५ १२२दिघंची १४२.५० ९शेटफळे ५६.९३ कोरडामाळेवस्ती ६६.३० १२अर्जुनवाडी ८३.२१ १३मानेवाडी ३९.७१ ५ 

टॅग्स :water transportजलवाहतूकTembhu Projectटेंभू धरणSangliसांगली