शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगार, कष्टकरी चळवळीचा कणा मोडला : चंदनासम झिजलेले नेतृत्व बिराज साळुंखे नावाचे आंदोलनातील वादळ झाले शांत; विविध संघटनांचा आधारवड कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:06 IST

बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला.

अशोक डोंबाळे ।सांगली : बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा लढा चालूच होता. गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कष्टकरी, कामगारांना आपण कुठे तरी पोरके झाल्याची जाणीव झाली. अनेकांनी कष्टकरी चळवळीचा आवाजच आज शांत झाला, अशीच भावना व्यक्त केली.

कार्वे (ता. खानापूर) या कायमस्वरुपी दुष्काळी गावात १५ जुलै १९३८ रोजी साथी बिराज साळुंखे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर दोन ते तीन वर्षांनंतर त्यांचे पितृछत्र हरपले. आईच्या पदरी लहान मुले. त्यात भरीस भर सलग चार वर्षे पावसाने दडी मारली होती. पोटासाठी आईने बिराज यांच्यासह मुलांना घेऊन थेट मुंबई गाठली. लालबाग-परळ येथील एका मिलमध्ये वार्इंडर म्हणून आईला नोकरी मिळाली. काही दिवसात मिलच बंद पडल्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. यावेळी निघालेल्या गिरणी कामगारांच्या मोर्चात आईबरोबरच स्वत: बिराजही सहभागी झाले होते.

बालपणापासूनच कामगार चळवळीचे धडे त्यांना मिळत गेले. लालबाग-परळ या कामगार वस्तीतच ते लहानाचे मोठे झाले. कष्टकऱ्यांचे जीवन काय असते, हे त्यांनी जवळून अनुभवले होते. मुंबईतील एम. आर. भट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिध्दार्थ कॉलेजमध्ये झाले. १९५६ मध्ये बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत बिराज साळुंखे सहभागी झाले होते. त्यांच्या मनावर समाजवादी विचारांचा मोठा प्रभाव होता. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा तर प्रचंड प्रभाव होता.

पुढे गांधीजींनी समाजसेवकांना खेड्यांकडे जाण्याचा संदेश दिला होता. तोच आदेश समजून कष्टकºयांच्या परिवर्तनाचे धडे ज्या मुंबईत गिरवले ती मुंबई सोडून १९६१ मध्ये बिराज साळुंखे पुन्हा कार्वे गावी आले. काँग्रेसच्या चिटणीस पदाची धुरा सांभाळत ग्रामीण भागात त्यांनी चळवळीचे काम चालू केले. चळवळ आणि काँग्रेस पक्ष यांचे गणित कुठे जुळून येत नसल्याचे लक्षात येताच या पदाचा त्याग करुन कामगार, कष्टकरी चळवळीत सक्रिय झाले.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा असो अथवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, यामध्ये ते सक्रिय सहभागी होते. शेतकरी, शेतमजुरांचे संघटन करण्यासाठी मस्टर असिस्टंट व मेस्त्री संघटना स्थापन केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अत्यंत चिकाटीने लढून १९९५ मध्ये राज्यातील सहा हजार हजेरी सहायकांना सरकारी नोकरीत घेण्यास सरकारला भाग पाडले. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका संघटनेची स्थापना करुन सरकारकडे रेटा लावून सेविकांना भरीव मानधन वाढवून घेतले. १९७०-७२ मध्ये नागज (ता. कवठेमहांकाळ) आणि मिरज तालुक्यात एक अशा दोन पाणी परिषदा घेऊन सरकारचे लक्ष वेधले होते.कार्यालयात ठाण...सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कामगारांचे प्रश्न सोडविण्यात ते व्यस्त होते. ते जेवणाचा डबाही घरातूनच घेऊन यायचे. नेहमीच त्यांच्या कार्यालयात गर्दी होती. कर्मचाºयांची गर्दी हेच त्यांच्या जगण्याचे खरेखुरे टॉनिक होते. कधीही ते कंटाळले नाहीत. त्यांनी कामगारांकडून कधीही एका रुपयाचीही अपेक्षा ठेवली नव्हती. कामगार संघटनेकडून मिळणाºया तुटपुंज्या मानधनावरच त्यांनी काटकसरीने संसाराचा गाडा चालविला होता. वयाच्या ८० व्या वर्षातही ते दुचाकीवरुनच सांगलीत फिरत होते.दिग्गज नेत्यांचा लाभला सहवाससाथी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, भाऊ फाटक आदींनी स्थापन केलेल्या एस. टी. मजदूर सभेत १९७० मध्ये बिराज साळुंखे सक्रिय होऊन कार्यरत राहिले. लगेच पुढे डिसेंबर १९७० मध्ये एस. टी. महामंडळाचा स्वतंत्र सांगली विभाग झाला. यावेळी बिराज साळुंखे यांच्यावर एस. टी. मजदूर सभेच्या सांगली विभागाची जबाबदारी पडली. ही जबाबदारी त्यांनी गेल्या ४८ वर्षांत अखंडीत सांभाळली.

 

तुरुंगवासही भोगला२५ जून १९७५ च्या आणीबाणीची झळ बिराज साळुंखे यांनाही सोसावी लागली होती. एस. टी. कामगारांच्या संपाची नोटीस दिली म्हणून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू