शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

असंघटित कामगार, कष्टकरी चळवळीचा कणा मोडला : चंदनासम झिजलेले नेतृत्व बिराज साळुंखे नावाचे आंदोलनातील वादळ झाले शांत; विविध संघटनांचा आधारवड कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:06 IST

बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला.

अशोक डोंबाळे ।सांगली : बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा लढा चालूच होता. गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कष्टकरी, कामगारांना आपण कुठे तरी पोरके झाल्याची जाणीव झाली. अनेकांनी कष्टकरी चळवळीचा आवाजच आज शांत झाला, अशीच भावना व्यक्त केली.

कार्वे (ता. खानापूर) या कायमस्वरुपी दुष्काळी गावात १५ जुलै १९३८ रोजी साथी बिराज साळुंखे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर दोन ते तीन वर्षांनंतर त्यांचे पितृछत्र हरपले. आईच्या पदरी लहान मुले. त्यात भरीस भर सलग चार वर्षे पावसाने दडी मारली होती. पोटासाठी आईने बिराज यांच्यासह मुलांना घेऊन थेट मुंबई गाठली. लालबाग-परळ येथील एका मिलमध्ये वार्इंडर म्हणून आईला नोकरी मिळाली. काही दिवसात मिलच बंद पडल्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. यावेळी निघालेल्या गिरणी कामगारांच्या मोर्चात आईबरोबरच स्वत: बिराजही सहभागी झाले होते.

बालपणापासूनच कामगार चळवळीचे धडे त्यांना मिळत गेले. लालबाग-परळ या कामगार वस्तीतच ते लहानाचे मोठे झाले. कष्टकऱ्यांचे जीवन काय असते, हे त्यांनी जवळून अनुभवले होते. मुंबईतील एम. आर. भट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिध्दार्थ कॉलेजमध्ये झाले. १९५६ मध्ये बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत बिराज साळुंखे सहभागी झाले होते. त्यांच्या मनावर समाजवादी विचारांचा मोठा प्रभाव होता. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा तर प्रचंड प्रभाव होता.

पुढे गांधीजींनी समाजसेवकांना खेड्यांकडे जाण्याचा संदेश दिला होता. तोच आदेश समजून कष्टकºयांच्या परिवर्तनाचे धडे ज्या मुंबईत गिरवले ती मुंबई सोडून १९६१ मध्ये बिराज साळुंखे पुन्हा कार्वे गावी आले. काँग्रेसच्या चिटणीस पदाची धुरा सांभाळत ग्रामीण भागात त्यांनी चळवळीचे काम चालू केले. चळवळ आणि काँग्रेस पक्ष यांचे गणित कुठे जुळून येत नसल्याचे लक्षात येताच या पदाचा त्याग करुन कामगार, कष्टकरी चळवळीत सक्रिय झाले.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा असो अथवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, यामध्ये ते सक्रिय सहभागी होते. शेतकरी, शेतमजुरांचे संघटन करण्यासाठी मस्टर असिस्टंट व मेस्त्री संघटना स्थापन केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अत्यंत चिकाटीने लढून १९९५ मध्ये राज्यातील सहा हजार हजेरी सहायकांना सरकारी नोकरीत घेण्यास सरकारला भाग पाडले. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका संघटनेची स्थापना करुन सरकारकडे रेटा लावून सेविकांना भरीव मानधन वाढवून घेतले. १९७०-७२ मध्ये नागज (ता. कवठेमहांकाळ) आणि मिरज तालुक्यात एक अशा दोन पाणी परिषदा घेऊन सरकारचे लक्ष वेधले होते.कार्यालयात ठाण...सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कामगारांचे प्रश्न सोडविण्यात ते व्यस्त होते. ते जेवणाचा डबाही घरातूनच घेऊन यायचे. नेहमीच त्यांच्या कार्यालयात गर्दी होती. कर्मचाºयांची गर्दी हेच त्यांच्या जगण्याचे खरेखुरे टॉनिक होते. कधीही ते कंटाळले नाहीत. त्यांनी कामगारांकडून कधीही एका रुपयाचीही अपेक्षा ठेवली नव्हती. कामगार संघटनेकडून मिळणाºया तुटपुंज्या मानधनावरच त्यांनी काटकसरीने संसाराचा गाडा चालविला होता. वयाच्या ८० व्या वर्षातही ते दुचाकीवरुनच सांगलीत फिरत होते.दिग्गज नेत्यांचा लाभला सहवाससाथी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, भाऊ फाटक आदींनी स्थापन केलेल्या एस. टी. मजदूर सभेत १९७० मध्ये बिराज साळुंखे सक्रिय होऊन कार्यरत राहिले. लगेच पुढे डिसेंबर १९७० मध्ये एस. टी. महामंडळाचा स्वतंत्र सांगली विभाग झाला. यावेळी बिराज साळुंखे यांच्यावर एस. टी. मजदूर सभेच्या सांगली विभागाची जबाबदारी पडली. ही जबाबदारी त्यांनी गेल्या ४८ वर्षांत अखंडीत सांभाळली.

 

तुरुंगवासही भोगला२५ जून १९७५ च्या आणीबाणीची झळ बिराज साळुंखे यांनाही सोसावी लागली होती. एस. टी. कामगारांच्या संपाची नोटीस दिली म्हणून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू