शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ प्रकरणात मौनामागं दडलंय अंडरस्टँडिंग ---- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:37 IST

राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?

ठळक मुद्दे- कारण राजकारण --राजकीय सोय आणि जिरवाजिरवी

श्रीनिवास नागे -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कडकनाथ कोंबडीपालन फसवणुकीचं प्रकरण चव्हाट्यावर आलं. या प्रकरणाचं केंद्र इस्लामपुरातच. संशयाची सुई काही राजकीय मंडळींकडं फिरत असलेली. रान पेटवण्यासाठी हे आयतं कोलीत... पण ‘अंडरस्टँडिंग’च्या खेळात सर्वच नेतेमंडळी मूग गिळून गप्प! भाजप-शिवसेनेवर तोफा डागणारे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा हा स्वत:चा मतदारसंघ असूनही ते बोलत नाहीत. एवढा ज्वलंत प्रश्न उचलण्याची, विरोधकांवर हल्ला चढवण्याची नामी संधी असताना त्यांनी या विषयावर अवाक्षरही काढलेलं नाही... यामागचं इंगित काय?‘कडकनाथ’ प्रकरण बाहेर येऊन महिना होत आला. आठ हजारावर गुंतवणूकदारांना तब्बल साडेपाचशे कोटीचा चुना लावला गेला. त्याची सर्वांत मोठी झळ वाळवा तालुक्याला बसल्याचं उघड होतंय. त्यात गरीब शेतकरी, बेरोजगार तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक नागवले गेले. खाद्य-औषधांअभावी पोल्ट्री शेडमधल्या कोंबड्यांची तडफड सुरू झालीय. पोलिसांचा तपास सुरू आहे, केवळ सांगण्यापुरताच! गुंतवणूकदार हवालदिल झालेत. पण तिथली राजकीय मंडळी गप्प आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय म्हणे. तेवढं सोडलं तर हे प्रकरण धसास लावण्यासाठी, ना सत्ताधारी पक्ष प्रयत्न करताहेत, ना विरोधक आक्रमक झालेत.दबावातून लादलेली अपरिहार्यता, राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?गेल्या वर्षभरापासून जयंतरावांचे विरोधक शड्डू ठोकताहेत. आखाडा एकच असला तरी सराव मात्र वेगवेगळ्या तालमीत. कुणी लांग बांधतंय, तर कुणी अंगाला तेल लावतंय, कुणी जोरबैठका काढतंय, कुणी वस्तादांच्या नुसतंच कानाला लागतंय, तर कुणी कुस्तीला जोड आपलीच ठरलीय म्हणून सांगतंय. मग जयंतरावांना त्याबाबत विचारलं जातं... ते हसतात आणि विरोधकांना बेदखल करण्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतात, ‘त्यांचा पैलवान तर ठरू दे!’ तेव्हापासून विरोधकांचा पैलवान अजून ठरतोय. लढत पंचवीस दिवसांवर आली तरी रिंगणात कुणी उतरायचं हेच स्पष्ट नाही. त्यातच विरोधकांतील फाटाफूटही चव्हाट्यावर आलीय. हेच जयंतरावांच्या पथ्यावर पडतं. विधानसभेच्या लागोपाठ सहा लढती त्यांनी याच जोरावर एकहाती मारल्यात. तत्पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी करावे लागणारे सगळे प्रयत्न ते करतात... अगदी इमानेइतबारे!राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जयंतरावांच्या गटाचे काही मोहरे भाजप-सेनेच्या तंबूत गेले. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील, वैभव शिंदे, भीमराव माने, स्वरूपराव पाटील त्यातलेच. इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचं मैदान मारल्यापासून निशिकांतदादांना आमदारकी खुणावायला लागलेली.

भाजपनं जिल्ह्यातल्या सत्तास्थानांवर कब्जा केल्यामुळं आणि सत्तेचं पाठबळ मिळाल्यामुळं सदाभाऊ खोत यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधलेलं. त्यातूनच दोघांचं फाटलं. दोघांनी आपापली तयारी सुरू केली, पण गेल्या दीड महिन्यात सदाभाऊंचं नाव मागं पडलं. कारण कडकनाथप्रकरणी विरोधकांनी त्यांच्याकडं संशयाची सुई वळवली. त्यांनी त्याचा इन्कार केला, पण संशयाचं मोहोळ हटलं नाही, परिणामी तिकिटाच्या शर्यतीतला पत्ता ‘कट’ झाला.

निशिकांतदादांनी मतदारसंघात स्वत:चा गट बांधलाय. संपर्क वाढवलाय, पण सदाभाऊंनी निशिकांतदादा सोडून इतरांना एकत्र केलंय, जयंतरावांविरोधात! त्यात नायकवडींचे हुतात्मा संकुल, महाडिक बंधू, वैभव शिंदे, भीमराव माने, सी. बी. पाटील गट, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार सामील झालेत. गौरव नायकवडी किंवा आनंदराव पवार यापैकी एकाला तिकीट द्या (पण निशिकांतदादांना नको!) हा त्यांचा हेका. बैठकांना बोलावलं जातं की माहीत नाही, पण त्यांच्या बैठकांमध्ये निशिकांतदादा दिसत नाहीत.

एका बाजूला सदाभाऊंनी जमवलेले विरोधक, तर दुसऱ्या बाजूला निशिकांतदादांसोबत माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील. दोन्ही गट जयंतरावांपेक्षा एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानणारे. आता एकाला तिकीट मिळालं की दुसरा गनिमाला जाऊन मिळालाच म्हणून समजा! सांगा, फायदा कुणाला?

जाता-जाता :कडकनाथप्रकरणी जयंतरावांना विचारलं, तर ते सांगतात, ‘माहिती घेतोय’. राज्याची जबाबदारी असल्यानं बहुधा त्यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रश्नही समजून घेण्यास वेळ मिळाला नसावा! खरं तर ‘आधी मतदारसंघ, मग बाकीचं राजकारण’, हे त्यांचं सुरुवातीपासूनचं सूत्र. पंधरा वर्षं मंत्री असतानाही त्यांची मतदारसंघावर घारीसारखी नजर असायची. कडकनाथ प्रकरणात मात्र जरा कानाडोळा झाला. किती ही व्यस्तता! की अंडरस्टँडिंग? तिरकस बेरजेच्या राजकारणात हातचा राखणं यालाच म्हणायचं.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक