शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

कडकनाथ प्रकरणात मौनामागं दडलंय अंडरस्टँडिंग ---- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:37 IST

राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?

ठळक मुद्दे- कारण राजकारण --राजकीय सोय आणि जिरवाजिरवी

श्रीनिवास नागे -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कडकनाथ कोंबडीपालन फसवणुकीचं प्रकरण चव्हाट्यावर आलं. या प्रकरणाचं केंद्र इस्लामपुरातच. संशयाची सुई काही राजकीय मंडळींकडं फिरत असलेली. रान पेटवण्यासाठी हे आयतं कोलीत... पण ‘अंडरस्टँडिंग’च्या खेळात सर्वच नेतेमंडळी मूग गिळून गप्प! भाजप-शिवसेनेवर तोफा डागणारे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा हा स्वत:चा मतदारसंघ असूनही ते बोलत नाहीत. एवढा ज्वलंत प्रश्न उचलण्याची, विरोधकांवर हल्ला चढवण्याची नामी संधी असताना त्यांनी या विषयावर अवाक्षरही काढलेलं नाही... यामागचं इंगित काय?‘कडकनाथ’ प्रकरण बाहेर येऊन महिना होत आला. आठ हजारावर गुंतवणूकदारांना तब्बल साडेपाचशे कोटीचा चुना लावला गेला. त्याची सर्वांत मोठी झळ वाळवा तालुक्याला बसल्याचं उघड होतंय. त्यात गरीब शेतकरी, बेरोजगार तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक नागवले गेले. खाद्य-औषधांअभावी पोल्ट्री शेडमधल्या कोंबड्यांची तडफड सुरू झालीय. पोलिसांचा तपास सुरू आहे, केवळ सांगण्यापुरताच! गुंतवणूकदार हवालदिल झालेत. पण तिथली राजकीय मंडळी गप्प आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय म्हणे. तेवढं सोडलं तर हे प्रकरण धसास लावण्यासाठी, ना सत्ताधारी पक्ष प्रयत्न करताहेत, ना विरोधक आक्रमक झालेत.दबावातून लादलेली अपरिहार्यता, राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?गेल्या वर्षभरापासून जयंतरावांचे विरोधक शड्डू ठोकताहेत. आखाडा एकच असला तरी सराव मात्र वेगवेगळ्या तालमीत. कुणी लांग बांधतंय, तर कुणी अंगाला तेल लावतंय, कुणी जोरबैठका काढतंय, कुणी वस्तादांच्या नुसतंच कानाला लागतंय, तर कुणी कुस्तीला जोड आपलीच ठरलीय म्हणून सांगतंय. मग जयंतरावांना त्याबाबत विचारलं जातं... ते हसतात आणि विरोधकांना बेदखल करण्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतात, ‘त्यांचा पैलवान तर ठरू दे!’ तेव्हापासून विरोधकांचा पैलवान अजून ठरतोय. लढत पंचवीस दिवसांवर आली तरी रिंगणात कुणी उतरायचं हेच स्पष्ट नाही. त्यातच विरोधकांतील फाटाफूटही चव्हाट्यावर आलीय. हेच जयंतरावांच्या पथ्यावर पडतं. विधानसभेच्या लागोपाठ सहा लढती त्यांनी याच जोरावर एकहाती मारल्यात. तत्पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी करावे लागणारे सगळे प्रयत्न ते करतात... अगदी इमानेइतबारे!राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जयंतरावांच्या गटाचे काही मोहरे भाजप-सेनेच्या तंबूत गेले. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील, वैभव शिंदे, भीमराव माने, स्वरूपराव पाटील त्यातलेच. इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचं मैदान मारल्यापासून निशिकांतदादांना आमदारकी खुणावायला लागलेली.

भाजपनं जिल्ह्यातल्या सत्तास्थानांवर कब्जा केल्यामुळं आणि सत्तेचं पाठबळ मिळाल्यामुळं सदाभाऊ खोत यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधलेलं. त्यातूनच दोघांचं फाटलं. दोघांनी आपापली तयारी सुरू केली, पण गेल्या दीड महिन्यात सदाभाऊंचं नाव मागं पडलं. कारण कडकनाथप्रकरणी विरोधकांनी त्यांच्याकडं संशयाची सुई वळवली. त्यांनी त्याचा इन्कार केला, पण संशयाचं मोहोळ हटलं नाही, परिणामी तिकिटाच्या शर्यतीतला पत्ता ‘कट’ झाला.

निशिकांतदादांनी मतदारसंघात स्वत:चा गट बांधलाय. संपर्क वाढवलाय, पण सदाभाऊंनी निशिकांतदादा सोडून इतरांना एकत्र केलंय, जयंतरावांविरोधात! त्यात नायकवडींचे हुतात्मा संकुल, महाडिक बंधू, वैभव शिंदे, भीमराव माने, सी. बी. पाटील गट, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार सामील झालेत. गौरव नायकवडी किंवा आनंदराव पवार यापैकी एकाला तिकीट द्या (पण निशिकांतदादांना नको!) हा त्यांचा हेका. बैठकांना बोलावलं जातं की माहीत नाही, पण त्यांच्या बैठकांमध्ये निशिकांतदादा दिसत नाहीत.

एका बाजूला सदाभाऊंनी जमवलेले विरोधक, तर दुसऱ्या बाजूला निशिकांतदादांसोबत माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील. दोन्ही गट जयंतरावांपेक्षा एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानणारे. आता एकाला तिकीट मिळालं की दुसरा गनिमाला जाऊन मिळालाच म्हणून समजा! सांगा, फायदा कुणाला?

जाता-जाता :कडकनाथप्रकरणी जयंतरावांना विचारलं, तर ते सांगतात, ‘माहिती घेतोय’. राज्याची जबाबदारी असल्यानं बहुधा त्यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रश्नही समजून घेण्यास वेळ मिळाला नसावा! खरं तर ‘आधी मतदारसंघ, मग बाकीचं राजकारण’, हे त्यांचं सुरुवातीपासूनचं सूत्र. पंधरा वर्षं मंत्री असतानाही त्यांची मतदारसंघावर घारीसारखी नजर असायची. कडकनाथ प्रकरणात मात्र जरा कानाडोळा झाला. किती ही व्यस्तता! की अंडरस्टँडिंग? तिरकस बेरजेच्या राजकारणात हातचा राखणं यालाच म्हणायचं.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक