शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

कडकनाथ प्रकरणात मौनामागं दडलंय अंडरस्टँडिंग ---- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:37 IST

राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?

ठळक मुद्दे- कारण राजकारण --राजकीय सोय आणि जिरवाजिरवी

श्रीनिवास नागे -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कडकनाथ कोंबडीपालन फसवणुकीचं प्रकरण चव्हाट्यावर आलं. या प्रकरणाचं केंद्र इस्लामपुरातच. संशयाची सुई काही राजकीय मंडळींकडं फिरत असलेली. रान पेटवण्यासाठी हे आयतं कोलीत... पण ‘अंडरस्टँडिंग’च्या खेळात सर्वच नेतेमंडळी मूग गिळून गप्प! भाजप-शिवसेनेवर तोफा डागणारे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा हा स्वत:चा मतदारसंघ असूनही ते बोलत नाहीत. एवढा ज्वलंत प्रश्न उचलण्याची, विरोधकांवर हल्ला चढवण्याची नामी संधी असताना त्यांनी या विषयावर अवाक्षरही काढलेलं नाही... यामागचं इंगित काय?‘कडकनाथ’ प्रकरण बाहेर येऊन महिना होत आला. आठ हजारावर गुंतवणूकदारांना तब्बल साडेपाचशे कोटीचा चुना लावला गेला. त्याची सर्वांत मोठी झळ वाळवा तालुक्याला बसल्याचं उघड होतंय. त्यात गरीब शेतकरी, बेरोजगार तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक नागवले गेले. खाद्य-औषधांअभावी पोल्ट्री शेडमधल्या कोंबड्यांची तडफड सुरू झालीय. पोलिसांचा तपास सुरू आहे, केवळ सांगण्यापुरताच! गुंतवणूकदार हवालदिल झालेत. पण तिथली राजकीय मंडळी गप्प आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय म्हणे. तेवढं सोडलं तर हे प्रकरण धसास लावण्यासाठी, ना सत्ताधारी पक्ष प्रयत्न करताहेत, ना विरोधक आक्रमक झालेत.दबावातून लादलेली अपरिहार्यता, राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?गेल्या वर्षभरापासून जयंतरावांचे विरोधक शड्डू ठोकताहेत. आखाडा एकच असला तरी सराव मात्र वेगवेगळ्या तालमीत. कुणी लांग बांधतंय, तर कुणी अंगाला तेल लावतंय, कुणी जोरबैठका काढतंय, कुणी वस्तादांच्या नुसतंच कानाला लागतंय, तर कुणी कुस्तीला जोड आपलीच ठरलीय म्हणून सांगतंय. मग जयंतरावांना त्याबाबत विचारलं जातं... ते हसतात आणि विरोधकांना बेदखल करण्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतात, ‘त्यांचा पैलवान तर ठरू दे!’ तेव्हापासून विरोधकांचा पैलवान अजून ठरतोय. लढत पंचवीस दिवसांवर आली तरी रिंगणात कुणी उतरायचं हेच स्पष्ट नाही. त्यातच विरोधकांतील फाटाफूटही चव्हाट्यावर आलीय. हेच जयंतरावांच्या पथ्यावर पडतं. विधानसभेच्या लागोपाठ सहा लढती त्यांनी याच जोरावर एकहाती मारल्यात. तत्पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी करावे लागणारे सगळे प्रयत्न ते करतात... अगदी इमानेइतबारे!राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जयंतरावांच्या गटाचे काही मोहरे भाजप-सेनेच्या तंबूत गेले. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील, वैभव शिंदे, भीमराव माने, स्वरूपराव पाटील त्यातलेच. इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचं मैदान मारल्यापासून निशिकांतदादांना आमदारकी खुणावायला लागलेली.

भाजपनं जिल्ह्यातल्या सत्तास्थानांवर कब्जा केल्यामुळं आणि सत्तेचं पाठबळ मिळाल्यामुळं सदाभाऊ खोत यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधलेलं. त्यातूनच दोघांचं फाटलं. दोघांनी आपापली तयारी सुरू केली, पण गेल्या दीड महिन्यात सदाभाऊंचं नाव मागं पडलं. कारण कडकनाथप्रकरणी विरोधकांनी त्यांच्याकडं संशयाची सुई वळवली. त्यांनी त्याचा इन्कार केला, पण संशयाचं मोहोळ हटलं नाही, परिणामी तिकिटाच्या शर्यतीतला पत्ता ‘कट’ झाला.

निशिकांतदादांनी मतदारसंघात स्वत:चा गट बांधलाय. संपर्क वाढवलाय, पण सदाभाऊंनी निशिकांतदादा सोडून इतरांना एकत्र केलंय, जयंतरावांविरोधात! त्यात नायकवडींचे हुतात्मा संकुल, महाडिक बंधू, वैभव शिंदे, भीमराव माने, सी. बी. पाटील गट, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार सामील झालेत. गौरव नायकवडी किंवा आनंदराव पवार यापैकी एकाला तिकीट द्या (पण निशिकांतदादांना नको!) हा त्यांचा हेका. बैठकांना बोलावलं जातं की माहीत नाही, पण त्यांच्या बैठकांमध्ये निशिकांतदादा दिसत नाहीत.

एका बाजूला सदाभाऊंनी जमवलेले विरोधक, तर दुसऱ्या बाजूला निशिकांतदादांसोबत माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील. दोन्ही गट जयंतरावांपेक्षा एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानणारे. आता एकाला तिकीट मिळालं की दुसरा गनिमाला जाऊन मिळालाच म्हणून समजा! सांगा, फायदा कुणाला?

जाता-जाता :कडकनाथप्रकरणी जयंतरावांना विचारलं, तर ते सांगतात, ‘माहिती घेतोय’. राज्याची जबाबदारी असल्यानं बहुधा त्यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रश्नही समजून घेण्यास वेळ मिळाला नसावा! खरं तर ‘आधी मतदारसंघ, मग बाकीचं राजकारण’, हे त्यांचं सुरुवातीपासूनचं सूत्र. पंधरा वर्षं मंत्री असतानाही त्यांची मतदारसंघावर घारीसारखी नजर असायची. कडकनाथ प्रकरणात मात्र जरा कानाडोळा झाला. किती ही व्यस्तता! की अंडरस्टँडिंग? तिरकस बेरजेच्या राजकारणात हातचा राखणं यालाच म्हणायचं.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक