शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
4
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
5
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
6
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
7
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
8
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
9
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
10
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
11
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
12
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
13
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
14
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
15
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
16
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
17
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
18
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
19
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
20
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ प्रकरणात मौनामागं दडलंय अंडरस्टँडिंग ---- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:37 IST

राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?

ठळक मुद्दे- कारण राजकारण --राजकीय सोय आणि जिरवाजिरवी

श्रीनिवास नागे -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कडकनाथ कोंबडीपालन फसवणुकीचं प्रकरण चव्हाट्यावर आलं. या प्रकरणाचं केंद्र इस्लामपुरातच. संशयाची सुई काही राजकीय मंडळींकडं फिरत असलेली. रान पेटवण्यासाठी हे आयतं कोलीत... पण ‘अंडरस्टँडिंग’च्या खेळात सर्वच नेतेमंडळी मूग गिळून गप्प! भाजप-शिवसेनेवर तोफा डागणारे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा हा स्वत:चा मतदारसंघ असूनही ते बोलत नाहीत. एवढा ज्वलंत प्रश्न उचलण्याची, विरोधकांवर हल्ला चढवण्याची नामी संधी असताना त्यांनी या विषयावर अवाक्षरही काढलेलं नाही... यामागचं इंगित काय?‘कडकनाथ’ प्रकरण बाहेर येऊन महिना होत आला. आठ हजारावर गुंतवणूकदारांना तब्बल साडेपाचशे कोटीचा चुना लावला गेला. त्याची सर्वांत मोठी झळ वाळवा तालुक्याला बसल्याचं उघड होतंय. त्यात गरीब शेतकरी, बेरोजगार तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक नागवले गेले. खाद्य-औषधांअभावी पोल्ट्री शेडमधल्या कोंबड्यांची तडफड सुरू झालीय. पोलिसांचा तपास सुरू आहे, केवळ सांगण्यापुरताच! गुंतवणूकदार हवालदिल झालेत. पण तिथली राजकीय मंडळी गप्प आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय म्हणे. तेवढं सोडलं तर हे प्रकरण धसास लावण्यासाठी, ना सत्ताधारी पक्ष प्रयत्न करताहेत, ना विरोधक आक्रमक झालेत.दबावातून लादलेली अपरिहार्यता, राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना?गेल्या वर्षभरापासून जयंतरावांचे विरोधक शड्डू ठोकताहेत. आखाडा एकच असला तरी सराव मात्र वेगवेगळ्या तालमीत. कुणी लांग बांधतंय, तर कुणी अंगाला तेल लावतंय, कुणी जोरबैठका काढतंय, कुणी वस्तादांच्या नुसतंच कानाला लागतंय, तर कुणी कुस्तीला जोड आपलीच ठरलीय म्हणून सांगतंय. मग जयंतरावांना त्याबाबत विचारलं जातं... ते हसतात आणि विरोधकांना बेदखल करण्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतात, ‘त्यांचा पैलवान तर ठरू दे!’ तेव्हापासून विरोधकांचा पैलवान अजून ठरतोय. लढत पंचवीस दिवसांवर आली तरी रिंगणात कुणी उतरायचं हेच स्पष्ट नाही. त्यातच विरोधकांतील फाटाफूटही चव्हाट्यावर आलीय. हेच जयंतरावांच्या पथ्यावर पडतं. विधानसभेच्या लागोपाठ सहा लढती त्यांनी याच जोरावर एकहाती मारल्यात. तत्पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी करावे लागणारे सगळे प्रयत्न ते करतात... अगदी इमानेइतबारे!राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जयंतरावांच्या गटाचे काही मोहरे भाजप-सेनेच्या तंबूत गेले. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील, वैभव शिंदे, भीमराव माने, स्वरूपराव पाटील त्यातलेच. इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचं मैदान मारल्यापासून निशिकांतदादांना आमदारकी खुणावायला लागलेली.

भाजपनं जिल्ह्यातल्या सत्तास्थानांवर कब्जा केल्यामुळं आणि सत्तेचं पाठबळ मिळाल्यामुळं सदाभाऊ खोत यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधलेलं. त्यातूनच दोघांचं फाटलं. दोघांनी आपापली तयारी सुरू केली, पण गेल्या दीड महिन्यात सदाभाऊंचं नाव मागं पडलं. कारण कडकनाथप्रकरणी विरोधकांनी त्यांच्याकडं संशयाची सुई वळवली. त्यांनी त्याचा इन्कार केला, पण संशयाचं मोहोळ हटलं नाही, परिणामी तिकिटाच्या शर्यतीतला पत्ता ‘कट’ झाला.

निशिकांतदादांनी मतदारसंघात स्वत:चा गट बांधलाय. संपर्क वाढवलाय, पण सदाभाऊंनी निशिकांतदादा सोडून इतरांना एकत्र केलंय, जयंतरावांविरोधात! त्यात नायकवडींचे हुतात्मा संकुल, महाडिक बंधू, वैभव शिंदे, भीमराव माने, सी. बी. पाटील गट, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार सामील झालेत. गौरव नायकवडी किंवा आनंदराव पवार यापैकी एकाला तिकीट द्या (पण निशिकांतदादांना नको!) हा त्यांचा हेका. बैठकांना बोलावलं जातं की माहीत नाही, पण त्यांच्या बैठकांमध्ये निशिकांतदादा दिसत नाहीत.

एका बाजूला सदाभाऊंनी जमवलेले विरोधक, तर दुसऱ्या बाजूला निशिकांतदादांसोबत माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील. दोन्ही गट जयंतरावांपेक्षा एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानणारे. आता एकाला तिकीट मिळालं की दुसरा गनिमाला जाऊन मिळालाच म्हणून समजा! सांगा, फायदा कुणाला?

जाता-जाता :कडकनाथप्रकरणी जयंतरावांना विचारलं, तर ते सांगतात, ‘माहिती घेतोय’. राज्याची जबाबदारी असल्यानं बहुधा त्यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रश्नही समजून घेण्यास वेळ मिळाला नसावा! खरं तर ‘आधी मतदारसंघ, मग बाकीचं राजकारण’, हे त्यांचं सुरुवातीपासूनचं सूत्र. पंधरा वर्षं मंत्री असतानाही त्यांची मतदारसंघावर घारीसारखी नजर असायची. कडकनाथ प्रकरणात मात्र जरा कानाडोळा झाला. किती ही व्यस्तता! की अंडरस्टँडिंग? तिरकस बेरजेच्या राजकारणात हातचा राखणं यालाच म्हणायचं.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक