शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अल्टिमेटम्ची मुदत संपली : ‘ताकारी, टेंभू’ आवर्तनाच्या आशा धुसर, विश्वजित कदम यांचे आंदोलन चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:36 IST

कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या

ठळक मुद्देताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी येणे बाकी सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी

प्रताप महाडिक ।कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या ८ दिवसांच्या अल्टिमेटम्ची मुदत २१ डिसेंबररोजी संपली. शासनाने टंचाई उपाययोजना निधीचे पैसे अद्याप दिले नाहीत. त्यामुळे दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू झाले नाही. त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ताकारी व टेंभू योजनांच्या आवर्तनासाठी कडेगाव तहसीलवर मोर्चा काढला होता. आठ दिवसात आवर्तन सुरू झाले नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला होता. जितेश कदम यांनी, कडेगाव तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता, तर आंदोलक शेतकºयांनी योजनांच्या लाभक्षेत्रात कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करणार, असे सांगितले होते. आता आठ दिवसांची मुदत संपली. त्यामुळे विश्वजित कदम काय निर्णय घेणार, यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

ताकारी योजनेची १० कोटी ३० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे महावितरणने दोन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. लाभक्षेत्रातील बहुतांशी शेतीपिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र पाणीपट्टीचे पैसे चोख भरूनही हतबल झाले आहेत.

ताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी साखर कारखान्यांकडून येणे बाकी आहे. याशिवाय टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची ताकारी योजनेची ४ कोटी, तर टेंभू योजनेची ८ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून येणे बाकी आहे. योजना सुरु झाल्यापासून आजवर ताकारी योजनेची जवळपास ४६ कोटी ६३ लाख, तर टेंभू योजनेची ३५ कोटी ६९ लाख इतकी पाणीपट्टी थकबाकी शेतकºयांकडून येणे बाकी आहे. सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी आहे.

दोन्ही योजनांची किमान ५० टक्के वीजबिल थकबाकीची रक्कम भरुन उर्वरित ५० टक्के भरण्याची हमी संबंधित योजनांकडून मिळाल्याशिवाय या योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत न जोडण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे आवर्तनाच्या आशा धुसर झाल्या आहेत .

आता राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसवू : कदमनिष्क्रिय शासनाने टंचाई निधी दिला नाही. त्यामुळे आवर्तन सुरू झाले नाही. आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आवर्तनासाठीच्या लढ्याला बळ देऊन राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसविल्याशिवाय आवर्तनाचा मार्ग मोकळा होणार नाही. आता आंदोलन तीव्र करणार, असा इशारा जितेश कदम यांनी दिला आहे.