शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

अल्टिमेटम्ची मुदत संपली : ‘ताकारी, टेंभू’ आवर्तनाच्या आशा धुसर, विश्वजित कदम यांचे आंदोलन चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:36 IST

कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या

ठळक मुद्देताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी येणे बाकी सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी

प्रताप महाडिक ।कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या ८ दिवसांच्या अल्टिमेटम्ची मुदत २१ डिसेंबररोजी संपली. शासनाने टंचाई उपाययोजना निधीचे पैसे अद्याप दिले नाहीत. त्यामुळे दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू झाले नाही. त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ताकारी व टेंभू योजनांच्या आवर्तनासाठी कडेगाव तहसीलवर मोर्चा काढला होता. आठ दिवसात आवर्तन सुरू झाले नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला होता. जितेश कदम यांनी, कडेगाव तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता, तर आंदोलक शेतकºयांनी योजनांच्या लाभक्षेत्रात कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करणार, असे सांगितले होते. आता आठ दिवसांची मुदत संपली. त्यामुळे विश्वजित कदम काय निर्णय घेणार, यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

ताकारी योजनेची १० कोटी ३० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे महावितरणने दोन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. लाभक्षेत्रातील बहुतांशी शेतीपिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र पाणीपट्टीचे पैसे चोख भरूनही हतबल झाले आहेत.

ताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी साखर कारखान्यांकडून येणे बाकी आहे. याशिवाय टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची ताकारी योजनेची ४ कोटी, तर टेंभू योजनेची ८ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून येणे बाकी आहे. योजना सुरु झाल्यापासून आजवर ताकारी योजनेची जवळपास ४६ कोटी ६३ लाख, तर टेंभू योजनेची ३५ कोटी ६९ लाख इतकी पाणीपट्टी थकबाकी शेतकºयांकडून येणे बाकी आहे. सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी आहे.

दोन्ही योजनांची किमान ५० टक्के वीजबिल थकबाकीची रक्कम भरुन उर्वरित ५० टक्के भरण्याची हमी संबंधित योजनांकडून मिळाल्याशिवाय या योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत न जोडण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे आवर्तनाच्या आशा धुसर झाल्या आहेत .

आता राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसवू : कदमनिष्क्रिय शासनाने टंचाई निधी दिला नाही. त्यामुळे आवर्तन सुरू झाले नाही. आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आवर्तनासाठीच्या लढ्याला बळ देऊन राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसविल्याशिवाय आवर्तनाचा मार्ग मोकळा होणार नाही. आता आंदोलन तीव्र करणार, असा इशारा जितेश कदम यांनी दिला आहे.