शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
4
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
5
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
6
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
7
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
8
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
9
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
11
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
12
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
13
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
14
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
15
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
16
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
17
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
18
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
19
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
20
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी

अल्टिमेटम्ची मुदत संपली : ‘ताकारी, टेंभू’ आवर्तनाच्या आशा धुसर, विश्वजित कदम यांचे आंदोलन चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:36 IST

कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या

ठळक मुद्देताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी येणे बाकी सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी

प्रताप महाडिक ।कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या ८ दिवसांच्या अल्टिमेटम्ची मुदत २१ डिसेंबररोजी संपली. शासनाने टंचाई उपाययोजना निधीचे पैसे अद्याप दिले नाहीत. त्यामुळे दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू झाले नाही. त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ताकारी व टेंभू योजनांच्या आवर्तनासाठी कडेगाव तहसीलवर मोर्चा काढला होता. आठ दिवसात आवर्तन सुरू झाले नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला होता. जितेश कदम यांनी, कडेगाव तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता, तर आंदोलक शेतकºयांनी योजनांच्या लाभक्षेत्रात कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करणार, असे सांगितले होते. आता आठ दिवसांची मुदत संपली. त्यामुळे विश्वजित कदम काय निर्णय घेणार, यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

ताकारी योजनेची १० कोटी ३० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे महावितरणने दोन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. लाभक्षेत्रातील बहुतांशी शेतीपिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र पाणीपट्टीचे पैसे चोख भरूनही हतबल झाले आहेत.

ताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी साखर कारखान्यांकडून येणे बाकी आहे. याशिवाय टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची ताकारी योजनेची ४ कोटी, तर टेंभू योजनेची ८ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून येणे बाकी आहे. योजना सुरु झाल्यापासून आजवर ताकारी योजनेची जवळपास ४६ कोटी ६३ लाख, तर टेंभू योजनेची ३५ कोटी ६९ लाख इतकी पाणीपट्टी थकबाकी शेतकºयांकडून येणे बाकी आहे. सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी आहे.

दोन्ही योजनांची किमान ५० टक्के वीजबिल थकबाकीची रक्कम भरुन उर्वरित ५० टक्के भरण्याची हमी संबंधित योजनांकडून मिळाल्याशिवाय या योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत न जोडण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे आवर्तनाच्या आशा धुसर झाल्या आहेत .

आता राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसवू : कदमनिष्क्रिय शासनाने टंचाई निधी दिला नाही. त्यामुळे आवर्तन सुरू झाले नाही. आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आवर्तनासाठीच्या लढ्याला बळ देऊन राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसविल्याशिवाय आवर्तनाचा मार्ग मोकळा होणार नाही. आता आंदोलन तीव्र करणार, असा इशारा जितेश कदम यांनी दिला आहे.