शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Ranbir-Alia : प्राण्यांच्या अनाथालयात दोघांचा जीव जडला; अश्वांच्या जोडीला मिळाले 'आलिया-रणबीर'चे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:35 IST

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ॲनिमल राहत संस्थेने त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, अशी गोड भेट दिली आहे.

सांगली : बॉलीवूडचे नवविवाहित हॉट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना लग्नसोहळ्यात असंख्य भेटवस्तू मिळाल्या असतील. त्यात काही नवलही नसावे. मात्र प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ॲनिमल राहत संस्थेने त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, अशी गोड भेट दिली आहे. संस्थेच्या प्राणी अनाथालयातील अश्वाच्या जोडीचे नामकरण रणबीर आणि आलिया असे केले आहे.

जखमी, बेवारस किंवा संकटग्रस्त प्राण्यांसाठी संस्थेचे बेळंकी (ता. मिरज) येथे अनाथालय आहे. तेथील अश्वांच्या जोडीचे शुक्रवारी नामकरण करण्यात आले. यातील घोडी विवाह समारंभात नाचण्यासाठी किंवा मिरवणुकीसाठी वापरली जायची, तर घोडा मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे व्हिक्टोरिया खेचण्यासाठी वापरला जायचा. व्यावसायिक मंदीमुळे घोडीला मालकाने बेवारस, जखमी अवस्थेत सोडून दिले होते, तर घोडा मुंबईतून जप्त करण्यात आला होता. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोहोंवर अनाथालयात उपचार केले. आपुलकीने काळजी घेतली. सध्या दोघेही ठणठणीत आहेत. खेळण्या-बागडण्यासाठी विस्तीर्ण मैदान व सोबती आहेत. दोहोंनी परस्परांना जीव लावल्याचे कार्यकर्त्यांच्या ध्यानी आले. त्यावरुनच नामकरणाची संकल्पना सुचली.

अभिनेता रणबीर कपूरला प्राण्यांविषयक अतिव जिव्हाळा आहे. या दांपत्याने लग्नसोहळ्यात घोड्यांचा वापर टाळला. प्राण्यांवरील प्रेम दाखविण्यासाठी हा अतिशय योग्य प्रसंग होता. लग्नसोहळ्याच्या जल्लोषात संवेदनशील घोडे घाबरण्याची किंवा बुजण्याची शक्यता असते. रणबीरच्या निर्णयाने घोड्यांना संरक्षण मिळाले. त्याच्या प्राणीप्रेमाचे अनुकरण सर्वांनी करायला हवे. त्याच्या निर्णयाप्रती कृतज्ञता म्हणून अनाथालयातील जोडीचे नामकरण आलीया व रणबीर असे केले.डॉ. नरेश उप्रेती,मुख्य अधिकारी, ॲनिमल राहत, सांगली

टॅग्स :Ranbir Kapoorरणबीर कपूरAlia Bhatआलिया भटRanbir Alia Weddingरणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ