शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

रत्नागिरीत हळदीचे संशोधन उपकेंद्र, मग सांगलीला कधी?; टर्मरिक सिटीचे लोकप्रतिनिधी गप्पच 

By संतोष भिसे | Updated: May 31, 2023 17:29 IST

सांगलीच्या तुलनेने रत्नागिरीत हळदीचे अत्यल्प उत्पादन

संतोष भिसेसांगली : हळदीची मोठी बाजारपेठ असलेल्या आणि ‘टर्मरिक सिटी’ अशी ओळख असलेल्या सांगलीत हळद शेती व व्यवसायाच्या विकासासाठी हेतूपुरस्सर काही प्रकल्प राबवण्याबाबत उदासीनताच दिसत आहे. सांगलीच्या तुलनेने हळदीचे अत्यल्प उत्पादन असलेल्या रत्नागिरीत हळदीचे संशोधन उपकेंद्र गेल्या महिन्यात मंजूर झाले, पण येथे मात्र त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली नाहीत.रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी हळद संशोधन उपकेंद्र आणि विकासविषयक प्रकल्प राबविण्याची आग्रही मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला प्राथमिक मंजुरीही दिली. गेल्या काही वर्षांत कोकणात हळदीची शेती वाढली आहे. कोकण विभागात या गेल्या वर्षात १९७ हेक्टर क्षेत्रात हळदीची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात हळदीची लागवड होते.शिवाय कर्नाटकसह विविध जिल्ह्यांतून आवकही मोठी होते. गेल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच ६१०३६३ क्विंटल हळदीची आवक झाली आहे. बाजार समितीच्या उलाढालीत हळद अग्रक्रमावर आहे. या स्थितीत हळद शेतीच्या संशोधनासाठी प्रकल्प राबविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.यादरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये शासनाने वसमत (जि. हिंगोली) येथे १०० कोटी रूपये खर्चाच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली. त्यानंतर रत्नागिरीतही मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक मंजुरी दिली आहे. या स्थितीत सांगलीकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे येत आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही हळद टिकून राहत असल्याने शेतकरी त्याकडे वळले आहेत. शिवाय सिंचन योजनांमुळे पाण्याची उपलब्धता झाल्यानेही हळदीचे क्षेत्र वाढत आहे.

शास्त्रीय मार्गदर्शन, संशोधन व्हावेहळदीची शेती, त्यावर प्रक्रिया ही कामे अद्याप परंपरागत पद्धतीने केली जात आहेत. पण हळदीपुढे रोग, कीड अशा काही समस्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन आणि संशोधनाची गरज आहे. प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणारे वाण मिळण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापारी, लोकप्रतिनिधींकडून शासनावर दबाव गरजेचा आहे. रत्नागिरीकरांनी करून दाखवले, ते सांगलीत का होत नाही, असा प्रश्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरी