शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या मानवलोककडून पूरग्रस्तांची खरी मानवसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:36 IST

इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.

ठळक मुद्दे१३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.

सतीश पाटील ।बुधगाव : संकटकाळात गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हे खऱ्या माणुसकीचे गुणवैशिष्ट्य असते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरानंतर, ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या अंबाजोगाई (जि. बीड)च्या मानवलोक संस्थेला या गुणवैशिष्ट्यानेच येथे खेचून आणले. सलग बारा दिवसांपासून या संस्थेचे मदतकार्य सुरु आहे.

सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, माळवाडी, भिलवडी, चोपडेवाडी, बोरबन, सुखवाडी, मौजे डिग्रज, पद्माळे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी आणि राजापूरवाडी इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. संस्थेने तीन जेसीबींच्या मदतीने तब्बल बारा दिवस अहोरात्र स्वच्छतेचे काम केले.

सांगली जिल्ह्यातील दहा गावांमध्ये, तर कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूरग्रस्तांना ह्यकम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नदान केले. सुमारे १५ हजार लोकांना त्याचा लाभ झाला. गाळाने भरलेले रस्ते जेसीबीच्या मदतीने साफ करण्याबरोबरच सुमारे ३० मृत जनावरांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. १२ आॅगस्ट ते २१ आॅगस्टअखेर दहा दिवस हे काम चालले. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.

मानवलोकण ही संस्था १९८२ मध्ये डॉ. द्वारकादास लोहिया या ध्येयवेड्या माणसाने अंबाजोगाईत सुरु केली. ही संस्था नावारुपास आली, ती १९९३ च्या किल्लारी भूकंपावेळी. मानवलोकणचे कार्यकर्ते त्यावेळीही किल्लारीत पोहोचले होते. संस्थेच्या या मदतकार्याबद्दल युनिसेफच्या अधिकारी पथकाने तसेच गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी संस्थेला कौतुकाची थाप दिली आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSocialसामाजिक