शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ऋषिकेश, हरिद्वारची यात्रा ८ हजारांची, पण फसव्या एजंटांमुळे यात्रेचा खर्च ३० हजारांवर!

By अविनाश कोळी | Updated: June 16, 2024 15:56 IST

बोगस एजंटांवर कारवाई करण्याची नागरिक जागृती मंचची मागणी

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: घरबसल्या बुकिंग करून ऋषिकेश व हरिद्वारची यात्रा अवघ्या आठ हजार रुपयांमध्ये करता येत असताना फसव्या एजंटांमुळे प्रवाशांकडून ३० हजार रुपये पॅकेजच्या माध्यमातून वसूल केले जात आहेत. नुकतीच अशी फसवेगिरीची घटना उजेडात आल्याने संबंधित एजंटवर कारवाई करण्याची मागणी नागरिक जागृती मंचतर्फे करण्यात आली आहे.

यात्रेकरूंची फसवणूक होऊ नये म्हणून मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. त्याद्वारे प्रवाशांनी स्वत: यात्रेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेल्वे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या मिरज जंक्शनजवळील बोगस रेल्वे एजंटांवर सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

तिकीट १ हजारात, राहण्याची सोय मोफत

सांगली ते ऋषिकेश, हरिद्वारचे रेल्वे तिकीट फक्त १ हजार रुपये आहे. येता-जाता प्रति व्यक्ती दोन हजार रुपये खर्च होतो. ऋषिकेश येथे भाविकांसाठी मोफत राहण्याची सोय आहे. त्याची माहितीही मंचने दिली होती. रेल्वे तिकिटाचे दोन हजार व इतर खर्च ५ ते ६ हजार गृहित धरला तर ८ हजार खर्चून एक व्यक्ती सांगली ते ऋषिकेश, हरिद्वार जाऊन सहा ते सात दिवसांत परत येऊ शकतो.

ट्रॅव्हल कंपनीसोबत एजंटांचे संगनमत

मिरजेतील काही बोगस रेल्वे एजंटांनी इचलकरंजीच्या ट्रॅव्हल कंपनीसोबत संगनमत करून सांगली स्थानकाऐवजी मिरजेतून पॅकेज टूरमार्फत जाण्यास प्रेरित करून अनेक प्रवाशांकडून हरिद्वारसाठी प्रति व्यक्ती २५ ते ३० हजार रुपये घेऊन फसवले आहे, अशी तक्रार मंचने केली आहे.

रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट काढून देतो म्हणून प्रवाशांची फसवणूक करणारे इतर अनेक बोगस रेल्वे एजंट मिरज स्थानकावर कार्यरत असून, अशा सर्वांवर गुन्हा दाखल करावा. तसेच चारधामच्या यात्रेचे पॅकेज घेऊन हरिद्वारात प्रवाशांना सोडून येणाऱ्या व पॅकेज करून लुटणाऱ्या एजंटांवरही कारवाई करावी, अशी मागणी मंचने केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली