शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

तासगावच्या रक्तदात्यांना ‘हिमालया’चा सलाम, राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:38 IST

डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक्क हिमालयाने सलाम केला आहे. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्काराने या ग्रुपला गौरविण्यात आले.

ठळक मुद्देतासगावच्या रक्तदात्यांना ‘हिमालया’चा सलामबॉम्बे ओ ग्रुपच्या चळवळीचे कौतुक

सांगली : डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक्क हिमालयाने सलाम केला आहे. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्काराने या ग्रुपला गौरविण्यात आले.हिमालयाच्या पर्वतरांगांना कवेत घेतलेल्या हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात रक्तदानाशी निगडीत काम करणाऱ्या मोजक्याच पन्नास संस्थांना सोबत घेऊन ही संस्था कार्यरत आहे.

या संस्थेने यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तासगावच्या बॉम्बे ओ ब्लड ग्रुपचा प्रदान केला. दुर्मिळ रक्तगट असूनही देशभरात अशा रक्तदात्यांचे जाळे तासगावच्या या ग्रुपने विणले. विक्रम यादव यांच्या पुढाकाराने उभारलेल्या संस्थेने गेल्या काही वर्षात देशातील, परदेशातील रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे कार्य सुरू आहे. या कार्याची दखल घेत हिमालयन सेव्हिवर्स संस्थेने शहीद दिनाच्या निमित्ताने तासगावच्या या ग्रुपचा सन्मान केला.अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव, महेश चौगुले, विनोद धोतरे, स्विटी मोरे,स्वप्निल कुंभार, निखिल हारोले, अवधुत जाधव, रश्मी मखमल्ला,रूपाली कुरणे,रोहीत कदम,यांनी स्वीकारला कांगडाचे उपजिल्हाधिकारी ललित पाल, भारतीय कबड्डी संघाचे कर्णधार अजय टाकुर आदी यावेळी उपस्थित होते.

हिमालयन सेव्हिवर्सचे अध्यक्ष हरीष म्हणाले की, रक्तदानासारखे दुसणे पुण्यकार्य कोणते नाही. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. ते फक्त मानवी शरिरात तयार होते. त्या रक्ताला कोणत्या जातीपातीचे बंधन नाही.तासगावच्या संस्थेच्या कार्याने आमची मने जिंकली. देशभरात त्यांनी उभारलेले कार्य हे खुप मोठे आहे.विक्रम यादव म्हणाले की, आम्ही संस्थेच्या माध्यमातुन संपुर्ण देशभर मोफत रक्त पुरवठा करतो. त्यासाठी देशातील अन्य रक्तदानाचे काम करणाऱ्या संस्थांचेही सहकार्य मिळते. त्या सर्व संस्थांचाही हा सन्मान आहे. अत्यंत गरीब रूग्णांना दीड लाखापर्यंतची आर्थिक मदतही आम्ही करीत असतो. आमच्या संस्थेला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्या सर्व रक्तदात्यांना समर्पित करीत आहे, जे रक्ताची गरज पडल्यावर विनामोबदला व निस्वार्थीपणे रक्तदान करतात त्यासाठी वेळ देतात.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीSangliसांगली