शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सांगली जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:01 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सात पोलीस निरीक्षक व सहा ...

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सात पोलीस निरीक्षक व सहा उपनिरीक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा बदल्यांचा आदेश जारी केला. बदली झालेल्या अधिकाºयांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, कडेगावचे कल्लाप्पा पुजारी, इस्लामपूरचे विश्वास साळोखे व जतचे अशोक भवड यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे. संजयनगर ठाण्याचे प्रताप पोमण यांची सातारला बदली करण्यात आली आहे. सायबर क्राईम विभागाचे युवराज मोहिते यांची पुणे ग्रामीणला, कवठेमहांकाळचे प्रकाश गायकवाड यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. या सात अधिकाºयांचा जिल्ह्यातील तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमळे, योगेश पाटील, प्रियांका सराटे, सुजाता पाटील, अजित भोसले व नंदकुमार सोनवलकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्यांची बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीणहून पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सातारहून चंद्रकांत बेदरे, पुणे ग्रामीणचे पांडुरंग सुतार, कोल्हापूरचे बिपीन हसबनीस यांची सांगलीला बदली झाली आहे. बेदरे यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, तर अन्य तीन अधिकारी मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या बदल्या केल्या आहेत. सातारहून सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी-इनामदार, संजय हरुगडे यांची, तर पुणे ग्रामीणहून अरविंद काटे यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरहून पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, महादेव जठार, अजित पाटील, रोहिदास पवार, उदय दळवी, गणेश माने व अक्षयकुमार ठिकाणे यांचीही सांगलीत बदली झाली आहे.जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा १३ अधिकाºयांच्या बदल्या झाल्या असल्या तरी, नव्याने जिल्ह्यात १४ अधिकारी दाखल होत आहेत. यामध्ये चार निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक व सात उपनिरीक्षकांचा समावेश आहे.अधिकाºयांचे खांदेपालट होेणार!आता सांगलीत संजयनगर, सांगली ग्रामीण, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, जत व कडेगाव ही पोलीस ठाणी रिक्त झाली आहेत. या सहा ठाण्यात नवीन अधिकाºयांची नियुक्ती करावी लागणार आहे. जिल्ह्यात नव्याने केवळ चारच निरीक्षक दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांतील अधिकाºयांचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे.