शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मिरजेत उमेदवार निवडीचे त्रांगड

By admin | Updated: September 17, 2014 23:05 IST

राष्ट्रवादी, रिपाइंचा बंडाचा पवित्रा : भाजप-शिवसेनेत बेदिली कायमे

सदानंद औंधे - मिरज =मिरज विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने काँग्रेस उमेदवार कोण, यावरच निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी इच्छुकांनी बंडखोरीची तयारी सुरू केली असून, महायुतीतील शिवसेनेने पुन्हा मतदारसंघावर हक्क सांगितल्याने व रिपाइंने बंडखोरी जाहीर केल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील बेदिलीचा यंदा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच गेले वर्षभर काँग्रेसच्या इच्छुकांनी स्थानिक, बाहेरचा असा वाद निर्माण करून वातावरण तापविले आहे. प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली असल्याने काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार व उमेदवारी मिळाली नाही, तर बंडखोरीचा इशारा देणाऱ्या इच्छुकांपैकी कितीजण मैदानात टिकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेतेही काँग्रेस बंडखोरांना प्रोत्साहन देत आहेत. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेशोत्सवात झालेल्या दंगलीचा फायदा होऊन भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना कार्यकर्ते भाजपसोबत फटकून आहेत. शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपशी फटकून असल्याने व मिरज पूर्वभागातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून मतदार नाराज असल्याने, त्याचा भाजपला फटका बसणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मिरज मतदारसंघात शिवसेनेचे बजरंग पाटील यांनी दोनवेळा चांगली लढत दिली होती. मात्र मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ मध्ये भाजपकडे गेला. यावेळी शिवसेनेने पुन्हा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेतील बेदिली दिसून आली होती. भाजप, सेना पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरून रिपाइं बंडाचा झेंडा फडकविण्याच्या पवित्र्यात आहे. रिपाइंने अशोक कांबळे यांची मिरजेतून उमेदवारी जाहीर करून युतीच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. मिरज पूर्वभागात अजितराव घोरपडे यांच्या गटाच्या मदतीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. आता घोरपडे यांनी भाजपप्रवेश केला आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता असल्याने, बंडखोर उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, महेश कांबळे यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांनी बंडखोरी केल्यास त्यांना राष्ट्रवादीची रसद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांची बंडखोरी काँग्रेसला अडचणीची ठरणार आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांतील समन्वयाचा अभाव व रिपाइंची बंडखोरी हीसुद्धा भाजप उमेदवारासाठी अडथळा आहे. इच्छुकांची मोठी संख्या व पाडापाडीच्या राजकारणाचा ‘मिरज पॅटर्न’ यामुळे मिरज विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. ओवेसींचाही उमेदवार मिरज शहरात अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी असल्याने त्यांची मते काँग्रेसला मिळू नयेत यासाठी ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या पक्षाच्या उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी काही नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस विरोधकांच्या या खेळीबाबत आणि ही खेळी यशस्वी होणार का, याबाबत नेतेमंडळींत चर्चा सुरू आहे. गत विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आ. खाडे यांचा उघड प्रचार केला होता. मात्र गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे घोरपडे व खाडे यांचे सख्य असल्याचे दिसले नाही. घोरपडे यांनी आता भाजपप्रवेश केला असला तरी, त्यांचा गट राष्ट्रवादी बंडखोराच्याच पाठीशी असल्याचा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहेत. कोणाला कोणाची छुपी रसद आहे, हे निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतरच उघड होणार आहे.