शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

मिरजेत उमेदवार निवडीचे त्रांगड

By admin | Updated: September 17, 2014 23:05 IST

राष्ट्रवादी, रिपाइंचा बंडाचा पवित्रा : भाजप-शिवसेनेत बेदिली कायमे

सदानंद औंधे - मिरज =मिरज विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने काँग्रेस उमेदवार कोण, यावरच निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी इच्छुकांनी बंडखोरीची तयारी सुरू केली असून, महायुतीतील शिवसेनेने पुन्हा मतदारसंघावर हक्क सांगितल्याने व रिपाइंने बंडखोरी जाहीर केल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील बेदिलीचा यंदा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच गेले वर्षभर काँग्रेसच्या इच्छुकांनी स्थानिक, बाहेरचा असा वाद निर्माण करून वातावरण तापविले आहे. प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली असल्याने काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार व उमेदवारी मिळाली नाही, तर बंडखोरीचा इशारा देणाऱ्या इच्छुकांपैकी कितीजण मैदानात टिकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेतेही काँग्रेस बंडखोरांना प्रोत्साहन देत आहेत. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेशोत्सवात झालेल्या दंगलीचा फायदा होऊन भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना कार्यकर्ते भाजपसोबत फटकून आहेत. शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपशी फटकून असल्याने व मिरज पूर्वभागातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून मतदार नाराज असल्याने, त्याचा भाजपला फटका बसणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मिरज मतदारसंघात शिवसेनेचे बजरंग पाटील यांनी दोनवेळा चांगली लढत दिली होती. मात्र मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ मध्ये भाजपकडे गेला. यावेळी शिवसेनेने पुन्हा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेतील बेदिली दिसून आली होती. भाजप, सेना पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरून रिपाइं बंडाचा झेंडा फडकविण्याच्या पवित्र्यात आहे. रिपाइंने अशोक कांबळे यांची मिरजेतून उमेदवारी जाहीर करून युतीच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. मिरज पूर्वभागात अजितराव घोरपडे यांच्या गटाच्या मदतीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. आता घोरपडे यांनी भाजपप्रवेश केला आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता असल्याने, बंडखोर उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, महेश कांबळे यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांनी बंडखोरी केल्यास त्यांना राष्ट्रवादीची रसद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांची बंडखोरी काँग्रेसला अडचणीची ठरणार आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांतील समन्वयाचा अभाव व रिपाइंची बंडखोरी हीसुद्धा भाजप उमेदवारासाठी अडथळा आहे. इच्छुकांची मोठी संख्या व पाडापाडीच्या राजकारणाचा ‘मिरज पॅटर्न’ यामुळे मिरज विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. ओवेसींचाही उमेदवार मिरज शहरात अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी असल्याने त्यांची मते काँग्रेसला मिळू नयेत यासाठी ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या पक्षाच्या उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी काही नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस विरोधकांच्या या खेळीबाबत आणि ही खेळी यशस्वी होणार का, याबाबत नेतेमंडळींत चर्चा सुरू आहे. गत विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आ. खाडे यांचा उघड प्रचार केला होता. मात्र गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे घोरपडे व खाडे यांचे सख्य असल्याचे दिसले नाही. घोरपडे यांनी आता भाजपप्रवेश केला असला तरी, त्यांचा गट राष्ट्रवादी बंडखोराच्याच पाठीशी असल्याचा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहेत. कोणाला कोणाची छुपी रसद आहे, हे निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतरच उघड होणार आहे.