शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पलूस-कडेगावला पारंपरिक सत्तासंघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:35 IST

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.

ठळक मुद्देMaharashtra Vidhan Sabha 2019 : पलूस-कडेगावला पारंपरिक सत्तासंघर्षकदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व

प्रताप महाडिक कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.डॉ. पतंगराव कदम यांनी १९८५ व १९९० मध्ये अनुक्रमे अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून भिलवडी-वांगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्याअर्थाने कदम-देशमुख घराण्यात थेट सत्तासंघर्ष सुरू झाला.

यावेळी काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांचा अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी पराभव केला. देशमुख यांचे अकाली निधन झाल्याने १९९६ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव केला.त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार निवडणुका जिंकून पतंगराव कदम यांनी पूर्वीच्या भिलवडी-वांगी आणि सध्याच्या पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी २००४ वगळता अन्य तीन निवडणुकांमध्ये पतंगराव कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख यांच्यात थेट लढत झाली. डॉ. पतंगराव कदम यांना दीर्घकाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरम्यान, देशमुख कुटुंबीयांनीही दोन साखर कारखाने, दोन सूतगिरण्या आणि दूध संघ उभारून कदम यांना शह दिला.दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम यांना विधानसभेवर बिनविरोध संधी मिळाली. आमदार झाल्यावर विश्वजित कदम यांनी अल्पावधित मतदारसंघ आणि विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी केली.

दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही पारदर्शक कारभार करीत, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. या निवडणुकीत विश्वजित आणि संग्रामसिंह हे दोन्ही तगडे उमेदवार आमने-सामने येणार, हे जवळपास निश्चित आहे. यात बाजी कोण मारणार? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

टॅग्स :palus-kadegaon-acपलस काडेगावSangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदम