शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पलूस-कडेगावला पारंपरिक सत्तासंघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:35 IST

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.

ठळक मुद्देMaharashtra Vidhan Sabha 2019 : पलूस-कडेगावला पारंपरिक सत्तासंघर्षकदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व

प्रताप महाडिक कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.डॉ. पतंगराव कदम यांनी १९८५ व १९९० मध्ये अनुक्रमे अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून भिलवडी-वांगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्याअर्थाने कदम-देशमुख घराण्यात थेट सत्तासंघर्ष सुरू झाला.

यावेळी काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांचा अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी पराभव केला. देशमुख यांचे अकाली निधन झाल्याने १९९६ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव केला.त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार निवडणुका जिंकून पतंगराव कदम यांनी पूर्वीच्या भिलवडी-वांगी आणि सध्याच्या पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी २००४ वगळता अन्य तीन निवडणुकांमध्ये पतंगराव कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख यांच्यात थेट लढत झाली. डॉ. पतंगराव कदम यांना दीर्घकाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरम्यान, देशमुख कुटुंबीयांनीही दोन साखर कारखाने, दोन सूतगिरण्या आणि दूध संघ उभारून कदम यांना शह दिला.दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम यांना विधानसभेवर बिनविरोध संधी मिळाली. आमदार झाल्यावर विश्वजित कदम यांनी अल्पावधित मतदारसंघ आणि विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी केली.

दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही पारदर्शक कारभार करीत, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. या निवडणुकीत विश्वजित आणि संग्रामसिंह हे दोन्ही तगडे उमेदवार आमने-सामने येणार, हे जवळपास निश्चित आहे. यात बाजी कोण मारणार? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

टॅग्स :palus-kadegaon-acपलस काडेगावSangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदम