शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

परंपरेचे बंध तोडून विधवा तरुणीचे दिराशी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:12 IST

लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील पाटील कुटुंबियांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून नव्या सुदृढ परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.

ठळक मुद्देपरंपरेचे बंध तोडून विधवा तरुणीचे दिराशी लग्नकुटुंबियांच्या निर्णयाचे कौतुक, तरुणीच्या आयुष्याला पुन्हा सुखाची पालवी

सांगली : लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील पाटील कुटुंबियांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून नव्या सुदृढ परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.सांगलीतील शांताराम नामदेव पाटील यांचा मोठा मुलगा संतोष याचे लग्न इचलकरंजी येथील दत्तात्रय निवृत्ती पाटील यांची कन्या सोनाली हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजे ५ आॅगस्ट २0१८ रोजी संतोषचे अल्पशा आजाराने निधन झाले.निधनासमयी तिची मुलगी सहा महिन्याची होती. पदरी छोटीशी कन्या आणि मोठ्या आयुष्याच्या अनिश्चित भविष्याची चिंता घेऊन सोनालीची वाटचाल सुरू झाली. मुलाच्या मृत्यूबरोबरच सुनेच्या भविष्याची आणि तिच्या दु:खाची चिंता तिची सासू राजश्री यांना वाटू लागली. राजश्री या पूर्वीपासूनच पुरोगामी विचाराच्या असल्याने त्यांनी सुनेचे वैधव्य दूर करण्याचा निर्णय घेतला.तिचा आयुष्यभर सांभाळ करायचा निर्णय घेतला तरी धाकटी सून म्हणून घरात येणारी स्त्री मोठ्या सुनेच्या मुलाला तितके प्रेम देईलच असे नाही. याशिवाय पुन्हा भविष्यातील या दोन्ही महिलांचे नातेसंबंध कसे राहतील याचीही चिंता त्यांना होती.

त्यामुळे राजश्री यांनी सोनालीचा विवाह तिच्या धाकट्या दिराशी म्हणजेच उमेशशी करण्याचा निर्णय घेतला. शांताराम यांना ही गोष्ट पटवून दिली. त्यानंतर त्यांनी सोनालीच्या आई-वडिलांना बोलावून त्यांनाही हा निर्णय सांगितला.परंपरेचे बंध तोडताना राजश्री यांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा एका स्त्रीच्या आयुष्याचा विचार महत्वाचा असल्याचे सर्वांना सांगितले. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीस होकार दिला.त्यामुळे सोनालीचा गत आठवड्यात तिच्या दिराशी म्हणजेच उमेश पाटीलशी विवाह झाला. सोनाली संतोष पाटीलची आता सोनाली उमेश पाटील अशी तिची नवी ओळख तयार झाली. त्यांच्या या नात्याला माणुसकीची किनार असल्याने समाजातील अनेक लोकांनी या निर्णयाचे कौतुक केले.

टॅग्स :marriageलग्नSangliसांगली