शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

व्यापाऱ्यांनी अर्धा किलोच बेदाणा सौद्यात बघायचा!

By admin | Updated: June 22, 2016 00:10 IST

बैठकीत तोडगा : जास्त उधळला तर चोप मिळणार

तासगाव : बेदाणा उधळणीविरोधात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी तासगाव बाजार समितीत बाजार समिती, व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक झाली. यावेळी अर्धा किलोच बेदाणा सौद्यामध्ये व्यापाऱ्यांनी पहावा. त्याच्यापेक्षा जास्त बेदाणा उधळला तर व्यापाऱ्यांना चोप देऊन वरील नुकसान त्यांच्याकडून वसूल केले जाणार असल्याचा तोडगा बाजार समिती व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत मंगळवारी निघाला. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे व व्यापारी असोसिएशनचे व्यापारी उपस्थित होते. दुपारी दीड वाजता तासगाव बाजार समितीत ही बैठक सुरू झाली. सांगली जिल्ह्यात तासगाव, मिरज, पलूस, जत, कवठेमहांकाळ, वाळवा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष पीक घेतले जाते. पिकवलेल्या द्राक्षापैकी ४० ते ५० टक्के द्राक्षापासून बेदाणा केला जातो. तासगाव ही बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र मूठभर व्यापारी आणि दलालांच्या ताब्यात हा व्यवसाय आहे. दर पाडणे, दर वाढवणे हे व्यापारी दलाल करतात. बेदाणा मोठ्याप्रमाणात उधळला जातो. त्याचे नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागते. ते बंद व्हावे, अशी मागणी महेश खराडे यांनी केली.व यापुढे अर्धा किलो बेदाणाच व्यापाऱ्यांनी पहावा. त्यापेक्षा जास्त उधळला तर व्यापाऱ्यांना चोपून त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे नुकसान वसूल करू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच शीतगृहे आॅनलाईन करा, वेळेत पेमेंट करा, बेदाण्याला हमीभाव द्या, शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा, बेदाण्याचा खप वाढावा यासाठी जाहिरात करावी आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मात्र सभापती अविनाश पाटील व व्यापारी असोशिएशनने पत्रक काढून तशा सूचना व्यापाऱ्यांना देण्यात येतील, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अशोक खाडे, भुजंगराव पाटील, गुलाबराव यादव, सचिन पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)बिलांसाठी होणार तीन बाजार समित्यांची बैठकशेतकऱ्यांना बेदाण्याचे पेमेंट वेळेवर दिले जात नाही. २३ दिवसात पेमेंट देणे बंधनकारक असताना ४० ते ५० दिवस पेमेंट मिळत नाही. बेदाणा बॉक्सचे पैसे शेतकऱ्यांना द्या, शीतगृहे आॅनलाईन करा, उधळण थाबवा, वेळेत पेमेंट करा, बेदाण्याला हमीभाव द्या, शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा, बेदाणा खप वाढवा यासाठी जाहिरात करावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी तासगाव, सांगली व पंढरपूर या तीन बाजार समित्या व व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात २३ दिवसात पेमेंटची मागणी व अन्य मागण्यांवर चर्चा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.