शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकºयांची लूट-दर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 20:21 IST

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन ...

ठळक मुद्देबाजार समितीने लक्ष देण्याची मागणी

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन व्यापाºयांनी एकी करुन दर पाडून शेतकºयांची लूट सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत, अशी डाळिंब उत्पादक शेतकºयांनी मागणी केली आहे.

तालुक्यात सध्या युरोपसह परदेशात डाळिंबाची निर्यात करण्यासाठी रसायनमुक्त डाळिंब मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे. अशाप्रकारचे उत्पादन करण्यासाठी शेतकºयांना खूप नियोजन करुन जादा उत्पादन खर्च करावा लागत आहे. पण चांगला दर मिळेल या आशेने शेतकरी मोठा खर्च करीत आहेत. मोठ्या कष्टाने उत्पादन केलेल्या डाळिंबाला दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

डाळिंब पक्व झाल्यानंतर व्यापारी बागेत येऊन शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेऊन खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवितात. ४-६ दिवसानंतर अहवाल सकारात्मक आल्यानंतर मग १५० ते १७५ रुपयांऐवजी ८० ते १२० रुपये प्रतिकिलो या दराने २०० ग्रॅम वजनापेक्षा मोठी डाळिंबे मागतात. शेतकºयाने दुसºया व्यापाºयाला विचारणा केली तर, तो दुसरा व्यापारी पुन्हा शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेतो. पुन्हा डाळिंबे घेऊन प्रयोगशाळेत पाठवितो. पुन्हा ५-६ दिवसांनी बागेत येऊन कमी दराने मागतो. शेतकºयाने दर जास्त मिळावा म्हणून तिसºया व्यापाºयाला विचारले तर तो म्हणतो, पुन्हा डाळिंबाची तपासणी करावी लागेल.

एवढा वेळ जाईपर्यंत फळे पक्व होतात. फळे जादा पक्व झाली तर जमिनीवर गळून पडतात. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने डाळिंब विकून मोकळा होतो. यात व्यापाºयांचा मोठा फायदा होत आहे, तर शेतकºयांची लूट केली जात आहे. यावर मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्याची गरज आहे. यासाठी सतीश वारवकर, चंद्रकांत राऊत, सुधाकर जाधव, नाथा यमगर, राहुल पावले, शिवकुमार साळुंखे, राहुल गायकवाड, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय हजारे, विठ्ठल लिंगडे, किसन चव्हाण, जालिंदर सोन्नूर, काकासाहेब जाधव या शेतकºयांनी बाजार समितीकडे मागणी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी