शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकºयांची लूट-दर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 20:21 IST

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन ...

ठळक मुद्देबाजार समितीने लक्ष देण्याची मागणी

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन व्यापाºयांनी एकी करुन दर पाडून शेतकºयांची लूट सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत, अशी डाळिंब उत्पादक शेतकºयांनी मागणी केली आहे.

तालुक्यात सध्या युरोपसह परदेशात डाळिंबाची निर्यात करण्यासाठी रसायनमुक्त डाळिंब मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे. अशाप्रकारचे उत्पादन करण्यासाठी शेतकºयांना खूप नियोजन करुन जादा उत्पादन खर्च करावा लागत आहे. पण चांगला दर मिळेल या आशेने शेतकरी मोठा खर्च करीत आहेत. मोठ्या कष्टाने उत्पादन केलेल्या डाळिंबाला दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

डाळिंब पक्व झाल्यानंतर व्यापारी बागेत येऊन शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेऊन खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवितात. ४-६ दिवसानंतर अहवाल सकारात्मक आल्यानंतर मग १५० ते १७५ रुपयांऐवजी ८० ते १२० रुपये प्रतिकिलो या दराने २०० ग्रॅम वजनापेक्षा मोठी डाळिंबे मागतात. शेतकºयाने दुसºया व्यापाºयाला विचारणा केली तर, तो दुसरा व्यापारी पुन्हा शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेतो. पुन्हा डाळिंबे घेऊन प्रयोगशाळेत पाठवितो. पुन्हा ५-६ दिवसांनी बागेत येऊन कमी दराने मागतो. शेतकºयाने दर जास्त मिळावा म्हणून तिसºया व्यापाºयाला विचारले तर तो म्हणतो, पुन्हा डाळिंबाची तपासणी करावी लागेल.

एवढा वेळ जाईपर्यंत फळे पक्व होतात. फळे जादा पक्व झाली तर जमिनीवर गळून पडतात. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने डाळिंब विकून मोकळा होतो. यात व्यापाºयांचा मोठा फायदा होत आहे, तर शेतकºयांची लूट केली जात आहे. यावर मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्याची गरज आहे. यासाठी सतीश वारवकर, चंद्रकांत राऊत, सुधाकर जाधव, नाथा यमगर, राहुल पावले, शिवकुमार साळुंखे, राहुल गायकवाड, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय हजारे, विठ्ठल लिंगडे, किसन चव्हाण, जालिंदर सोन्नूर, काकासाहेब जाधव या शेतकºयांनी बाजार समितीकडे मागणी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी