शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन संकुलाला मिळणार नवी झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 00:23 IST

८० लाखांचा आराखडा : नूतनीकरणानंतर वापर होणार का?

कणकवली : वापरात नसलेल्या आणि धूळखात पडलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन संकुलाला आता नवी झळाळी मिळणार आहे. या संकुलाच्या नूतनीकरणासाठी ८० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून सध्याच्या संकुलाच्या दुरूस्तीसह पहिल्या मजल्यावर खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कणकवली शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे पर्यटन संकुल पर्यटकांपासून लांबच राहिले आहे. त्यावेळी नगरपालिकांना मिळालेल्या कोकण पॅकेजच्या निधीतून कणकवली नगरपंचायतीचे हे पर्यटन संकुल नरडवे मार्गावर मुडेश्वर मैदानानजीक सुमारे आठ वर्षांपूर्वी उभे राहिले. या पर्यटन संकुलात राहण्याऱ्या पर्यटकांसाठी खोल्या आणि स्वयंपाक घर असा त्याचा आराखडा होता. पर्यटन संकुलाच्या आजूबाजूला झाडांची लागवड करून चांगले लॉनही तयार केले होते. मात्र, उभारणी झाल्यापासून या पर्यटन संकुलाला पर्यटकांचे दर्शन झाले नाही. पर्यटन संकुलाचे आणि तेथील खानपानाची व्यवस्था चालवण्यासाठी असणारे भाडे परवडणारे नसल्याचे कारण देत कोणी पुढे आले नाही. खानपानाची सोय नसल्याने शहरापासून लांब असलेल्या या पर्यटन संकुलाकडे कोणी फिरकले नाहीत. आता नगरपंचायतीने या पर्यटन संकुलाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन संकुलाच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. राहण्यासाठी वातानुुकूलित खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी तब्बल ८० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मात्र, यामुळे पर्यटक येथे वळतील का? असा प्रश्न काही नगरसेवकांनी विचारला आहे. मूळात शहरापासून दूर असल्याने येथे राहण्यासाठी कोणी तयार होत नाहीत. शहरात राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि लॉज असताना दूर अंतरावर असलेल्या या पर्यटन संकुलात राहण्यास कोणी तयार होईल का? असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. पर्यटन संकुल बांधल्यापासून विनावापर राहिले आहे. संकुलातील रेस्टॉरंट चालवणे परवडणारे नसल्याने कोणी ते चालवण्यास घेत नाही. त्यामुळे पर्यटन संकुलावर लाखो रूपये खर्च करूनही त्याची दुरवस्था झाली असल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी दिली. आठ वर्षापूर्वी हे पर्यटन संकुल सुरू झाले तेव्हा ते चालवण्यासाठी साधारण २६ हजार रूपये शुल्क होते. त्यावेळी ते परवडणारे नसल्याने कोणी चालवण्यास पुढे आलेले नव्हते. साहजिकच खानपानाची व्यवस्था नसल्याने कोणी तेथे राहण्यासाठी येण्यास तयार होतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)