शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

सरसकट लाॅकडाऊन, मग अनलाॅकला नियम का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करताना प्रशासनाकडून कोणताही निकष लावला जात नाही. मग अनलाॅक करताना निकष कशासाठी, असा सवाल ...

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करताना प्रशासनाकडून कोणताही निकष लावला जात नाही. मग अनलाॅक करताना निकष कशासाठी, असा सवाल करून, जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या जिवाशी खेळ थांबवून तातडीने व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी केली.

शहा म्हणाले की, अनलाॅकसाठी शासनाने पाच निकष निश्चित केले आहेत. सांगली जिल्हा हा चौथ्या स्तरावर आहे. पण जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश करणे उचित होते. पाॅझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर शासनाने स्तर निश्चित केले आहेत. पाॅझिटिव्हिटी दरात केवळ एक ते दोन टक्क्यांचा फरक आहे, तर बेडची उपलब्धता तिसऱ्या स्तरातील निकषाप्रमाणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत करण्याची आवश्यकता होती. पण प्रशासनाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. बाजारपेठेतील ६५ टक्के दुकाने सुरू झाली आहेत. नागरिकांची गर्दी दिसत आहे. ज्या दुकानात गर्दी होती, ती उघडली आहेत आणि जी दुकाने मोठी असून गर्दी होत नाही, ती बंद आहेत. या निकषामुळे लाखो व्यापाऱ्यांची उपजीविका अडचणीत आली आहे. सरसकट लॉकडाऊनवेळी कोणतेच निकष नसतात आणि अनलाॅक मात्र सरसकट केला जात नाही. ही बाब अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वतंत्र निर्णय घेत सर्व व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी शहा यांनी केली.