शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सरसकट लाॅकडाऊन, मग अनलाॅकला नियम का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करताना प्रशासनाकडून कोणताही निकष लावला जात नाही. मग अनलाॅक करताना निकष कशासाठी, असा सवाल ...

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करताना प्रशासनाकडून कोणताही निकष लावला जात नाही. मग अनलाॅक करताना निकष कशासाठी, असा सवाल करून, जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या जिवाशी खेळ थांबवून तातडीने व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी केली.

शहा म्हणाले की, अनलाॅकसाठी शासनाने पाच निकष निश्चित केले आहेत. सांगली जिल्हा हा चौथ्या स्तरावर आहे. पण जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश करणे उचित होते. पाॅझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर शासनाने स्तर निश्चित केले आहेत. पाॅझिटिव्हिटी दरात केवळ एक ते दोन टक्क्यांचा फरक आहे, तर बेडची उपलब्धता तिसऱ्या स्तरातील निकषाप्रमाणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत करण्याची आवश्यकता होती. पण प्रशासनाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. बाजारपेठेतील ६५ टक्के दुकाने सुरू झाली आहेत. नागरिकांची गर्दी दिसत आहे. ज्या दुकानात गर्दी होती, ती उघडली आहेत आणि जी दुकाने मोठी असून गर्दी होत नाही, ती बंद आहेत. या निकषामुळे लाखो व्यापाऱ्यांची उपजीविका अडचणीत आली आहे. सरसकट लॉकडाऊनवेळी कोणतेच निकष नसतात आणि अनलाॅक मात्र सरसकट केला जात नाही. ही बाब अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वतंत्र निर्णय घेत सर्व व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी शहा यांनी केली.