शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यात राष्ट्रवादीवर चिंतनाची वेळ

By admin | Updated: February 23, 2017 22:57 IST

चुरशीच्या लढती : विकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ

युनूस शेख--इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील पंचायत समितीवरील सत्तेचा झेंडा कायम ठेवल्याचे समाधान असले तरी, जिल्हा परिषदेच्या २ आणि पं. स. मधील त्यांच्या ३ जागा कमी झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर चिंतनाची वेळ आली आहे. बागणीतील हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्यातील लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. बागणीतील गाजलेल्या लढतीत कचरे यांनी १२० मतांनी सागर खोत यांच्यावर मात केली. कचरे यांचे १४०० पर्यंतचे गेलेले मताधिक्य शिगाव आणि बागणीच्या मतदानातून तोडत सागर खोत यांनी ते केवळ ९१ मतांवर आणून ठेवले होते. त्यामुळे मतमोजणी केंद्रात एकच खळबळ उडाली होती. टपाली मताच्या मोजणीनंतर कचरे विजयी झाले. फेरमतमोजणीतही हेच मताधिक्य कायम राहिले.कासेगाव जि. प. गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता संभाजीराव पाटील या ६ हजार ५६७ इतक्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या, तर वाळव्यातून विकास आघाडीच्या सुषमा अरुण नायकवडी यांनी ४ हजार २६७ च्या मताधिक्याने विजय नोंदवला. पंचायत समितीसाठी देवराज पाटील यांनी कासेगावमधून ३ हजार २६ मतांचे अधिक्य घेतले. नेर्ले गणातील राजश्री फसाले यांनी २५९६ असे मताधिक्य घेतले. रेठरेधरणमधून शंकर चव्हाण यांनी २३२९ चे, तर येलूरमधून राहुल महाडिक यांनी २००९ मतांचे अधिक्य घेत निवडणूक जिंकली.कामेरी पं. स. गणातून विकास आघाडीच्या सविता पाटील या अवघ्या ५१ मतांनी विजयी झाल्या. चिकुर्डे गणातून काँग्रेसच्या सुप्रिया भोसले या १०६ मतांनी, तर बावची गणातून विकास आघाडीचे आशिष काळे १५० मतांनी विजयी झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्यावरुन ही निवडणूक अत्यंत चुरशीने झाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने रेठरेहरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, चिकुर्डे व बावची गटातून विजय नोंदवले, तर विकास आघाडीने पेठ, येलूर, वाळवा, कामेरी गटातून विजयाची नोंद केली. बोरगावमधून पुन्हा काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी तिसऱ्यांदा बाजी मारताना राष्ट्रवादीला जेरीस आणले.या संपूर्ण निवडणुकीतून क्रॉस व्होटिंगचा वापर मतदारांनी खुबीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. चिकुर्डेमधून काट्याच्या लढतीत राष्ट्रवादीच्या संजीव पाटील यांनी शिवसेनेच्या अभिजित पाटील यांच्यावर अवघ्या ५८४ मतांनी मात केली.या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादीसाठी, तर कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, वैभव नायकवडी यांची विकास आघाडीकडून प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणालाही एकतर्फी वर्चस्व गाजवू दिले नाही.येलूरमधून राहुल महाडिक यांनी विजय मिळविल्यानंतर गुरुवारी त्यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.