शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:09 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी राजवट भाजपच्या रूपाने सत्तेच्या केंद्रस्थानी आहे, अशी टीका डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या उल्का महाजन यांनी सांगलीत बुधवारी केली. भांडवलशाही सरकारला पायउतार करण्याची हीच वेळ आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.सांगलीतील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष व संघटनांच्यावतीने बुधवारी ‘श्रमिकांचा जाहीरनामा’ परिषद घेण्यात आली, यावेळी उल्का महाजन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कॉ. शंकर पुजारी होते. यावेळी सुभाष लोमटे, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. अभिजित मोरे, चंद्रकांत यादव, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, सुमन पुजारी, अमोल पवार, धनराज कांबळे आदी उपस्थित होते.उल्का महाजन म्हणाल्या की, संविधान जाळणाऱ्यांना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांची हत्या करणाऱ्यांना या देशात अटक होत नाही, कोणतीही शिक्षा होत नाही. पण, संविधान वाचविण्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले, त्या मुद्द्यावर आवाज उठविला, तर त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. त्याला तात्काळ अटक करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. अशा सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. एकीकडे सामाजिक मांडणी करत असल्याचे ढोंग करायचे व दुसरीकडे देशातील आर्थिक नाड्या हातात ठेवायच्या, या धारेतील भाजपला त्यांची जागा दाखविण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सैनिकांच्या हल्ल्याचे, जवानांच्या बलिदानाचे भांडवल करून त्याचा प्रचारासाठी वापर करणाºया भाजप सरकारचा लोकांच्या प्रश्नांशी संबंध नाही. जाहिरातबाजी आणि भाषणबाजी यावरच लोकांना भुलवले जात आहे.अभिजित मोरे म्हणाले, ‘मन की बात नको, काम की बात’ हवी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी काहीच बोलत नाहीत. खासगी रुग्णालयांतील बाजार थांबविण्यासाठी कायदे हवेत. या मागण्यांचा ज्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असेल, त्यांनाच मतदान करा.शंकर पुजारी म्हणाले, ही लढाई पक्षाची नसून सर्वसामान्य जनतेची आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, नातीगोती, हितसंबंध व जातीपातीवर निवडणुका होत आहेत. सुभाष लोमटे म्हणाले, कष्टकºयांसाठी अनेक कायदे होतात. पण, त्यांची कधीच अंमलबजावणी होत नाही.कॉ. धनाजी गुरव यांनी जाहीरनाम्याबद्दलची संकल्पना सांगितली.