शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:09 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी राजवट भाजपच्या रूपाने सत्तेच्या केंद्रस्थानी आहे, अशी टीका डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या उल्का महाजन यांनी सांगलीत बुधवारी केली. भांडवलशाही सरकारला पायउतार करण्याची हीच वेळ आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.सांगलीतील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष व संघटनांच्यावतीने बुधवारी ‘श्रमिकांचा जाहीरनामा’ परिषद घेण्यात आली, यावेळी उल्का महाजन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कॉ. शंकर पुजारी होते. यावेळी सुभाष लोमटे, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. अभिजित मोरे, चंद्रकांत यादव, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, सुमन पुजारी, अमोल पवार, धनराज कांबळे आदी उपस्थित होते.उल्का महाजन म्हणाल्या की, संविधान जाळणाऱ्यांना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांची हत्या करणाऱ्यांना या देशात अटक होत नाही, कोणतीही शिक्षा होत नाही. पण, संविधान वाचविण्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले, त्या मुद्द्यावर आवाज उठविला, तर त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. त्याला तात्काळ अटक करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. अशा सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. एकीकडे सामाजिक मांडणी करत असल्याचे ढोंग करायचे व दुसरीकडे देशातील आर्थिक नाड्या हातात ठेवायच्या, या धारेतील भाजपला त्यांची जागा दाखविण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सैनिकांच्या हल्ल्याचे, जवानांच्या बलिदानाचे भांडवल करून त्याचा प्रचारासाठी वापर करणाºया भाजप सरकारचा लोकांच्या प्रश्नांशी संबंध नाही. जाहिरातबाजी आणि भाषणबाजी यावरच लोकांना भुलवले जात आहे.अभिजित मोरे म्हणाले, ‘मन की बात नको, काम की बात’ हवी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी काहीच बोलत नाहीत. खासगी रुग्णालयांतील बाजार थांबविण्यासाठी कायदे हवेत. या मागण्यांचा ज्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असेल, त्यांनाच मतदान करा.शंकर पुजारी म्हणाले, ही लढाई पक्षाची नसून सर्वसामान्य जनतेची आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, नातीगोती, हितसंबंध व जातीपातीवर निवडणुका होत आहेत. सुभाष लोमटे म्हणाले, कष्टकºयांसाठी अनेक कायदे होतात. पण, त्यांची कधीच अंमलबजावणी होत नाही.कॉ. धनाजी गुरव यांनी जाहीरनाम्याबद्दलची संकल्पना सांगितली.