शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:09 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी राजवट भाजपच्या रूपाने सत्तेच्या केंद्रस्थानी आहे, अशी टीका डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या उल्का महाजन यांनी सांगलीत बुधवारी केली. भांडवलशाही सरकारला पायउतार करण्याची हीच वेळ आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.सांगलीतील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष व संघटनांच्यावतीने बुधवारी ‘श्रमिकांचा जाहीरनामा’ परिषद घेण्यात आली, यावेळी उल्का महाजन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कॉ. शंकर पुजारी होते. यावेळी सुभाष लोमटे, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. अभिजित मोरे, चंद्रकांत यादव, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, सुमन पुजारी, अमोल पवार, धनराज कांबळे आदी उपस्थित होते.उल्का महाजन म्हणाल्या की, संविधान जाळणाऱ्यांना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांची हत्या करणाऱ्यांना या देशात अटक होत नाही, कोणतीही शिक्षा होत नाही. पण, संविधान वाचविण्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले, त्या मुद्द्यावर आवाज उठविला, तर त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. त्याला तात्काळ अटक करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. अशा सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. एकीकडे सामाजिक मांडणी करत असल्याचे ढोंग करायचे व दुसरीकडे देशातील आर्थिक नाड्या हातात ठेवायच्या, या धारेतील भाजपला त्यांची जागा दाखविण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सैनिकांच्या हल्ल्याचे, जवानांच्या बलिदानाचे भांडवल करून त्याचा प्रचारासाठी वापर करणाºया भाजप सरकारचा लोकांच्या प्रश्नांशी संबंध नाही. जाहिरातबाजी आणि भाषणबाजी यावरच लोकांना भुलवले जात आहे.अभिजित मोरे म्हणाले, ‘मन की बात नको, काम की बात’ हवी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी काहीच बोलत नाहीत. खासगी रुग्णालयांतील बाजार थांबविण्यासाठी कायदे हवेत. या मागण्यांचा ज्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असेल, त्यांनाच मतदान करा.शंकर पुजारी म्हणाले, ही लढाई पक्षाची नसून सर्वसामान्य जनतेची आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, नातीगोती, हितसंबंध व जातीपातीवर निवडणुका होत आहेत. सुभाष लोमटे म्हणाले, कष्टकºयांसाठी अनेक कायदे होतात. पण, त्यांची कधीच अंमलबजावणी होत नाही.कॉ. धनाजी गुरव यांनी जाहीरनाम्याबद्दलची संकल्पना सांगितली.